शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करा

By admin | Updated: September 24, 2015 00:43 IST

सततची नापीकी व कर्जाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,...

साकोली : सततची नापीकी व कर्जाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सानगडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा वासनिक यांनी केली आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद होत असल्याने शेतातून उत्पादन कसे काढायचे व वितभर पोटाची खळगी कशी भरावी असा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर एक पर्यायी व्यवस्था म्हणून शेतविहीर, शेततळे यासारख्या जलस्त्रोतांची निर्मिती सरकारमार्फत करण्यात आली असली तरी काही शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची वाट न पाहता स्वत:च जलस्त्रोताची व्यवस्था केली.काही शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी वीज पंपाची जोडणी प्रलंबित आहे. वीज भारनियमनाच्या फटक्यामुळे सिंचन करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने याचा परिणाम पीक उत्पन्नावर होत असून विजमार नियमाचा फटका असतानाही वीज बिल मात्र जास्त येत असल्याची धान उत्पादक शेतकऱ्याची ओरड आहे. वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून धान उत्पादक शेतकरी उसणे उधार करून प्रथम कृषी पंप वीज बिलाचा भरणा करीत असतात. तरीपण नियमित वीजपुरवठा केला जात नाही. काही शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे कृषी वीज बिलाचा भरणा करू शकत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या शेतावरील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडत असून शेतमालाला कमी हमी भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेले शेतकरी कृषी पंप वीज बिलाचा भरणा करू शकत नाही, अशी गंभीर व हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)