शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात गुणात्मक परिवर्तन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:03 IST

गत पाच वर्षात माझ्या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व बेरोजगारांसाठी मोठी कामे केली. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. गतवर्षी धानाला ५०० रुपये बोनस दिला. पुढील वर्षीही ५०० रुपये बोनस देण्यात येईल. उद्योगात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले असून शिक्षणात राज्य तिसºया क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस। तुमसर येथे महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत पाच वर्षात माझ्या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व बेरोजगारांसाठी मोठी कामे केली. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. गतवर्षी धानाला ५०० रुपये बोनस दिला. पुढील वर्षीही ५०० रुपये बोनस देण्यात येईल. उद्योगात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले असून शिक्षणात राज्य तिसºया क्रमांकावर आहे. आमच्या सरकारने पाच वर्षात राज्यात गुणात्मक परिवर्तन केले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा माणण्यासाठी काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा शनिवारी तुमसर शहरात पोहचली. त्यावेळी या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, नगरपरिषद उपाध्यक्ष कांचन कोडवानी, गीता कोंडेवार, बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे आदी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, डॉ.मधुसुदन गादेवार, जयप्रकाश भवसागर, मनोज सुखानी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येकाला घर देण्यात येणार आहे. वृद्धापकाळ योजनेत ६०० रुपयावरून १२०० रुपये मानधन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजपा सेनेचे सरकार उभे आहे. ४२ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली.सभेला सुनील लांजेवार, बाबू ठवकर, अनिल जिभकाटे, निशिकांत इलमे, गौरव नवरखेले, क्षीतीज भुरे, विक्रम लांजेवार, नगरसेवक राजा लांजेवार, मुन्ना पुंडे, प्रशांत खोब्रागडे, राजेश खोब्रागडे, विरेंद्र अंजनकर, ललीत शुक्ला, ललीत थानथराटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस