शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चौरास भागात धानपीक संकटात

By admin | Updated: October 5, 2015 01:03 IST

ऐन पावसाळ्यात जरी पावसाने वेळोवेळी हजेरी लावली असली तरी, परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता.

पावसाने दिला दगा : वीज मंडळाचाही अनियमित पुरवठाकोंढा (कोसरा) : ऐन पावसाळ्यात जरी पावसाने वेळोवेळी हजेरी लावली असली तरी, परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने हातचे धान पीक जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गासोबतच वीज वितरण कंपनीनेही शेतकऱ्यांची बोळवण सुरू केली आहे. भारनियमनाच्या नावावर आठ तासदेखील वीज मिळत नसल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातुर झाला आहे.चौरास भागातील शेतकऱ्यांचे धान पीक मुख्य आहे. मागील तीन वर्षापासून या परिसरात दुष्काळ पडत आहे. यावर्षी देखील पाऊस अत्यल्प पडल्याने चुऱ्हाड, विरली (खं.), पिंपळगाव (नि.), सोमनाळा भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. कोंढा परिसरात २३ सप्टेंबरला पाऊस पडला होता. तेव्हापासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात उकाडा वाढला आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने जमिनी कोरड्या पडल्या आहेत. हलक्या धानाला पुन्हा पावसाची गरज आहे. परतीच्या पावसाची गरज आहे. कोंढा चौरास भागावर आधीच निसर्गाची अवकृपा झाली असताना विजेच्या समस्या वाढल्या आहेत. दररोज फक्त आठ तास थ्री फेस लाईन कृषी पंपधारकांना दिली जात आहे. त्या दरम्यान अनेकदा अनियमिततेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कृषी पंपधारक शेतकरी देखील शेतीला पंपाद्वारे पाणी पुरवठा योग्य प्रमाणात करू शकत नाही. तसेच विजेचे खांब ठिकठिकाणी चुकले असून केबल खराब झाले आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात धानाला पाणी पुरवठा होत नाही. थ्री फेज वीज येणे जाणे वाढले असल्याने कृषी पंप धारक शेतकरी योग्य पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे धानपिक नष्ट होत आहे. कोंढा परिसरात डावा कालव्यात पाणी सोडल्याने कालव्याच्या आजूबाजूचे शेकडो शेतकरी इंजिनच्या माध्यमातून शेतीला पाणी देऊन धानपिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे परिसरातील तलाव, नाले, बोड्या पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे तलावाच्या बाजूचे शेतकरी तलावाचे पाणी देऊ शकत नाही. अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे.शेतकरी धानाचे पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. धानावर किडींचा प्रादुर्भाव आहे. यावर कोणताच उपाय नाही. लोकांनी दोन तीन वेळा फवारणी करून पिकांना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग नाही असे दिसते. अशावेळी प्रशासनाने कोंढा चौरास भागाच्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)