शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

किटसाठी कामगारांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:35 IST

येथील पंचायत समितीत बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. रात्री दोन वाजतापासून रांगा लागत असल्यामुळे अनेक लोकांना भोवळ येऊन कोसळल्याचे प्रकार वाढत आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका कामगारांवर पडत आहे. त्यांच्या जीवाशी खेळ सुरु असून त्यांची फारच गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : रांगेत उभे राहून पडतात बेशुद्ध, पोलिसांतर्फे बिस्किटांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील पंचायत समितीत बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. रात्री दोन वाजतापासून रांगा लागत असल्यामुळे अनेक लोकांना भोवळ येऊन कोसळल्याचे प्रकार वाढत आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका कामगारांवर पडत आहे. त्यांच्या जीवाशी खेळ सुरु असून त्यांची फारच गैरसोय होत आहे.सहा-सात गावातील कामगारांना एकाच दिवशी बोलविण्याऐवजी दररोज एका गावातील मजुरांना बोलाविले किंवा नियोजन करून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामगारांची नोंदणी करून बांधकाम किट वाटप केली. तर कामगारांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी अनेक कामगारांनी केली आहे. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी संपूर्ण कागदपत्रासह मोहाडी पंचायत समितीमध्ये येतात. त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना या योजनेतील पहिला लाभ बांधकाम किट (पेटी) वाटप केली जाते. मात्र नोंदणी करण्यासाठी जवळपास ५०० ते ६०० कामगार एकाच दिवशी उपस्थित होतात. त्यामुळे या कामगारांना रांगेत उभे केले जाते. रांगेत पहिला नंबर लागावा म्हणून ग्रामीण भागातील काही कामगार अर्ध्या रात्रीलाच येऊन आपला नंबर लावतात. नोंदणीची प्रक्रिया दहा वाजता सुरू होत असल्याने या कामगारांची नोंदणी रात्री सात ते आठ वाजतापर्यत सुरू असते. पहाटेपासून आलेले महिला पुरुष कामगार रांगेत उपाशीतापाशी तासन्तास उभे राहत असल्यामुळे ते बेशुद्ध पडतात. ही योजना राबविताना प्रशासनाने मजुरांच्या सोयीसाठी मंडपाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र जनतेला भुरळ घालण्याच्या उद्देशाने ही योजना जोमाने राबविण्यात येत आहे. परंतु कामगारांच्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. पाच ते सहा गावातील मजुरांना एकाच दिवशी बोलाविण्यात येत असल्याने सहाजिकच गर्दी वाढणार हे प्रशासनाच्या लक्षात न येणे ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल.प्रशासनाने पाच-सहा गावातील मजुरांना एकाच दिवशी न बोलाविता दररोज एका एका गावातील मजुरांना नोंदणीकरिता बोलवावे, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी , पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी उपस्थित कामगार केली आहे.महिला व पुरुषांना एकच मार्गनोंदणीसाठी ज्या खोलीत जावे लागते त्या दारातून महिला व पुरुष एकाच वेळी प्रवेश करीत असल्याने व मोठी गर्दी असल्याने धक्का बुक्की होऊन महिलांची मोठी गैरसोय होत आहे. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे द्वार ठेवण्यात यावे जेणेकरून महिलांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे अत्यंत गरजेचे आहे.बेशुद्ध होऊन कोसळल्या अनेक महिलाकामगार नोंदणीकरिता आपला नंबर लवकर लागावा, यासाठी अनेक महिला पहाटेला येऊन रांगेत लागतात. काही महिला लहान लहान मुलांना घेऊन रांगेत उभ्या राहतात. भूक-तहान लागली तर या महिला आपली जागा सोडून जाण्यास तयार नसतात, उन्हामुळे व पोटात काहीच नसल्याने अनेक महिला बेशुद्ध होऊन खाली पडल्याचे प्रकार घडले आहे, यात निशा बारई (२५) पिंपळगाव, उषा कारेमोरे (४१) आंधळगाव, ममता चोपकर (२५) पिंपळगाव या महिला बेशुद्ध पडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे दाखल करण्यात आले होते. तर प्रमोद गौतम शेंडे याला प्रकृती जास्त खालावल्याने भंडारा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेपोलिसांनी दाखविली माणुसकीकामगारांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मोहाडी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळपासून उपाशीतापाशी रांगेत उभ्या असलेल्या महिलांची समस्या जाणून येथील ठाणेदार निलेश वाजे यांनी या महिलांची आस्थेने विचारपूस करून सर्व महिलांसाठी ग्लुकोज बिस्किटांचे वाटप करून माणुसकीचा परिचय दिला.