शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

एकाच दिवशी तीन जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:19 IST

एका जन्म-मृत्यू मानवी जीवनातील शाश्वत घटनाक्रम आहेत.

मोहगावदेवी येथील घटना : गावात शोककळा, तापमानाचा प्रभावलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : एका जन्म-मृत्यू मानवी जीवनातील शाश्वत घटनाक्रम आहेत. गावात कुण्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अख्खे गाव त्या कुंटुंबियासोबत असते. मात्र २४ तासांच्या आत एक नव्हे लागोपाठ तीन व्यक्तींच्या मृत्युने मोहगावदेवी हा गाव शोकसागरात बुडाला. मृत्युच्या मार्गाने प्रत्येकालाच जाणे आहे. मृत्यु ही नैसर्गीक चक्राची प्रक्रिया मानली गेली आहे, पण गावात मृत्युची साखळी बनून जात असेल तर निश्चितच कळायला मार्ग उरत नाही. अशीच दु:खदायी घटना मोहगाव देवी या गावात घडली. मिलिंद रामटेके या नावाचा विवाहित तरूणाचा मृत्यू शनिवारच्या रात्री झाला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारच्या पहाटे हरी लेंडे यांचा मृत्यु झाला. त्यांच्यावर त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारीच सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान परसराम लेंडे या वृद्धाचे निधन झाले. यांच्यावर सुरनदी येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पाठोपाठ गावातील एक तरूण व दोन वृद्धांचे निधन झाले. एक झालं की दुसऱ्यांच्या अंत्यविधीला जाण्याचा दुर्देवी योग मोहगाववासीयांना आला. मोहगाव देवी येथील सरपंच राजेश लेंडे यांच्या कुटूंबातील दोन वृद्धांनी प्राण सोडले तर घरचा कमावता मिलिंद रामटेके गेल्याने कुटूंबातील पत्नी व मुलांवर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.एकाच दिवशी तीन परिवारांना दु:खाचा डोहात सोडणारा दुर्देवी अनुभव जनतेनी बघितला आहे. सध्या उन्हाचा तडाखा फार आहे. दिवसभर उष्ण लाटा सुरू असतात. गावात वीजेची भानगड. कुलर चालत नाही. वीज राहत नाही. खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे गावकरी त्रस्त झालेली आहेत. स्वत:च्या बचावणासाठी बरीच जण गावातील पानठेल्यावर वा गावाशेजारच्या वृक्षसावलीत दिवस काढतात. पण, रात्री गेली वीज मरणयातना देवून जाते. याच बाबींचा परिणाम मोहगावदेवी व अन्य ग्रामीण भागातील जनतेला सोसावा लागतो. सुर्यदेव आग ओकत आहे. मोहगाव देवी येथे तर प्रचंड तापमानाच्या प्रभावाने वृद्ध मंडळींना जीव गमवावा लागत असल्याचा गावकऱ्यांचे जाहीररीत्या म्हणने आहे. इकडे ग्रामीण भागात सिंगल फेज असल्याने कुलरही फिरत नाही. अंगाची दाहकता शमवणारा गारवा ग्रामीण जनतेला मिळत नसल्याने उष्माघात प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्याच्या परिणामाने लोकांना नाहक जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.