शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करा

By admin | Updated: September 24, 2015 00:43 IST

सततची नापीकी व कर्जाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,...

साकोली : सततची नापीकी व कर्जाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सानगडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा वासनिक यांनी केली आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद होत असल्याने शेतातून उत्पादन कसे काढायचे व वितभर पोटाची खळगी कशी भरावी असा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर एक पर्यायी व्यवस्था म्हणून शेतविहीर, शेततळे यासारख्या जलस्त्रोतांची निर्मिती सरकारमार्फत करण्यात आली असली तरी काही शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची वाट न पाहता स्वत:च जलस्त्रोताची व्यवस्था केली.काही शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी वीज पंपाची जोडणी प्रलंबित आहे. वीज भारनियमनाच्या फटक्यामुळे सिंचन करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने याचा परिणाम पीक उत्पन्नावर होत असून विजमार नियमाचा फटका असतानाही वीज बिल मात्र जास्त येत असल्याची धान उत्पादक शेतकऱ्याची ओरड आहे. वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून धान उत्पादक शेतकरी उसणे उधार करून प्रथम कृषी पंप वीज बिलाचा भरणा करीत असतात. तरीपण नियमित वीजपुरवठा केला जात नाही. काही शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे कृषी वीज बिलाचा भरणा करू शकत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या शेतावरील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडत असून शेतमालाला कमी हमी भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेले शेतकरी कृषी पंप वीज बिलाचा भरणा करू शकत नाही, अशी गंभीर व हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)