शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांच्या ‘आरओ’ची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 21:57 IST

टंचाई कृती आराखड्यानुसार ज्या ठिकाणी वैनगंगा नदीचा दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्या गावांना शुद्ध पाण्याचे 'आरओ' देण्यात आले. दोनपैकी एक 'आरओ'ची ठाणा जुन्या वस्तीतील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणामुळे दुरवस्था झालेली आहे.

ठळक मुद्देठाणा ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : शुद्ध पाण्यासाठी महिलांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : टंचाई कृती आराखड्यानुसार ज्या ठिकाणी वैनगंगा नदीचा दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्या गावांना शुद्ध पाण्याचे 'आरओ' देण्यात आले. दोनपैकी एक 'आरओ'ची ठाणा जुन्या वस्तीतील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणामुळे दुरवस्था झालेली आहे.जिल्हा परिषद पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार शासनाने ज्या गावांना व वैनगंगा नदी काठावरील गावांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने आरओ प्रणालीला मंजुरी देण्यात आली. एका आरओची किंमत चार लक्ष रुपये या प्रमाणे ठाणा ग्रामपंचायतील दोन आरओ प्लांट देण्यात आले. दोन्ही आरओ प्लांट उभारण्याचे कंत्राट भंडारा येथील भोंगाडे नामक खासगी कंत्राटदाराला ग्रामपंचायतने दिले. एक आरओ प्लांट जुना ठाणा येथील आंगणवाडी केंद्रा समोरील हनुमान मंदिरालगत तर दुसरा आरओ प्लांट महात्मा फुले वॉर्ड क्रमांक पाचमधील कॅनरा बँकेलगत ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर उभारण्यात आले. 'लोकमत'ने मागील वर्षी अनेकदा बातमी प्रकाशित केली आहे. त्यांनतर वॉर्ड क्रमांक पाचमधील आरओ प्लांट सुरळीत सुरू आहे.मात्र जुना ठाणा येथील एटीएम दुरुस्तीच्या नावाखाली नवीन एटीएम लावण्यात आलेले नाही. फक्त सायंकाळी सरळ नळाद्वारे पाणी दिले जाते. कधी कधी सुरुच होत नाही. ज्या हातपंपाहूनच आरओ प्लांटकरिता पाणी घेण्यात येतो तो हातपंप जनतेच्या इतर कामासाठी पाणी देत नाही. तो हातपंप बंद अवस्थेत पडलेला आहे.जुना ठाणा येथील महिला व पुरुष अर्धा किलोमीटर दूर अंतरावरील दुसऱ्या हातपंपाहून पाणी घेऊन आणतात. विकत घेतलेल्या पैशाच्या एटीएमद्वारे पाणीच मिळत नसेल तर ते आरओ प्लांट कोणत्या कामाचे, असा सवाल आहे. चार लाख रुपये खर्च करुनही आरओची दुरवस्था झाली आहे.ग्रामपंचायतने करार पद्धतीने एक वर्षासाठी खासगी कंत्राटदार चालविण्यास दिले. कंत्राटदार म्हणतो, आज-उद्या दुरुस्त होणार, वर्ष लोटून गेले, करार संपूर्ण संपुष्टात आले. मात्र आता आरओची देखभाल कुणाकडे, असा प्रश्न पडला. याकडे संबंधित विभागाने सखोल चौकशी करुन दोषीींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याकडे वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.