शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी तीन जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:19 IST

एका जन्म-मृत्यू मानवी जीवनातील शाश्वत घटनाक्रम आहेत.

मोहगावदेवी येथील घटना : गावात शोककळा, तापमानाचा प्रभावलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : एका जन्म-मृत्यू मानवी जीवनातील शाश्वत घटनाक्रम आहेत. गावात कुण्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अख्खे गाव त्या कुंटुंबियासोबत असते. मात्र २४ तासांच्या आत एक नव्हे लागोपाठ तीन व्यक्तींच्या मृत्युने मोहगावदेवी हा गाव शोकसागरात बुडाला. मृत्युच्या मार्गाने प्रत्येकालाच जाणे आहे. मृत्यु ही नैसर्गीक चक्राची प्रक्रिया मानली गेली आहे, पण गावात मृत्युची साखळी बनून जात असेल तर निश्चितच कळायला मार्ग उरत नाही. अशीच दु:खदायी घटना मोहगाव देवी या गावात घडली. मिलिंद रामटेके या नावाचा विवाहित तरूणाचा मृत्यू शनिवारच्या रात्री झाला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारच्या पहाटे हरी लेंडे यांचा मृत्यु झाला. त्यांच्यावर त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारीच सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान परसराम लेंडे या वृद्धाचे निधन झाले. यांच्यावर सुरनदी येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. एका पाठोपाठ गावातील एक तरूण व दोन वृद्धांचे निधन झाले. एक झालं की दुसऱ्यांच्या अंत्यविधीला जाण्याचा दुर्देवी योग मोहगाववासीयांना आला. मोहगाव देवी येथील सरपंच राजेश लेंडे यांच्या कुटूंबातील दोन वृद्धांनी प्राण सोडले तर घरचा कमावता मिलिंद रामटेके गेल्याने कुटूंबातील पत्नी व मुलांवर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.एकाच दिवशी तीन परिवारांना दु:खाचा डोहात सोडणारा दुर्देवी अनुभव जनतेनी बघितला आहे. सध्या उन्हाचा तडाखा फार आहे. दिवसभर उष्ण लाटा सुरू असतात. गावात वीजेची भानगड. कुलर चालत नाही. वीज राहत नाही. खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे गावकरी त्रस्त झालेली आहेत. स्वत:च्या बचावणासाठी बरीच जण गावातील पानठेल्यावर वा गावाशेजारच्या वृक्षसावलीत दिवस काढतात. पण, रात्री गेली वीज मरणयातना देवून जाते. याच बाबींचा परिणाम मोहगावदेवी व अन्य ग्रामीण भागातील जनतेला सोसावा लागतो. सुर्यदेव आग ओकत आहे. मोहगाव देवी येथे तर प्रचंड तापमानाच्या प्रभावाने वृद्ध मंडळींना जीव गमवावा लागत असल्याचा गावकऱ्यांचे जाहीररीत्या म्हणने आहे. इकडे ग्रामीण भागात सिंगल फेज असल्याने कुलरही फिरत नाही. अंगाची दाहकता शमवणारा गारवा ग्रामीण जनतेला मिळत नसल्याने उष्माघात प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्याच्या परिणामाने लोकांना नाहक जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.