शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भावी शिक्षक 'टीईटी'साठी सज्ज!

By admin | Updated: January 16, 2016 00:48 IST

शिक्षक होण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाने ‘टीईटी’ (टीचर्स एन्ट्रान्स टेस्ट) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केले आहे.

आज परीक्षा : परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्तभंडारा : शिक्षक होण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाने ‘टीईटी’ (टीचर्स एन्ट्रान्स टेस्ट) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात उद्या शनिवार, १६ जानेवारीला या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.‘डीटीएड’चा अभ्यासक्रम पूर्ण करुनही नोकरी मिळविण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांची भटकंती सुरु आहे. शिक्षक व्हायचे असेल तर सर्वप्रथम ‘टीईटी’ला सामोरे जा, या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावरुन शनिवारी दोन विषयांच्या पेपरसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. राज्यात तुर्तास डी.एड. करून बेरोजगारीची झळ सोसणाऱ्यांची संख्या साडेतीन लाखाच्या घरात आहे. त्यानंतरही नोकरी मिळेल, जागा निघतील, अशा भाबड्या आशेपोटी राज्यातील हजारो ‘डीटीएड’धारक विद्यार्थी पात्रता परीक्षेला सामोरे जात आहेत. राज्यात २२ हजार शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर ‘टीईटी’ परीक्षा घेऊन राज्य शासन बेरोजगारांची आर्थिक पिळवणूक तर करीत नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. अशाही परिस्थितीत १६ जानेवारीला जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवरुन होणाऱ्या ‘टीईटी’साठी जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)२३ परीक्षा केंद्रावर ५,४७१ परीक्षार्थी शिक्षक पात्रता परीक्षा दोन सत्रात होत असून पेपर १ (इयत्ता १ ते ५) १३ परीक्षा केंद्रावर ३,२९९ परीक्षार्थी परीक्षा देणार असून या पेपरची वेळ सकाळी १०.३० ते १ वाजतापर्यंत असेल. पेपर २ (इयत्ता ६ ते ८) १० परीक्षा केंद्रावर एकूण २,१७२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. पेपर २ ची वेळ दुपारी २ ते ४.३० वाजतापर्यंत असेल. परीक्षार्थ्यांनी निर्धारीत वेळेच्या ४५ मिनीटे अगोदर परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासह उपस्थित राहावे, असे शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न कायमशासन एकीकडे शिक्षक अतिरिक्त ठरवत आहे. दुसरीकडे पदभरतीचा आव आणत आहे. या गदारोळात आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांची समस्या कायम आहे. त्यामुळे अगोदर त्यांच्या बदल्यांचा प्रश्न निकाली काढला आणि त्यानंतर रिक्त होणाऱ्या जागा भरा, असाही एक सूर यानिमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातून आळविला जात आहे. यासह अगोदरच अतिरिक्त शिक्षक असल्यानंतर नव्याने पदभरती कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करुन शिक्षण विभाग बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांकडून होत आहे.