शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

महापुरात आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचा कोरोना संकटात जगण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST

वैनगंगा नदीला गतवर्षी महापूर आला होता. भंडारा तालुक्यातील जमनी येथे रूपचंद सदाशिव कांबळे (५०) आणि त्यांची पत्नी रत्नमाला रूपचंद ...

वैनगंगा नदीला गतवर्षी महापूर आला होता. भंडारा तालुक्यातील जमनी येथे रूपचंद सदाशिव कांबळे (५०) आणि त्यांची पत्नी रत्नमाला रूपचंद कांबळे (४५) या दोघांचा घरात शिरलेल्या पाण्याने बुडून मृत्यू झाला होता. २९ ऑगस्ट २०२० रोजी ही घटना घडली. या दोघांच्या मृत्यूने दुर्गा रूपचंद कांबळे (१७), सोनू (१४), मोनल (११), अमित (९), संयोगी (६) ही बालके निराधार झाली. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांनी लाखनी तालुक्यातील सिपेवाडाला आधार घेतला. गावातील मंडळींनी लोकवर्गणी करून त्यांना तांदूळ, किराणा, गहू घेऊन दिले. काही समाजसेवकांनीही मदत केली. कोरोना संकटात ही भावंडे याच लोकवर्गणीवर चरितार्थ चालवीत आहेत. अशातच प्रशासनाने मृत्युमुखी पडलेल्या कांबळे दाम्पत्यांच्या वारसांना ८ लाख रुपयांची मदत मंजूर केली. ही सर्व रक्कम लाखनी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्यात आली. प्रत्येक भावंडाच्या नावावर ही रक्कम समान भागात विभागून सामायिक खात्यात ठेवण्यात आली.

१२ वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी ही रक्कम ठेवण्यात आली असून त्यावरील व्याज काढून या पाच भावंडांना देण्याचे ठरविले होते. बँकेतून पैसे काढण्यासाठी कांबळे दाम्पत्याची मोठी मुलगी दुर्गा हिच्या स्वाक्षरीसोबतच उपविभागीय अधिकारी आणि भंडारा तहसीलदार यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. आता या घटनेला आठ महिने झाले आहेत. बँकेत जवळपास २३ हजार रुपये व्याजाचे जमा झाले आहेत. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दुर्गा भंडारा येथील तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी सोमवारी आली. मात्र, कोरोना संकटाचे कारण पुढे करीत त्यांना ३१ मेनंतर येण्याचा सल्ला दिला. हे चिमुकले भावंडं लहान तोंड करून गावी परतले.

एकीकडे प्रशासन कोरोनाबाधितांचे जीव वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. दुसरीकडे आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचे हक्काचे पैसे देण्यासाठी मात्र कोरोना संकटाचे नाव पुढे करीत आहेत. आठ महिन्यांपासून दुसऱ्यांच्या दानावर ही चिमुकले आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, आपले हक्काचे पैसे मिळाले तर सन्मानाने जगता येईल, असे दुर्गा कांबळे डोळ्यात पाणी आणून सांगत होती. लाखनी तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुनील कहालकर म्हणाले, कोरोना संकटात तरी या भावंडांना मदत करण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ता दिनेश वासनिक आणि सुनील या भावंडांना वेळोवेळी मदत करीत असून त्यांच्यासोबत प्रशासनाचे उंबरठेही झिजवीत आहेत.

बाॅक्स

ना रेशन कार्ड ना निराधारची मदत

आई-वडील गमावलेले पाच भावंडे एका झोपडीवजा घरात सिपेवाडा येथे राहतात. दुर्गा ही सर्व भावंडांत मोठी असल्याने तिचा सर्वांना आधार आहे. गावकरी ही या भावंडांच्या मदतीसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करतात. या कुटुंबांना अंत्योदयचे रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु अद्यापही ना रेशन कार्ड, ना निराधारची मदत त्यांना मिळाली.