शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पाहुणे पक्षी शिकाऱ्यांच्या निशाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:07 IST

तलावाच्या जिल्ह्यात हजारो मैलांचे अंतर कापून विदेशी पक्षी दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाºया या विदेशी पक्ष्यांवर मात्र आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. तलावात खाद्य शोधणाºया पक्ष्यांना निशाणा करून आपल्या जिभेचे चोचले पुरविले जात आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : भंडारा जिल्ह्यात लाखो विदेशी पक्ष्यांची सुरक्षा धोक्यात

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तलावाच्या जिल्ह्यात हजारो मैलांचे अंतर कापून विदेशी पक्षी दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाºया या विदेशी पक्ष्यांवर मात्र आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. तलावात खाद्य शोधणाºया पक्ष्यांना निशाणा करून आपल्या जिभेचे चोचले पुरविले जात आहे. अनेक पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक वनविभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.समशितोष्ण वातावरण, मुबलक खाद्य यामुळे पूर्व विदर्भात विदेशी पक्षी येतात. यंदाही हिवाळ्याच्या काळात जिल्ह्यातील तलावांवर विदेशी पक्षी उतरले आहेत.शेकडो प्रजातींच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने तलाव गजबजून गेले आहे. स्कॉटलंड, युरोप, आईसलँड, फ्रांस आदी देशातून पक्षी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. १० ते १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सध्या भंडारा जिल्ह्यात मुक्त संचार करताना दिसत आहे.मात्र या पक्ष्यांवर आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. विविध तलावांवर शिकारी आपले जाळे टाकून या पक्ष्यांची शिकार करीत असल्याचे दिसत आहे. या पक्ष्यांची शिकार करून शिकारी मांस विकत असल्याची माहिती आहे.अनेक पक्षी या शिकाºयांमुळे जखमीही होवून आपला प्राण गमावून बसतात. अतीशय देखणे असलेले शिकाºयांच्या तावडीत सापडत आहेत. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी या पक्ष्यांकडे दुर्लक्ष करतात. मोर, हरीण, रानडुक्कर आदी प्राण्यांची शिकार झाली की, वनविभागाचे पथक येवून धडकते. परंतु या पक्ष्यांची शिकार होत असताना कुणीही लक्ष देत नाही. जिल्ह्याचे वैभव असलेल्या या पक्ष्यांचे जतन करण्याची जबाबदारी वनविभागासोबतच स्थानिक नागरिकांची आहे. तेही याकडे कमालीचे दुर्लक्ष करतात. पक्षीप्रेमी केवळ गणणा आणि फोटो काढण्यातच व्यस्त दिसून येतात. सुरक्षेबाबत मात्र ते काही बोलायला तयार नाही.तलावांवर अतिक्रमणजिल्ह्याची ओळख तलावाचा जिल्हा म्हणून आहे. दीड हजारावर तलाव जिल्ह्यात आहेत. परंतु गत काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तलावाशेजारी शेती करणे सुरू केले असून शेतीसाठी तलावावर अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेक विदेशी पक्षी मुक्त संचार करताना घाबरतात. तसेच माणसांच्या गर्दीने ते येथे येण्याचे टाळत असल्याचे अलीकडच्या काळात दिसून येते.