शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

विदर्भ स्वतंत्र झाल्यास चार लाख नवीन नोकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

२८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करताना नागपूर करार करण्यात आला होता. त्यानुसार विदर्भाला २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के विकास निधी, मंत्रिमंडळात २३ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र सर्वच सरकारांनी या कराराचा भंग केला.

ठळक मुद्देराम नेवले : मोहाडी येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : विदर्भात सहाशे वर्ष संपणार नाही इतका लोह खनिज व कोळसा शिल्लक आहे. सध्या शेकडो कोटी रुपये महसूल येथून प्राप्त होत असल्याने स्वतंत्र विदर्भ करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेते विरोध करीत आहेत. जर विदर्भ स्वतंत्र झाला तर चार लाख नवीन नोकऱ्या उत्पन्न होतील व येथील बेरोजगार तरुणांना काम मिळेल, प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केले.मोहाडी येथील विश्रामगृहात विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा मोहाडीची सभा आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होत. सभेला आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा उषाताई के., जिल्हा संघटक विनोद बाबरे, तालुकाप्रमुख सुखदेव पात्रे, ज्ञानेन्द्र आगाशे, भाऊराव बनसोड, अशोक बुरडे, सुरेंद्र कुंबले, सदन देशमुख, आकाश निमकर, भूषण कुंभारे, अनिल भुरे उपस्थित होते.याप्रसंगी राम नेवले म्हणाले, २८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करताना नागपूर करार करण्यात आला होता. त्यानुसार विदर्भाला २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के विकास निधी, मंत्रिमंडळात २३ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र सर्वच सरकारांनी या कराराचा भंग केला. विदर्भाच्या चार लाख नोकऱ्या पळविल्या, उच्च पदाच्या नोकऱ्यांत २३ टक्के ऐवजी केवळ अडीच टक्के पदे दिली. ७५ हजार कोटी सिंचनाचे पळविले. विदर्भात आजही १२१ धरणे अपूर्ण आहेत. विदर्भाला कोरडा ठेवल्यामुळेच इथे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. महाराष्ट्र सरकारवर सहा लाख ७१ हजार कोटी रुपये कर्ज आहे आणि त्याचा ३० हजार कोटी रुपये केवळ व्याज भरावे लागतात. महाराष्ट्रात इतकी वीज निर्मिती होते की वेगळा विदर्भ झाल्यावर प्रत्येकाला २०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊन नंतरच्या युनिटचे बिल अर्धे द्यावे लागतील, आणि वाचलेली वीज विकून हजारो कोटी रुपये उत्पन्न मिळेल. विदर्भात मुबलक प्रमाणात खनिज संपत्ती, जंगल संपत्ती असल्याने विदर्भ राज्य देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून उदयास येईल. त्यामुळे या आंदोलनात युवकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, प्रत्येक घरातून एक तरुण विदर्भ आंदोलनाला द्यावा. १ मे रोजी होणाºया बंदला यशस्वी करावे असे आवाहन केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भjobनोकरी