शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात तीन अपघातात चौघांचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला.

ठळक मुद्देरविवार ठरला अपघातवार : भंडारा, चुल्हाडफाटा व वरठीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. भंडारा - पवनी मार्गावर चुल्हाड फाट्यावर ओव्हरटेल करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहन ट्रेलरवर आदळल्याने दोनजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला.कोंढा-कोसरा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, चुल्हाड फाट्यावर झालेल्या अपघातात गुरुदेव रामदास घोडमारे (२५), सौरभ रमेश राणे (१४) दोघे रा. तिर्री मिन्सी हे दोघे जागीच ठार झाले. तर चालक उत्तम बाबुराव रणदिवे (३५) हा गंभीर जखमी झाला. पवनी तालुक्यातील तिर्री येथील टाटा एस मालवाहू वाहन (क्रमांक एम एच ३१ डीएस १९९८) पालोरा चौ. येथील कुकुटपालन केंद्रावर जात होते. पवनी - भंडारा राज्यमार्गावरुन जातांना चुल्हाड फाट्यावर समोर असलेल्या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतांना अचानक मालवाहू वाहन ट्रेलरला जावून धडकले. धडक एवढी भीषण होती की ट्रेलरसह मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. यात मालवाहू वाहनातील गुरुदेव आणि सौरभ जागीच ठार झाले. तर चालक उत्तम रणदिवे गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात ठार झालेला सौरभ हा आमगाव येथील गुरुदेव आश्रम शाळेत नवव्या वर्गात शिकत होता. प्रकृती बरी नसल्याने तो गावी आला होता. सहज म्हणून तो या वाहनातून जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. तर गुरुदेव हा शेतमजुरी करणारा तरुण आहे. या अपघाताचे वृत्त गावात माहित होताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.भंडारात एसटी बसखाली तरुण चिरडलारस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी बसखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना येथील खांबतलाव चौक परिसरात रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. प्रशांत नानाजी नवखरे (३६) रा. तकीया वॉर्ड भंडारा असे मृताचे नाव आहे. तो खात रोडवरुन राजीव गांधी चौकाकडे आपल्या दुचाकीने येत होता. शितला माता मंदिर परिसरात रस्त्याचे काम खोळंबल्याने मोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात तो खाली कोसळला आणि त्याचवेळी मागाहून आलेली एसटी बसचे चाक त्याच्या अंगावरुन गेले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. राजीव गांधी चौकात येथील त्याचे उपहारगृह होते. दोन वर्षापुर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला नऊ महिन्याची मुलगी आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.सनफ्लॅगमध्ये कटून कामगार ठारवरठी : रात्रपाळीत कामावर जाणारा कामगार लोकोपायलटखाली कटून ठार झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत शनिवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. शिवशंकर वंजारी (५३) असे मृताचे नाव आहे. तो कंत्राटी कामगार म्हणून सिंटर विभागात कार्यरत होता. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे तो आपल्या कामावर जात होता. त्यावेळी रुळ ओलांडताना कंपनीतील लोकोपायलटच्या इंजीनखाली तो आला. त्यात कटून गंभीर जखमी झाला. तात्काळ कंपनीतील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यासाठी गंभीर दुखापत असल्याने त्याला नागपूर येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती या अपघातात ठार झाल्याने कुटूंबावर मोठे संकट ओढवले आहे. विशेष म्हणजे सिंटर विभागात काम करण्यासाठी जाणाऱ्या कामगारांना रुळ ओलांडूनच जावे लागते. या घटनेने कपंनीत शोककळा पसरली आहे. मृतकाच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी आहे.