शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भयभीत कुटुंबाने गाव सोडले

By admin | Updated: October 13, 2014 23:17 IST

तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावरील मिटेवानी येथे एका कुटूंबाला जादूटोना केल्याच्या आरोपावरून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण कुटूंब सध्या भयभीत असून ते दुसऱ्या

मिटेवानी येथील घटना : अंधश्रध्देतून घडला प्रकारतुमसर : तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावरील मिटेवानी येथे एका कुटूंबाला जादूटोना केल्याच्या आरोपावरून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण कुटूंब सध्या भयभीत असून ते दुसऱ्या गावी नातेवाईकांकडे राहत आहेत. यात काहींनी मध्यस्थीची भूमिका वठविली होती, परंतु ते प्रयत्न निष्फळ ठरले.तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावर तुमसर शहरापासून अवघ्या पाच कि़मी. अंतरावर मिटेवानी गाव आहे. शंकर गोरबडे यांच्या घरापासून काही अंतरावर दुसरे कुटूंब राहते. त्यांची १७ ते १८ वर्षाची मुलगी सतत आजारी आहे. आजारात ती बडबडून शंकर गोरबडे यांचे नाव घेते. शंकर गोरबडे यांनीच आपल्या मुलीला भूतबाधा केली असा आरोप त्या कुटूंबाने गोरबडे यांच्यावर करून शाब्दिक वाद घातला. मागील एक ते दीड महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. गावातील प्रतिष्ठीतांनी आरोप करणाऱ्या कुटूंबाला मुलीला रुग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला देवून मध्यस्थी केली होती. मुलीला कुटूंबीयांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून एक दिवस उपचार केला. त्यानंतर मुलीला गावाला परत घेवून आले. पुन्हा ती तशीच बडबड करीत आहे. या दरम्यान भितीने गोरबडे कुटूंबाने गाव सोडून दुसऱ्या गावाचा आश्रय घेतला आहे. किती दिवस गावाबाहेर दुसऱ्याकडे राहावे, असा प्रश्न गोरबडे यांना पडला आहे.दोन दिवसापुर्वी गोरबडे यांची १२ वीत शिकणारी मुलगी मिटेवानी येथे घरी अभ्यासाची पुस्तके घेण्याकरिता गेली असता गावातील काही तरूण टवाळखोरांनी जादूटोण्याच्या संदर्भात हटकले होते. सदर प्रकरणात अनुचित प्रकार घडू नये याकरिता गावातील समााजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)