शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
2
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
3
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
4
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
5
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
6
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
7
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
8
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
9
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
10
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
11
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
12
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
13
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
14
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
15
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
16
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
17
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
18
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
19
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
20
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

किटसाठी कामगारांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:35 IST

येथील पंचायत समितीत बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. रात्री दोन वाजतापासून रांगा लागत असल्यामुळे अनेक लोकांना भोवळ येऊन कोसळल्याचे प्रकार वाढत आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका कामगारांवर पडत आहे. त्यांच्या जीवाशी खेळ सुरु असून त्यांची फारच गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : रांगेत उभे राहून पडतात बेशुद्ध, पोलिसांतर्फे बिस्किटांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील पंचायत समितीत बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. रात्री दोन वाजतापासून रांगा लागत असल्यामुळे अनेक लोकांना भोवळ येऊन कोसळल्याचे प्रकार वाढत आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका कामगारांवर पडत आहे. त्यांच्या जीवाशी खेळ सुरु असून त्यांची फारच गैरसोय होत आहे.सहा-सात गावातील कामगारांना एकाच दिवशी बोलविण्याऐवजी दररोज एका गावातील मजुरांना बोलाविले किंवा नियोजन करून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामगारांची नोंदणी करून बांधकाम किट वाटप केली. तर कामगारांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी अनेक कामगारांनी केली आहे. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी संपूर्ण कागदपत्रासह मोहाडी पंचायत समितीमध्ये येतात. त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना या योजनेतील पहिला लाभ बांधकाम किट (पेटी) वाटप केली जाते. मात्र नोंदणी करण्यासाठी जवळपास ५०० ते ६०० कामगार एकाच दिवशी उपस्थित होतात. त्यामुळे या कामगारांना रांगेत उभे केले जाते. रांगेत पहिला नंबर लागावा म्हणून ग्रामीण भागातील काही कामगार अर्ध्या रात्रीलाच येऊन आपला नंबर लावतात. नोंदणीची प्रक्रिया दहा वाजता सुरू होत असल्याने या कामगारांची नोंदणी रात्री सात ते आठ वाजतापर्यत सुरू असते. पहाटेपासून आलेले महिला पुरुष कामगार रांगेत उपाशीतापाशी तासन्तास उभे राहत असल्यामुळे ते बेशुद्ध पडतात. ही योजना राबविताना प्रशासनाने मजुरांच्या सोयीसाठी मंडपाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र जनतेला भुरळ घालण्याच्या उद्देशाने ही योजना जोमाने राबविण्यात येत आहे. परंतु कामगारांच्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. पाच ते सहा गावातील मजुरांना एकाच दिवशी बोलाविण्यात येत असल्याने सहाजिकच गर्दी वाढणार हे प्रशासनाच्या लक्षात न येणे ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल.प्रशासनाने पाच-सहा गावातील मजुरांना एकाच दिवशी न बोलाविता दररोज एका एका गावातील मजुरांना नोंदणीकरिता बोलवावे, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी , पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी उपस्थित कामगार केली आहे.महिला व पुरुषांना एकच मार्गनोंदणीसाठी ज्या खोलीत जावे लागते त्या दारातून महिला व पुरुष एकाच वेळी प्रवेश करीत असल्याने व मोठी गर्दी असल्याने धक्का बुक्की होऊन महिलांची मोठी गैरसोय होत आहे. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे द्वार ठेवण्यात यावे जेणेकरून महिलांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे अत्यंत गरजेचे आहे.बेशुद्ध होऊन कोसळल्या अनेक महिलाकामगार नोंदणीकरिता आपला नंबर लवकर लागावा, यासाठी अनेक महिला पहाटेला येऊन रांगेत लागतात. काही महिला लहान लहान मुलांना घेऊन रांगेत उभ्या राहतात. भूक-तहान लागली तर या महिला आपली जागा सोडून जाण्यास तयार नसतात, उन्हामुळे व पोटात काहीच नसल्याने अनेक महिला बेशुद्ध होऊन खाली पडल्याचे प्रकार घडले आहे, यात निशा बारई (२५) पिंपळगाव, उषा कारेमोरे (४१) आंधळगाव, ममता चोपकर (२५) पिंपळगाव या महिला बेशुद्ध पडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे दाखल करण्यात आले होते. तर प्रमोद गौतम शेंडे याला प्रकृती जास्त खालावल्याने भंडारा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेपोलिसांनी दाखविली माणुसकीकामगारांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मोहाडी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळपासून उपाशीतापाशी रांगेत उभ्या असलेल्या महिलांची समस्या जाणून येथील ठाणेदार निलेश वाजे यांनी या महिलांची आस्थेने विचारपूस करून सर्व महिलांसाठी ग्लुकोज बिस्किटांचे वाटप करून माणुसकीचा परिचय दिला.