शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

रंगाची उधळण न करणारे भंडारा जिल्ह्यातील गवराळा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 13:13 IST

लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या गावात ग्रामसफाई करण्यात येते.

ठळक मुद्दे२५ वर्षांपासूनची परंपरा लाकडांऐवजी केरकचऱ्याची करतात होळीआदर्श परंपरा राज्यात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरा करून लाकूड जाळले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. रंगातही लाखो रूपये खर्च होतात. निष्पाप प्राण्यांचे बळी घेतले जातात. यामुळे पर्यावरणाची हानी होते. हा प्रकार गवराळा या गावात होत नाही. त्यामुळे हे गाव सर्

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या गावात ग्रामसफाई करण्यात येते. यामुळे हे गाव संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण टिकवून आहे.हिंदू धर्मात होळीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळी, साखरेची गाठी आणि धुळवडीच्या दिवशी रंगांची उधळण सर्वजण करतात. परंतु, गवराळा हे गाव या यासाठी अपवाद ठरले आहे. येथे कर्मयोगी अनासक्त ब्रह्मलीन किसनबाबा अवसरे यांचा २५ वा पुण्यतिथी महोत्सव २५ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत आयोजित केला आहे.सन १९९२ मध्ये होळीच्या दिवशी गावातील धार्मिकस्थळाच्या बांधकामासाठी जागा दान मागून सायंकाळी मंदिरात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, ज्या दिवसापासून अवसरे बाबा गावात आले तेव्हापासून गावात शांतता आल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. तेव्हापासून गावकऱ्यांनी एकत्र येऊन होळी व धुळवडीचा सण परंपरेप्रमाणे साजरा न करता बाबांचा पुण्यतिथी महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानंतरच्या पिढ्यांनी हीच प्रथा सुरू ठेवली. गावात होळी पेटविली जाते. परंतु, ती लाकडांची नव्हे तर ग्रामसफाई करून जमा झालेल्या केरकचऱ्याची होळी असते. धुळवडीच्या दिवशी ग्रामगीता तत्त्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य या विषयांवर अनुभवी लोकांचे गावाचा विकास साधण्यासाठी मार्गदर्शन मिळते. हा कार्यक्रम ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत व संतांच्या सहवासात दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमात श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान व ग्रामकुटुंब योजना राबवून ग्रामस्वराज्य संकल्पना ठरवली जाते. तीन दिवसीय कार्यक्रमात ग्रामगीता प्रवचन, कीर्तन, भजन, पालखी, प्रदक्षिणा, अवसरे महाराजांना मौन श्रद्धांजली यासह रक्तदान, नेत्रतपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते.

 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८