शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कालौघात गावरान आंबा दुर्मिळ

By admin | Updated: April 30, 2015 00:35 IST

कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना ....

बेसुमार वृक्षतोड कारणीभूत : आमराई झाली इतिहासजमाजवाहरनगर : कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना आंबाच्या रसाचा पाहुणचार करण्याची प्रथा होती. ग्रामीण भागात गावरान वाणाचा आंब्याचा रस म्हणजे पर्वणी ठरत असे. मात्र कालौघात बेसुमार प्रमाणात झालेली वृक्षतोड व जळाऊ लाकूड म्हणून होत असलेला वापर यामुळे ग्रामीण भागातून आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.ग्रामीण संस्कृतीचा एक अंग असलेला गावरान आंबा व रस आता दुर्मिळ झाला आहे. सासरी गेलेली मुलगी वर्षातून दोन वेळा माहेरी येते, ते म्हणजे दिवाळी, भाऊबीज आणि अक्षयतृतीयानंतर आंब्याच्या रसाला. हा संस्कृतीचा एक भाग म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच वृक्षतोडीने गावरान आंबा इतिहासजमा होत आहे. ग्रामीण भागात असलेल्या अनेक आमराया या वृक्षतोडीने नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आमराईत गप्पांची मैफल, आंब्याला बहर आला की त्याचा दुरवर पसरणारा सुगंध आता दुरापास्त झालेल्या दिसत आहेत. आंब्याच्या रसाचे निमित्त करून मुलीसोबत जावयांना बोलावून पुरणपोळी, यासह गावरान आंब्याचा रस, त्यावर खमंग तुपाची धार हा पाहूणचार विदर्भाची परंपरा राहिली आहे. ग्रामीण भागातील आंब्याचे प्रकारही अनेक प्रचलित होते. गावातील एखाद्या लहान मुलाला विचारले तरी तो अमूक झाडाचा आंबा गोड की आंबट हे निरखून सांगायचा. आमराईत पाडावरचे आंबे खाण्यासाठी मुलांची होणारी पळापळ, फांद्यावर टोळक्याने खेळायचा डाबडुबली आणि कडक उन्हात आंब्याच्या थंडगार सावलीत बसून रंगणाऱ्या गप्पा आता कालबाह्य झाल्या आहेत. आंब्याच्या झाडांची कत्तल सुरु असल्यामुळे प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाणाऱ्या आमराया दुर्मिळ झाल्या आहेत. पूर्वीच्या काळी आमराईवरुन श्रीमंती ठरत असे. आता मात्र कालौघात या बाबी लोप पावत आहेत. (वार्ताहर)इंधनाकरिता होतो वापरसंगणकाच्या युगात आमराईत बसून गप्पा मारताना कुणी दिसत नाही. स्पर्धेच्या काळात पुस्तकाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांना तर डाबडुबली हा खेळ काय याची माहिती नसल्याने त्यातील गंमत हरवत आहे.