शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

विदेशी पाहुणे पक्षी शिकाऱ्यांच्या निशाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:07 IST

तलावाच्या जिल्ह्यात हजारो मैलांचे अंतर कापून विदेशी पक्षी दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाºया या विदेशी पक्ष्यांवर मात्र आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. तलावात खाद्य शोधणाºया पक्ष्यांना निशाणा करून आपल्या जिभेचे चोचले पुरविले जात आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : भंडारा जिल्ह्यात लाखो विदेशी पक्ष्यांची सुरक्षा धोक्यात

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तलावाच्या जिल्ह्यात हजारो मैलांचे अंतर कापून विदेशी पक्षी दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाºया या विदेशी पक्ष्यांवर मात्र आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. तलावात खाद्य शोधणाºया पक्ष्यांना निशाणा करून आपल्या जिभेचे चोचले पुरविले जात आहे. अनेक पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक वनविभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.समशितोष्ण वातावरण, मुबलक खाद्य यामुळे पूर्व विदर्भात विदेशी पक्षी येतात. यंदाही हिवाळ्याच्या काळात जिल्ह्यातील तलावांवर विदेशी पक्षी उतरले आहेत.शेकडो प्रजातींच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने तलाव गजबजून गेले आहे. स्कॉटलंड, युरोप, आईसलँड, फ्रांस आदी देशातून पक्षी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. १० ते १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सध्या भंडारा जिल्ह्यात मुक्त संचार करताना दिसत आहे.मात्र या पक्ष्यांवर आता स्थानिक शिकाºयांचा डोळा आहे. विविध तलावांवर शिकारी आपले जाळे टाकून या पक्ष्यांची शिकार करीत असल्याचे दिसत आहे. या पक्ष्यांची शिकार करून शिकारी मांस विकत असल्याची माहिती आहे.अनेक पक्षी या शिकाºयांमुळे जखमीही होवून आपला प्राण गमावून बसतात. अतीशय देखणे असलेले शिकाºयांच्या तावडीत सापडत आहेत. या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी या पक्ष्यांकडे दुर्लक्ष करतात. मोर, हरीण, रानडुक्कर आदी प्राण्यांची शिकार झाली की, वनविभागाचे पथक येवून धडकते. परंतु या पक्ष्यांची शिकार होत असताना कुणीही लक्ष देत नाही. जिल्ह्याचे वैभव असलेल्या या पक्ष्यांचे जतन करण्याची जबाबदारी वनविभागासोबतच स्थानिक नागरिकांची आहे. तेही याकडे कमालीचे दुर्लक्ष करतात. पक्षीप्रेमी केवळ गणणा आणि फोटो काढण्यातच व्यस्त दिसून येतात. सुरक्षेबाबत मात्र ते काही बोलायला तयार नाही.तलावांवर अतिक्रमणजिल्ह्याची ओळख तलावाचा जिल्हा म्हणून आहे. दीड हजारावर तलाव जिल्ह्यात आहेत. परंतु गत काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तलावाशेजारी शेती करणे सुरू केले असून शेतीसाठी तलावावर अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेक विदेशी पक्षी मुक्त संचार करताना घाबरतात. तसेच माणसांच्या गर्दीने ते येथे येण्याचे टाळत असल्याचे अलीकडच्या काळात दिसून येते.