शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अंत्ययात्रेत सहभागींवर मधमाशांचा हल्ला, ३० जण जखमी; नागरिकांत दहशत

By युवराज गोमास | Updated: October 7, 2023 16:11 IST

पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील घटना

भंडारा : पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारकसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना ६ ऑक्टोंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी घडली. यात २५ ते ३० नागरिक किरकोळ जखमी झाले तर ५ नागरिकांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले. 

होमगार्ड असलेले नाना मेश्राम यांची आई अजनाबाई मेश्राम यांचे गुरुवारला रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर कोदुर्ली गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक व ग्रामस्थ स्मशानभूमीकडे जात असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात २५ ते ३० नागरिक किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी ग्रामीण रूग्णालय व खासगी रुग्णालय गाठून उपचार सुरू केला आहे. 

ग्रामीण रुग्णालयात सिंधू चव्हाण, सुशीला बनसोड, सुभाष चव्हाण, शुभम रामटेके, घनश्याम खोब्रागडे यांच्यावर उपचार करण्यात आले. मधमाशांचा हल्ला थांबल्यानंतर मोजक्याच नागरिकांच्या पुढाकारात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची चांगली दमछाक झाली, एवढे मात्र खरे! जखमींच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती रुग्णालय सुत्रांनी दिली आहे.

नदीतील पाण्यात, तणसीच्या ढिगांत लपले नागरिक

हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाबरले आणि वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळू लागले. यामुळे एकच खळबळ उडाली. स्मशानभूमीपासून काही अंतरावर प्रेत ठेवून काही नागरिक गावाच्या दिशेने तर काही जवळील तणसीच्या ढिगात लपले. काहींनी वैनगंगा नदीचे पाण्याचा उडी घेतली. परंतु, बराच वेळ मधमाशांनी पिच्छा सोडला नव्हता. त्यामुळे नागरिक चांगलेच घाबरले होते.

जिल्ह्यात १३ दिवसातील दुसरी घटना

तुमसर तालुक्यातील सालई शिवारात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शुभंम भोयर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर बाम्हणी नदीघाट स्मशानभूमी शेजारी मधमाशांनी अचानक हल्ला केला होता. २३ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत सुमारे २०० नागरिक जखमी झाले होते. नागरिकांनी वैनगंगेत उडी घेत बचाव केला होता. आता १३ दिवसानंतर पुन्हा अंत्ययात्रेवर हल्ला केल्याची ही दुसरी घटना जिल्ह्यात घडली.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा