शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

कालौघात गावरान आंबा दुर्मिळ

By admin | Updated: April 30, 2015 00:35 IST

कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना ....

बेसुमार वृक्षतोड कारणीभूत : आमराई झाली इतिहासजमाजवाहरनगर : कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना आंबाच्या रसाचा पाहुणचार करण्याची प्रथा होती. ग्रामीण भागात गावरान वाणाचा आंब्याचा रस म्हणजे पर्वणी ठरत असे. मात्र कालौघात बेसुमार प्रमाणात झालेली वृक्षतोड व जळाऊ लाकूड म्हणून होत असलेला वापर यामुळे ग्रामीण भागातून आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.ग्रामीण संस्कृतीचा एक अंग असलेला गावरान आंबा व रस आता दुर्मिळ झाला आहे. सासरी गेलेली मुलगी वर्षातून दोन वेळा माहेरी येते, ते म्हणजे दिवाळी, भाऊबीज आणि अक्षयतृतीयानंतर आंब्याच्या रसाला. हा संस्कृतीचा एक भाग म्हणून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच वृक्षतोडीने गावरान आंबा इतिहासजमा होत आहे. ग्रामीण भागात असलेल्या अनेक आमराया या वृक्षतोडीने नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आमराईत गप्पांची मैफल, आंब्याला बहर आला की त्याचा दुरवर पसरणारा सुगंध आता दुरापास्त झालेल्या दिसत आहेत. आंब्याच्या रसाचे निमित्त करून मुलीसोबत जावयांना बोलावून पुरणपोळी, यासह गावरान आंब्याचा रस, त्यावर खमंग तुपाची धार हा पाहूणचार विदर्भाची परंपरा राहिली आहे. ग्रामीण भागातील आंब्याचे प्रकारही अनेक प्रचलित होते. गावातील एखाद्या लहान मुलाला विचारले तरी तो अमूक झाडाचा आंबा गोड की आंबट हे निरखून सांगायचा. आमराईत पाडावरचे आंबे खाण्यासाठी मुलांची होणारी पळापळ, फांद्यावर टोळक्याने खेळायचा डाबडुबली आणि कडक उन्हात आंब्याच्या थंडगार सावलीत बसून रंगणाऱ्या गप्पा आता कालबाह्य झाल्या आहेत. आंब्याच्या झाडांची कत्तल सुरु असल्यामुळे प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाणाऱ्या आमराया दुर्मिळ झाल्या आहेत. पूर्वीच्या काळी आमराईवरुन श्रीमंती ठरत असे. आता मात्र कालौघात या बाबी लोप पावत आहेत. (वार्ताहर)इंधनाकरिता होतो वापरसंगणकाच्या युगात आमराईत बसून गप्पा मारताना कुणी दिसत नाही. स्पर्धेच्या काळात पुस्तकाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांना तर डाबडुबली हा खेळ काय याची माहिती नसल्याने त्यातील गंमत हरवत आहे.