शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

चौरास भागात धानपीक संकटात

By admin | Updated: October 5, 2015 01:03 IST

ऐन पावसाळ्यात जरी पावसाने वेळोवेळी हजेरी लावली असली तरी, परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता.

पावसाने दिला दगा : वीज मंडळाचाही अनियमित पुरवठाकोंढा (कोसरा) : ऐन पावसाळ्यात जरी पावसाने वेळोवेळी हजेरी लावली असली तरी, परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने हातचे धान पीक जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गासोबतच वीज वितरण कंपनीनेही शेतकऱ्यांची बोळवण सुरू केली आहे. भारनियमनाच्या नावावर आठ तासदेखील वीज मिळत नसल्याने कृषी पंपधारक शेतकरी चिंतातुर झाला आहे.चौरास भागातील शेतकऱ्यांचे धान पीक मुख्य आहे. मागील तीन वर्षापासून या परिसरात दुष्काळ पडत आहे. यावर्षी देखील पाऊस अत्यल्प पडल्याने चुऱ्हाड, विरली (खं.), पिंपळगाव (नि.), सोमनाळा भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. कोंढा परिसरात २३ सप्टेंबरला पाऊस पडला होता. तेव्हापासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात उकाडा वाढला आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने जमिनी कोरड्या पडल्या आहेत. हलक्या धानाला पुन्हा पावसाची गरज आहे. परतीच्या पावसाची गरज आहे. कोंढा चौरास भागावर आधीच निसर्गाची अवकृपा झाली असताना विजेच्या समस्या वाढल्या आहेत. दररोज फक्त आठ तास थ्री फेस लाईन कृषी पंपधारकांना दिली जात आहे. त्या दरम्यान अनेकदा अनियमिततेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कृषी पंपधारक शेतकरी देखील शेतीला पंपाद्वारे पाणी पुरवठा योग्य प्रमाणात करू शकत नाही. तसेच विजेचे खांब ठिकठिकाणी चुकले असून केबल खराब झाले आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात धानाला पाणी पुरवठा होत नाही. थ्री फेज वीज येणे जाणे वाढले असल्याने कृषी पंप धारक शेतकरी योग्य पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे धानपिक नष्ट होत आहे. कोंढा परिसरात डावा कालव्यात पाणी सोडल्याने कालव्याच्या आजूबाजूचे शेकडो शेतकरी इंजिनच्या माध्यमातून शेतीला पाणी देऊन धानपिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे परिसरातील तलाव, नाले, बोड्या पूर्णपणे भरले नाही. त्यामुळे तलावाच्या बाजूचे शेतकरी तलावाचे पाणी देऊ शकत नाही. अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे.शेतकरी धानाचे पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. धानावर किडींचा प्रादुर्भाव आहे. यावर कोणताच उपाय नाही. लोकांनी दोन तीन वेळा फवारणी करून पिकांना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग नाही असे दिसते. अशावेळी प्रशासनाने कोंढा चौरास भागाच्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)