शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

भंडारा विभागातील वनअधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:38 IST

विदर्भ दौऱ्यावेळी वनाधिकारी, वनपाल कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे केंद्रीय संघटक ललितकुमार उचीबगले, विभागीय अध्यक्ष ...

विदर्भ दौऱ्यावेळी वनाधिकारी, वनपाल कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे केंद्रीय संघटक ललितकुमार उचीबगले, विभागीय अध्यक्ष सय्यद ईरशाद महमूद अली, सचिव ए. डी. मेश्राम, उपाध्यक्ष अर्चना बडोले, कार्याध्यक्ष आय. एच. काटेखाये, महिलाध्यक्ष मनीषा रामटेके, सहसचिव दहिकर, आर. एस. तिबुडे, प्रलयकुमार डोरले, हरीश धार्मिक, एम. व्ही. शामकुवर, वनमजूर संघटनेचे केंद्रीय सदस्य एस. एन. खोब्रागडे, राजू झंझाड, दुर्गाप्रसाद मेहर, हरिश्चंद्र बुराडे, रामचंद्र कुर्जेकर, जयपाल सय्यम, रामेश्वर सेलोकर, वनपाल, वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते.

यावेळी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसून त्यांना पगाराची स्लिप दिली जात नाही. त्यामुळे संभ्रम असून कोणत्या महिन्याचा पगार आहे, किती वेतन कपात झाली याची माहिती मिळत नाही. यासोबतच नागपूर-वर्धा, गोंदिया विभागांत वन कर्मचाऱ्यांना प्रतिमहिना चारशे रुपये वाहतूक भत्ता दिला जात असतानाही भंडारा विभागात मात्र हा भत्ता मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. वनरक्षक, वनपालांना गणवेशाचे कापड किंवा त्याचे पैसे मिळालेले नाहीत. ग्रँड नसल्यावरून टाळाटाळ केली जात आहे, ही समस्या निकाली काढावी. पेट्रोलिंगकरिता वाहन द्यावे, वनरक्षक, वनपालांना वेळी-अवेळी जंगलात पेट्रोलिंगसाठी जावे लागते. यासाठी स्वतंत्र वाहन नसल्याने गैरसोय होत असून धक्कादायक म्हणजे कार्यालयाचे वाहन पेट्रोलिंगसाठी न्यायचे झाल्यास आधी डिझेल स्वतः घाला, मगच गाडी मिळेल, या अटीवर गाडी दिली जाते. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. वनमजूरांच्या भविष्यनिर्वाह निधी पुस्तकात गेल्या तीन वर्षांपासून नोंदी केलेल्या नाहीत, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. वंचित कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, अस्थायी वनमजुरांचे पगार झाले नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकरिता विनाविलंब पगार वाटपाची व्यवस्था करावी. रोजंदारी वनमजुरांची सेवाज्येष्ठता यादी अपडेट करावी.

पवनी वनपरिक्षेत्रामध्ये वन कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल हेतुपुरस्सरपणे लिहिलेले असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी. पवनी वनपरिक्षेत्रातील ज्या कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहारात सहकार्य केले नाही, अशा कर्मचाऱ्यांवर सूड उगवला जात आहे. यासोबतच पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रांतभेद करीत असल्याचाही यावेळी आरोप करण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांची २०१९-२० चे सीआर तपासून संबंधित वन अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सावरला सहक्षेत्रामध्ये मे २०२१ पासून क्षेत्र सहायकाचे पद रिक्त असताना वरिष्ठ वनपालांना डावलून आपल्या मर्जीतील वनरक्षकाला चार्ज दिल्याने कर्मचाऱ्यांची मानसिकता खालावली आहे. वरिष्ठ वनपालांना चार्ज देण्यात यावा, तसेच वन परिक्षेत्र अधिकारी सी. आर. वाईट लिहिण्याची धमकी देतात, याबाबत वरिष्ठांनी कारवाई करावी. साकोली वनक्षेत्रातील उधराम वघारे, एस. टी. टेंभुर्णे हे २०१५ साली सेवानिवृत्त झाले असतानाही त्यांना डीसीपीएसची रक्कम मिळालेली नाही. पांडुरंग शिवरकर हे बारमाही काम करीत असून त्यांनी महिनाभर काम केल्यावरही १३ दिवसांचा पगार दिला असल्याने अन्याय झाला आहे. वन मजुरांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी वनरक्षक, वनपाल संघटनेचे विभागीय अध्यक्ष सय्यद ईरशाद महमूद अली यांनी केली आहे.