शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जिल्ह्यात तीन अपघातात चौघांचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला.

ठळक मुद्देरविवार ठरला अपघातवार : भंडारा, चुल्हाडफाटा व वरठीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. भंडारा - पवनी मार्गावर चुल्हाड फाट्यावर ओव्हरटेल करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहन ट्रेलरवर आदळल्याने दोनजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला.कोंढा-कोसरा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, चुल्हाड फाट्यावर झालेल्या अपघातात गुरुदेव रामदास घोडमारे (२५), सौरभ रमेश राणे (१४) दोघे रा. तिर्री मिन्सी हे दोघे जागीच ठार झाले. तर चालक उत्तम बाबुराव रणदिवे (३५) हा गंभीर जखमी झाला. पवनी तालुक्यातील तिर्री येथील टाटा एस मालवाहू वाहन (क्रमांक एम एच ३१ डीएस १९९८) पालोरा चौ. येथील कुकुटपालन केंद्रावर जात होते. पवनी - भंडारा राज्यमार्गावरुन जातांना चुल्हाड फाट्यावर समोर असलेल्या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतांना अचानक मालवाहू वाहन ट्रेलरला जावून धडकले. धडक एवढी भीषण होती की ट्रेलरसह मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. यात मालवाहू वाहनातील गुरुदेव आणि सौरभ जागीच ठार झाले. तर चालक उत्तम रणदिवे गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात ठार झालेला सौरभ हा आमगाव येथील गुरुदेव आश्रम शाळेत नवव्या वर्गात शिकत होता. प्रकृती बरी नसल्याने तो गावी आला होता. सहज म्हणून तो या वाहनातून जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. तर गुरुदेव हा शेतमजुरी करणारा तरुण आहे. या अपघाताचे वृत्त गावात माहित होताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.भंडारात एसटी बसखाली तरुण चिरडलारस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी बसखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना येथील खांबतलाव चौक परिसरात रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. प्रशांत नानाजी नवखरे (३६) रा. तकीया वॉर्ड भंडारा असे मृताचे नाव आहे. तो खात रोडवरुन राजीव गांधी चौकाकडे आपल्या दुचाकीने येत होता. शितला माता मंदिर परिसरात रस्त्याचे काम खोळंबल्याने मोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात तो खाली कोसळला आणि त्याचवेळी मागाहून आलेली एसटी बसचे चाक त्याच्या अंगावरुन गेले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. राजीव गांधी चौकात येथील त्याचे उपहारगृह होते. दोन वर्षापुर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला नऊ महिन्याची मुलगी आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.सनफ्लॅगमध्ये कटून कामगार ठारवरठी : रात्रपाळीत कामावर जाणारा कामगार लोकोपायलटखाली कटून ठार झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत शनिवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. शिवशंकर वंजारी (५३) असे मृताचे नाव आहे. तो कंत्राटी कामगार म्हणून सिंटर विभागात कार्यरत होता. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे तो आपल्या कामावर जात होता. त्यावेळी रुळ ओलांडताना कंपनीतील लोकोपायलटच्या इंजीनखाली तो आला. त्यात कटून गंभीर जखमी झाला. तात्काळ कंपनीतील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यासाठी गंभीर दुखापत असल्याने त्याला नागपूर येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती या अपघातात ठार झाल्याने कुटूंबावर मोठे संकट ओढवले आहे. विशेष म्हणजे सिंटर विभागात काम करण्यासाठी जाणाऱ्या कामगारांना रुळ ओलांडूनच जावे लागते. या घटनेने कपंनीत शोककळा पसरली आहे. मृतकाच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी आहे.