शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जिल्ह्यात तीन अपघातात चौघांचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला.

ठळक मुद्देरविवार ठरला अपघातवार : भंडारा, चुल्हाडफाटा व वरठीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. भंडारा - पवनी मार्गावर चुल्हाड फाट्यावर ओव्हरटेल करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहन ट्रेलरवर आदळल्याने दोनजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला.कोंढा-कोसरा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, चुल्हाड फाट्यावर झालेल्या अपघातात गुरुदेव रामदास घोडमारे (२५), सौरभ रमेश राणे (१४) दोघे रा. तिर्री मिन्सी हे दोघे जागीच ठार झाले. तर चालक उत्तम बाबुराव रणदिवे (३५) हा गंभीर जखमी झाला. पवनी तालुक्यातील तिर्री येथील टाटा एस मालवाहू वाहन (क्रमांक एम एच ३१ डीएस १९९८) पालोरा चौ. येथील कुकुटपालन केंद्रावर जात होते. पवनी - भंडारा राज्यमार्गावरुन जातांना चुल्हाड फाट्यावर समोर असलेल्या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतांना अचानक मालवाहू वाहन ट्रेलरला जावून धडकले. धडक एवढी भीषण होती की ट्रेलरसह मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. यात मालवाहू वाहनातील गुरुदेव आणि सौरभ जागीच ठार झाले. तर चालक उत्तम रणदिवे गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात ठार झालेला सौरभ हा आमगाव येथील गुरुदेव आश्रम शाळेत नवव्या वर्गात शिकत होता. प्रकृती बरी नसल्याने तो गावी आला होता. सहज म्हणून तो या वाहनातून जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. तर गुरुदेव हा शेतमजुरी करणारा तरुण आहे. या अपघाताचे वृत्त गावात माहित होताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.भंडारात एसटी बसखाली तरुण चिरडलारस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी बसखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना येथील खांबतलाव चौक परिसरात रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. प्रशांत नानाजी नवखरे (३६) रा. तकीया वॉर्ड भंडारा असे मृताचे नाव आहे. तो खात रोडवरुन राजीव गांधी चौकाकडे आपल्या दुचाकीने येत होता. शितला माता मंदिर परिसरात रस्त्याचे काम खोळंबल्याने मोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात तो खाली कोसळला आणि त्याचवेळी मागाहून आलेली एसटी बसचे चाक त्याच्या अंगावरुन गेले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. राजीव गांधी चौकात येथील त्याचे उपहारगृह होते. दोन वर्षापुर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला नऊ महिन्याची मुलगी आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.सनफ्लॅगमध्ये कटून कामगार ठारवरठी : रात्रपाळीत कामावर जाणारा कामगार लोकोपायलटखाली कटून ठार झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत शनिवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. शिवशंकर वंजारी (५३) असे मृताचे नाव आहे. तो कंत्राटी कामगार म्हणून सिंटर विभागात कार्यरत होता. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे तो आपल्या कामावर जात होता. त्यावेळी रुळ ओलांडताना कंपनीतील लोकोपायलटच्या इंजीनखाली तो आला. त्यात कटून गंभीर जखमी झाला. तात्काळ कंपनीतील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यासाठी गंभीर दुखापत असल्याने त्याला नागपूर येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती या अपघातात ठार झाल्याने कुटूंबावर मोठे संकट ओढवले आहे. विशेष म्हणजे सिंटर विभागात काम करण्यासाठी जाणाऱ्या कामगारांना रुळ ओलांडूनच जावे लागते. या घटनेने कपंनीत शोककळा पसरली आहे. मृतकाच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी आहे.