शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्यात चार मातांसह दीडशे बालकांचा मृत्यू

By admin | Updated: December 3, 2014 22:43 IST

माता बालक यांच्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या. मात्र तीन वर्षात चार मातासह दीडशे बालकांच्या मृत्युची नोंद आहे.

संजय साठवणे - साकोलीमाता बालक यांच्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या. मात्र तीन वर्षात चार मातासह दीडशे बालकांच्या मृत्युची नोंद आहे. शासनाकडून माता-बालक मृत्युचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी व ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. शासनाचे कार्यक्रम आल्यानंतर त्याची प्रसिद्धी होत नाही. त्यामुळे योजना नागरिकापर्यंत पोहचत नाही तर याहीपेक्षा सर्वात जास्त फटका या कार्यक्रमांना बसतो तो वैद्यकीय अधिकारी व संबंधित अधिकारी मुख्यालयी गैरहजर राहण्याचा.आरोग्य विभागातर्फे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ही योजना व जननी शीशु सुरक्षा योजना विशेष करून गर्भवती महिला व लहान बाळांसाठी तयार करण्यात आली. या योजनात गरोदर स्त्रीयां व बाळांसाठी मोफत सेवा, नवजात आजारी बालकास तीस दिवसापर्यंत मोफत उपचार, गरोदर माता व बाळासाठी घरापासून दवाखान्यापर्यंत आणि परत घरी जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थेसह इतरही सेवा दिल्या जातात.चार मातांचा मृत्यूवर्ष २०१२-१३ या दोन मातांचा मृत्यु झाला यात उर्मीला सुरेश ठाकरे (२८) रा. लवारी हिचा मृत्यु २१ नोव्हेंबर २०१२ रोजी भंडाऱ्याहून नागपूरला नेतानी वाटेत झाला तर प्रभा गोपाल शेंदरे (२६) रा. सेंदुरवाफा या मातेचा मृत्यु दि. ७ डिसेंबर २०१२ ला बाळंतपनानंतर नागपूर येथे झाला तर सण २०१४ मध्ये प्रमिला रामु मरसकोल्हे (२५) रा. खैरी या मातेचा मृत्यू दि.२९ आॅक्टोबर २०१४ रोजी भंडारा येथे झाला तर सुषमा इंद्रराज वाघाडे (२५) रा. खांबा या मातेचा मृत्यु दि.१९ आॅक्टोबर २०१४ रोजी साकोली येथील एका खाजगी दवाखान्यात बाळतपणानंतर झाला.पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व २७ उपकेंद्रसाकोली तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला २४ तास आरोग्य सेवा मिळावी यासाठी साकोली तालुक्यात सानगडी, गोंडउमरी, विर्शी, एकोडी व खांबा या पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व २७ उपकेंद्र असून चांदोरी व वडद येथे आयुर्वेदीक दवाखाना आहे. यासाठी एक तालुका आरोग्य अधिकारी यांचेसह अकरा वैद्यकीय अधिकारी व ३५ आरोग्य सेविका कार्यरत आहेत.बालकांचा मृत्यूसण २०१३-१४ या वर्षात एक दिवस ते पाच वर्षापर्यंत ८० बालकांचा व सण २०१४-१५ या वर्षात ५० बालकांचा विविध आजाराने मृत्यू झाला आहे.माता बालकाकडे होते दुर्लक्षयासंदर्भात लोकमतने ग्रामीण भागातील नागरिकांशी यासंदर्भात चर्चा केली असता शासनाची योजना चांगली असली तरी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांच्याकडून मिळणारी वागणूक ही समाधानकारक नाही.