शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कालौघात गावरान आंबा दुर्मिळ

By admin | Updated: April 30, 2015 00:35 IST

कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना ....

बेसुमार वृक्षतोड कारणीभूत : आमराई झाली इतिहासजमाजवाहरनगर : कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना आंबाच्या रसाचा पाहुणचार करण्याची प्रथा होती. ग्रामीण भागात गावरान वाणाचा आंब्याचा रस म्हणजे पर्वणी ठरत असे. मात्र कालौघात बेसुमार प्रमाणात झालेली वृक्षतोड व जळाऊ लाकूड म्हणून होत असलेला वापर यामुळे ग्रामीण भागातून आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.ग्रामीण संस्कृतीचा एक अंग असलेला गावरान आंबा व रस आता दुर्मिळ झाला आहे. सासरी गेलेली मुलगी वर्षातून दोन वेळा माहेरी येते, ते म्हणजे दिवाळी, भाऊबीज आणि अक्षयतृतीयानंतर आंब्याच्या रसाला. हा संस्कृतीचा एक भाग म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच वृक्षतोडीने गावरान आंबा इतिहासजमा होत आहे. ग्रामीण भागात असलेल्या अनेक आमराया या वृक्षतोडीने नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आमराईत गप्पांची मैफल, आंब्याला बहर आला की त्याचा दुरवर पसरणारा सुगंध आता दुरापास्त झालेल्या दिसत आहेत. आंब्याच्या रसाचे निमित्त करून मुलीसोबत जावयांना बोलावून पुरणपोळी, यासह गावरान आंब्याचा रस, त्यावर खमंग तुपाची धार हा पाहूणचार विदर्भाची परंपरा राहिली आहे. ग्रामीण भागातील आंब्याचे प्रकारही अनेक प्रचलित होते. गावातील एखाद्या लहान मुलाला विचारले तरी तो अमूक झाडाचा आंबा गोड की आंबट हे निरखून सांगायचा. आमराईत पाडावरचे आंबे खाण्यासाठी मुलांची होणारी पळापळ, फांद्यावर टोळक्याने खेळायचा डाबडुबली आणि कडक उन्हात आंब्याच्या थंडगार सावलीत बसून रंगणाऱ्या गप्पा आता कालबाह्य झाल्या आहेत. आंब्याच्या झाडांची कत्तल सुरु असल्यामुळे प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाणाऱ्या आमराया दुर्मिळ झाल्या आहेत. पूर्वीच्या काळी आमराईवरुन श्रीमंती ठरत असे. आता मात्र कालौघात या बाबी लोप पावत आहेत. (वार्ताहर)इंधनाकरिता होतो वापरसंगणकाच्या युगात आमराईत बसून गप्पा मारताना कुणी दिसत नाही. स्पर्धेच्या काळात पुस्तकाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांना तर डाबडुबली हा खेळ काय याची माहिती नसल्याने त्यातील गंमत हरवत आहे.