शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाच वर्षांची शिक्षा

By admin | Updated: November 2, 2014 22:28 IST

ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपीक व सहाय्यक लिपीक यांनी बनावट पावती बुक छापून १ लाख ४५,६४१ रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी ग्रामपंचायतच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले.

वरठी : ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपीक व सहाय्यक लिपीक यांनी बनावट पावती बुक छापून १ लाख ४५,६४१ रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी ग्रामपंचायतच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात वर्ग झाले. २८ आॅक्टोबरला अंतिम सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपी घनश्याम बोंदरे व धनलाल मेश्राम यांना पाच वर्षाचा सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. वरठी ग्रामपंचायत येथे घनश्याम गंगाराम बोंदरे हे वरिष्ठ लिपीक व धनलाल नत्थू मेश्राम हे सहाय्यक लिपीक म्हणून कार्यरत होते. दोघांकडे गावातून जमा होणारे पाणीपट्टी व घरकर वसूल करून पावती देण्याचे अधिकार होते. याचा गैरफायदा घेत दोघांनीही ग्रामपंचायतीच्या नावाचे बनावट पावती बुक तयार केले. त्यातून १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००३ या काळात गृहकर व पाणीपट्टी कर जमा करणाऱ्यांना बनावट पावती देण्यात आले. प्रत्यक्षात जमा झालेले कर आणि त्यांच्या नोंदीत तफावत होती व पावतीचा नोंदवहीत क्रमांकही वेगळा होता.पैसे भरूनही ग्रामपंचायतने मागणी बिलात भरलेले पैसे लागून आल्यामुळे काही जणांनी ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या. तत्कालीन सरपंच दिलीप उके यांनी तक्रारीची दखल घेवून ग्रामपंचायतमार्फत स्पेशल आॅडीट करून अनेक दिवसांपासून सुरु असलेला गोरखधंदा उघडकीस आणला. यासंदर्भात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भास्कर डोमळे यांनी पोलिसात २००४ मध्ये तक्रार दिली. त्यानुसार वरठी पोलिसांनी भादंवि ४२०, ४०८, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. सदर प्रकरण २००४ पासून न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान बोगस पावती प्रकरणात अनेक दस्तऐवजाची तपासणीसह हस्ताक्षर अहवाल मागविण्यात आले होते. याकरिता त्यावेळेचे सरपंच दिलीप उके, ग्रा.वि.अधिकारी मुनेश्वर तुरकर, लेखा परीक्षक यांच्यासह सात लोकांची साक्ष नोंदविण्यात आली. २८ आॅक्टोबरला झालेल्या सुनावणीदरम्यान घनश्याम बोंदरे व धनलाल मेश्राम यांना न्यायालयाने भादंवि ४०८ आर.डब्लू ३४ अंतर्गत पाच वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि भादंवि ४२० आर.डब्लू.३४ अन्वये पाच वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यानंतर दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली. ग्रामपंचायतच्यावतीने सरकारी वकील बी.एस. तामगाडगे यांनी बाजू मांडली. (वार्ताहर)