शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

चोरट्यांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:44 IST

शहरासह ग्रामीण भागात चोऱ्या करून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चौघा सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांनी १२ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : १२ घरफोडीचे गुन्हे उघड, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरासह ग्रामीण भागात चोऱ्या करून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चौघा सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांनी १२ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.रजनीकांत केशव चानोरे (१८) रा.भंडारा, अमीत जगदीश नंदागवळी (३२) रा.नागपूर, विक्की उर्फ गोविंद व्यास साहानी (२७) रा.भंडारा, आकाश भोजलाल राहांगडाले (२२) रा.सुभाष वॉर्ड वरठी अशी अटकेतील घरफोडी करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी भंडारा, मोहाडी, तुमसर परिसरात १२ ठिकाणी घरफोडी करून सोन्याचांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल लंपास केल्याचे उघडकीस आले.गत काही दिवसांपासून भंडारा शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटनात वाढ झाली होती. भर दिवसा चोरीच्या घटना घडत होत्या. घरासमोरील दुचाकी हातोहात लंपास होत होत्या. घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरीस जात होते. घराला कुलूप लावताना घरमालक दहादा विचार करीत होता. या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी आपल्याकडे तपास घेतला. चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत यावरून तपास सुरु झाला. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या सराईत टोळ्यांची माहिती मिळविली. त्यावरून या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पोटे, बबन पुसाटे, पोलीस निरीक्षक सचिन गदादे, पोलीस शिपाई मोहरकर, सुधीर मडमे, मंगल कुथे, बोरकर, विजय तायडे, निरंजन कडव, राधेश्याम ठवकर, शैलेश बेदूरकर, ईश्वरदत्ता मडावी, पंकज भित्रे, कौशीक गजभिये यांनी केली.या चोरट्यांनी विविध ठिकाणी घरफोडी केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातून सध्या हे चौघे शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत. भंडारा शहरात झालेल्या विविध चोरीच्या घटनात या चौघांचा सहभाग होता काय याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर चव्हाण करीत आहेत. चोरट्यांची आणखी टोळी सक्रीय आहे काय? याचाही शोध घेतला जात आहे.बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावरजिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. घराला कुलूप दिसले की चोरी झाली म्हणूनच समजा. या चोरीच्या घटनांनी ग्रामीण भागात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर भर दिवसा चोरीच्या घटना घडल्या आहेत. आता चोरट्यांची टोळी सापडल्याने काही चोरींचा उलगडा होईल. मात्र नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.घरफोडीच्या गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. कुणी संशयीत इसम फिरताना आढळून आल्या सत्याची माहिती त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.