उसर्रा : शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा मुंबई विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा किसान गर्जना संस्थापक राजेंद्र पटले यांनी तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, वर्ष २0१३-२0१४ हा वर्ष शेतकर्यांसाठी सुलताई वर्ष निघाला. या आर्थिक वर्षात निसर्गाने शेतकर्यांना खूप झोडपले. जास्त अतवृष्टीमुळे धानपिकाला कीड लागून अनेक शेत उध्वस्त झाले. अनेकांना धानाची उतारी ३0 टक्क्यापेक्षाही कमी झाली. अनेकांनी अक्षरश: धानाचे शेतसुद्धा पेटविले. पुन्हा आणखी गारपिटीमुळे उरलासुरला आधारही निसर्गाने हिसकावून घेतला. अशा कठीन संकटात शेतकरी आले. यातच विद्युत विभागाने शेतावरील वीज पंपाची जोडणी जोडणी कापण्याचा सपाटाच सुरू केला आहे. धान खरेदी केंद्र २00 रुपये बोनस सहीत सुरू करावे तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाई ७५00 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे घोषित केली आहे. ती अदा करावे. या अटी मान्य करुन जाहीर करावे अन्यथा विधान भवनावर मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा किसान गर्जना प्रमुख राजेंद्र पटले यांनी दिला आहे. (वार्ताहर)
शेतकर्यांचे कर्ज माफ करा
By admin | Updated: May 27, 2014 23:30 IST