शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भावी शिक्षक 'टीईटी'साठी सज्ज!

By admin | Updated: January 16, 2016 00:48 IST

शिक्षक होण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाने ‘टीईटी’ (टीचर्स एन्ट्रान्स टेस्ट) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केले आहे.

आज परीक्षा : परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्तभंडारा : शिक्षक होण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाने ‘टीईटी’ (टीचर्स एन्ट्रान्स टेस्ट) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात उद्या शनिवार, १६ जानेवारीला या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.‘डीटीएड’चा अभ्यासक्रम पूर्ण करुनही नोकरी मिळविण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांची भटकंती सुरु आहे. शिक्षक व्हायचे असेल तर सर्वप्रथम ‘टीईटी’ला सामोरे जा, या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावरुन शनिवारी दोन विषयांच्या पेपरसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. राज्यात तुर्तास डी.एड. करून बेरोजगारीची झळ सोसणाऱ्यांची संख्या साडेतीन लाखाच्या घरात आहे. त्यानंतरही नोकरी मिळेल, जागा निघतील, अशा भाबड्या आशेपोटी राज्यातील हजारो ‘डीटीएड’धारक विद्यार्थी पात्रता परीक्षेला सामोरे जात आहेत. राज्यात २२ हजार शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर ‘टीईटी’ परीक्षा घेऊन राज्य शासन बेरोजगारांची आर्थिक पिळवणूक तर करीत नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. अशाही परिस्थितीत १६ जानेवारीला जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवरुन होणाऱ्या ‘टीईटी’साठी जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)२३ परीक्षा केंद्रावर ५,४७१ परीक्षार्थी शिक्षक पात्रता परीक्षा दोन सत्रात होत असून पेपर १ (इयत्ता १ ते ५) १३ परीक्षा केंद्रावर ३,२९९ परीक्षार्थी परीक्षा देणार असून या पेपरची वेळ सकाळी १०.३० ते १ वाजतापर्यंत असेल. पेपर २ (इयत्ता ६ ते ८) १० परीक्षा केंद्रावर एकूण २,१७२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. पेपर २ ची वेळ दुपारी २ ते ४.३० वाजतापर्यंत असेल. परीक्षार्थ्यांनी निर्धारीत वेळेच्या ४५ मिनीटे अगोदर परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासह उपस्थित राहावे, असे शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न कायमशासन एकीकडे शिक्षक अतिरिक्त ठरवत आहे. दुसरीकडे पदभरतीचा आव आणत आहे. या गदारोळात आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांची समस्या कायम आहे. त्यामुळे अगोदर त्यांच्या बदल्यांचा प्रश्न निकाली काढला आणि त्यानंतर रिक्त होणाऱ्या जागा भरा, असाही एक सूर यानिमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातून आळविला जात आहे. यासह अगोदरच अतिरिक्त शिक्षक असल्यानंतर नव्याने पदभरती कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करुन शिक्षण विभाग बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांकडून होत आहे.