शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार काा दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
2
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
3
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
4
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
5
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
6
Lifelesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
7
जामताडा बनण्याच्या 'हे' शहर मार्गावर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
8
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
9
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
10
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
11
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
12
कशी आहे प्रणित मोरेची तब्येत? 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर टीमने केली पोस्ट
13
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
14
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
15
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
16
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
17
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
18
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
19
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
20
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

चार लाखांच्या ‘आरओ’ची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 21:57 IST

टंचाई कृती आराखड्यानुसार ज्या ठिकाणी वैनगंगा नदीचा दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्या गावांना शुद्ध पाण्याचे 'आरओ' देण्यात आले. दोनपैकी एक 'आरओ'ची ठाणा जुन्या वस्तीतील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणामुळे दुरवस्था झालेली आहे.

ठळक मुद्देठाणा ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : शुद्ध पाण्यासाठी महिलांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : टंचाई कृती आराखड्यानुसार ज्या ठिकाणी वैनगंगा नदीचा दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्या गावांना शुद्ध पाण्याचे 'आरओ' देण्यात आले. दोनपैकी एक 'आरओ'ची ठाणा जुन्या वस्तीतील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणामुळे दुरवस्था झालेली आहे.जिल्हा परिषद पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार शासनाने ज्या गावांना व वैनगंगा नदी काठावरील गावांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने आरओ प्रणालीला मंजुरी देण्यात आली. एका आरओची किंमत चार लक्ष रुपये या प्रमाणे ठाणा ग्रामपंचायतील दोन आरओ प्लांट देण्यात आले. दोन्ही आरओ प्लांट उभारण्याचे कंत्राट भंडारा येथील भोंगाडे नामक खासगी कंत्राटदाराला ग्रामपंचायतने दिले. एक आरओ प्लांट जुना ठाणा येथील आंगणवाडी केंद्रा समोरील हनुमान मंदिरालगत तर दुसरा आरओ प्लांट महात्मा फुले वॉर्ड क्रमांक पाचमधील कॅनरा बँकेलगत ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर उभारण्यात आले. 'लोकमत'ने मागील वर्षी अनेकदा बातमी प्रकाशित केली आहे. त्यांनतर वॉर्ड क्रमांक पाचमधील आरओ प्लांट सुरळीत सुरू आहे.मात्र जुना ठाणा येथील एटीएम दुरुस्तीच्या नावाखाली नवीन एटीएम लावण्यात आलेले नाही. फक्त सायंकाळी सरळ नळाद्वारे पाणी दिले जाते. कधी कधी सुरुच होत नाही. ज्या हातपंपाहूनच आरओ प्लांटकरिता पाणी घेण्यात येतो तो हातपंप जनतेच्या इतर कामासाठी पाणी देत नाही. तो हातपंप बंद अवस्थेत पडलेला आहे.जुना ठाणा येथील महिला व पुरुष अर्धा किलोमीटर दूर अंतरावरील दुसऱ्या हातपंपाहून पाणी घेऊन आणतात. विकत घेतलेल्या पैशाच्या एटीएमद्वारे पाणीच मिळत नसेल तर ते आरओ प्लांट कोणत्या कामाचे, असा सवाल आहे. चार लाख रुपये खर्च करुनही आरओची दुरवस्था झाली आहे.ग्रामपंचायतने करार पद्धतीने एक वर्षासाठी खासगी कंत्राटदार चालविण्यास दिले. कंत्राटदार म्हणतो, आज-उद्या दुरुस्त होणार, वर्ष लोटून गेले, करार संपूर्ण संपुष्टात आले. मात्र आता आरओची देखभाल कुणाकडे, असा प्रश्न पडला. याकडे संबंधित विभागाने सखोल चौकशी करुन दोषीींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याकडे वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.