शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कोरोना संकटात घरगुती वीज देयके माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

देशात व राज्यात आलेल्या कोरोना आपत्तीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, हातावर काम करणारे सुशिक्षित कामगार, छोटे दुकानदार, सलून व्यवसायीक, पानटपरी चालक, मॉल आणि इतर जागी काम करणाºया होरपळून निघालेले आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. दोनवेळच्या जेवणालाही ते महाग झालेले आहेत. अशा स्थितीत वीज देयके कसे भरावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा आहे.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांना निवेदन : ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संकटकाळातील वीज देयके माफ करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देशात व राज्यात आलेल्या कोरोना आपत्तीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, हातावर काम करणारे सुशिक्षित कामगार, छोटे दुकानदार, सलून व्यवसायीक, पानटपरी चालक, मॉल आणि इतर जागी काम करणाºया होरपळून निघालेले आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. दोनवेळच्या जेवणालाही ते महाग झालेले आहेत. अशा स्थितीत वीज देयके कसे भरावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा आहे.केंद्र शासनाने संकटात सापडलेल्या नागरिकांना सहकार्य करण्याची आवश्यकता असता त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे. सर्व सामान्यांना आर्थिक मदत करण्याऐवजी ते गरीब आणि भूके, तहानेण्या व्याकूळ झालेल्या मजुरांवर अत्याचार करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. अशा संकटकाळात किमान महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांवर कृपादृष्टी करून कोरोना काळातील वीज देयके माफ करून त्यांना जीवंत राहण्याचा मार्ग सुलभ करावा, अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्यावतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक, अध्यक्ष संजय मते, संयोजक सुकराम देशकर, राजेश इसापुरे, धमेंद्र बोरकर, जिजोबा पारधी, नरेंद्र पहाडे, शोभा बावनकर, वाडीभस्मे, राहूल दमाहे, पुरूषोत्तम नंदूरकर, पवन मस्के, गणेश निमजे, जीवन भजनकर, इमरान शेख, विलास साकुरे आदींचा समावेश होता.गावागावांत देयक माफ झाल्याच्या चर्चेला उधाणकोरोना संकटकाळात मीटर रिडिंग व घरापर्यंत वीज देयक प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे अनेकांनी तीन महिन्यांचे देयक अदा केलेले नाही. आता तीन महिन्याचे वीज देयक भरणे अनेकांना कठीण होणार आहे. गत तीन महिन्यात अनेकांना घरीच रहावे लागले. त्यामुळे त्यांच्यावर संकट आहे. अशा काळात आता वीज देयक भरणे कठीण झालेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे वीज देयक शासनाकडून माफ करण्यात येणार असल्याची चर्चा गावागावांत होत आहे. राज्य शासनाने संकटकाळातील घरगुती वीज ग्राहकांचे वीज देयक माफ करण्याची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :electricityवीज