शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
5
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
6
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
7
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
8
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
9
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
10
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
11
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
12
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
13
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
14
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
15
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
16
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
17
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
18
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
19
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
20
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जीवाशी खेळ

By admin | Updated: May 17, 2017 00:26 IST

शहरातील प्रसिद्ध खांब तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे.

खांबतलावाचे बांधकाम : जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील प्रसिद्ध खांब तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र तलावाच्या सुरक्षा भिंतींच्या बांधकामात वाहतुकीच्या दृष्टीने तिळमात्रही विचार करण्यात आलेला नाही. मनमानी कारभारामुळे लोकांना प्रचंड अव्यवस्थेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सुरु असलेले सदोष बांधकाम थांबवून खांबतलाव सौदंर्यीकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी पदवीधर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र निंबार्ते यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना देण्यात आले आहे.स्थानिक शितला माता मंदिर ते बालपूरी मंदिर पर्यंतचा रस्ता अत्यंत वळणाचा व वर्दळीचा असून त्यामानाने अतिशय अरुंद आहे. सदर रस्त्याची मांडणी बघता खांब तलावाच्या तटरक्षक भिंतीमुळे वाहनचालकांना समोरुन येणारे वाहन दृष्टिपथास पडत नसल्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झाले, परिणामी अनेकांचे जीवही गेले.सध्या खांब तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु सदर कामाचे नियोजन हे सदोष असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. या कामाचे नियोजन करतांना त्यापुढील रस्त्यावरची वाहतुक सुरळीत व्हावी, याचा विचार करता आला असता परंतु जास्तीत जास्त जागा खाजगी कामासाठी उपयोगात कशी आणता येईल, याचाच विचार करण्यात आल्याचे सदर नियोजनातून दिसून येते. भंडारा शहराचा विचार केला तर खांबतलाव हे भंडारा शहरातील पुरातन आध्यात्मिक वैभव आहे. ते टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र खांबतलावावर अवलंबून असलेल्या जवळपास १५ ते २० कोळी बांधवांच्या परिवाराचा विचार न करता सौंदर्यीकरणाचे काम जोरात सुरु आहे. येथे वापरण्यात येणाऱ्या निधीतुन शहरात विविध ठिकाणी नागरिकांसाठी उद्याणे विकसित करता येवू शकतात व ते नागरिकांच्या सोयीकरिता योग्य होईल. असे असतांना इतका मोठा निधी एकाच ठिकाणी उद्यानासाठी उपयोगात आणून नगर परिषद प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे हा संशोधनाचा विषय आहे. सदर ठिकाणी उद्यान बनवितांना खासगी गाळे काढण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. शहरात सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असतांना केवळ बांधकामाकडे लक्ष दिल्या जात आहे. खाजगी गाळे निर्मितीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग उत्पन्न होऊन सदर तलावात प्रदूषण होणार आहे. भंडारा शहराचे प्राचीन वैभव टिकविण्यासाठी व वाहतुक सुरळीत होऊन जनतेचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने याचे पुन:श्च नियोजन व्हावे व सध्या सुरु असलेले सदोष बांधकाम थांबवून खांबतलाव सौंदर्यीकरणाची चौकशी करण्यात यावी, राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी महेंद्र निंबार्ते यांनी केली आहे.