शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

गांधीसागर तलावाची दुरवस्था

By admin | Updated: July 25, 2015 01:15 IST

तुमसर शहरातील एकमेव व जून्या गांधीसागर तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावात वनस्पती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

स्वच्छतेची गरज : लाखोंचा खर्च व्यर्थ, प्रशासनाचे दुर्लक्षतुमसर : तुमसर शहरातील एकमेव व जून्या गांधीसागर तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावात वनस्पती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.तुमसर शहरात आंबेडकर तथा गांधी वॉर्डात जुना गांधीसागर तलाव आहे. या तलावाचे क्षेत्रफळ सुमारे ५० एकरावर आहे. पालिका प्रशासनाने या तलावातील बालोद्यानावर सुमारे ८५ लक्ष रुपये खर्च केले. तलाव सभोवताल सिमेटीकरण, तलावात उतरण्याकरिता सिमेंट पायऱ्या, स्ट्रीट लाईटची सोय करण्यात आली आहे. एकमेव विरुंगळा व फेरफटका मारण्याचे स्थळ म्हणून गांधीसागर तलाव आहे. मागील काही वर्षात या तलावाकडे निश्चितच तुमसर नगरपरिषदेने लक्ष दिले आहे.तलावाच्या पश्चिमेस उत्तर व दक्षिण दिशेला तलावात प्रचंड मोठे गवत, वनस्पती व कमळांची वेल पसरलेली आहे. या वनस्पतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तलाव किनाऱ्यावर सध्या ही वेल मोठ्या प्रमाणात आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणावर विशेषत: बांधकामावर मोठी रक्कम खर्च करण्यात आली. तलाव खोलीकरण करण्यात आले, बालोद्यान तयार करण्यात आले. त्यामूळे उन्हाळ्यात व हिवाळ्यात येथे तुमसरकरांची हजेरी लागत होते.तलावस्थळी प्रथम दश्य या कचरावजा, वनस्पतींचेच दिसून येते. त्यामूळे तलावाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येते. सौंदर्यीकरण व स्वच्छ करण्याचा विडा उचलणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी ग्रीन अ‍ॅन्ड क्लिन चा नारा दिला, पंरतु येथे तलाव क्लिन करण्याची गरज आहे.माईन्स प्रशासनाने गांधी सागर तलावाकरिता भरीव निधी दिला होता. पंरतु येथील बांधकामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, या प्रकरणाची शहरात केवळ चर्चा करण्यात आली. नगरपरिषदेला शासनाकडून शहर विकासाकरिता निधी प्राप्त होतो. या निधीतून हा तलाव क्लिन करण्याची गरज आहे. शहरात सध्या अनेक विकासात्मक कामे सुरु आहेत. या अंतर्गत गांधी सागर तलाव ग्रीन अ‍ॅन्ड क्लिन करण्याकरिता प्रयत्न करण्याची तसदी नगरपरिषद प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. मागील १० ते १५ वर्षांपासून गांधीसागर तलाव एक देखणा तलाव तयार करण्याची केवळ चर्चा करण्यात येत होती. प्रत्यक्ष कामे हाती घेण्याची गरज आहे. शहर विकास व नियोजनाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यात गांधी सागर तलाव शंभर टक्के सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मांडण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)