शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

महापुरात आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचा कोरोना संकटात जगण्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:36 IST

वैनगंगा नदीला गतवर्षी महापूर आला होता. भंडारा तालुक्यातील जमनी येथे रूपचंद सदाशिव कांबळे (५०) आणि त्यांची पत्नी रत्नमाला रूपचंद ...

वैनगंगा नदीला गतवर्षी महापूर आला होता. भंडारा तालुक्यातील जमनी येथे रूपचंद सदाशिव कांबळे (५०) आणि त्यांची पत्नी रत्नमाला रूपचंद कांबळे (४५) या दोघांचा घरात शिरलेल्या पाण्याने बुडून मृत्यू झाला होता. २९ ऑगस्ट २०२० रोजी ही घटना घडली. या दोघांच्या मृत्यूने दुर्गा रूपचंद कांबळे (१७), सोनू (१४), मोनल (११), अमित (९), संयोगी (६) ही बालके निराधार झाली. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांनी लाखनी तालुक्यातील सिपेवाडाला आधार घेतला. गावातील मंडळींनी लोकवर्गणी करून त्यांना तांदूळ, किराणा, गहू घेऊन दिले. काही समाजसेवकांनीही मदत केली. कोरोना संकटात ही भावंडे याच लोकवर्गणीवर चरितार्थ चालवीत आहेत. अशातच प्रशासनाने मृत्युमुखी पडलेल्या कांबळे दाम्पत्यांच्या वारसांना ८ लाख रुपयांची मदत मंजूर केली. ही सर्व रक्कम लाखनी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्यात आली. प्रत्येक भावंडाच्या नावावर ही रक्कम समान भागात विभागून सामायिक खात्यात ठेवण्यात आली.

१२ वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी ही रक्कम ठेवण्यात आली असून त्यावरील व्याज काढून या पाच भावंडांना देण्याचे ठरविले होते. बँकेतून पैसे काढण्यासाठी कांबळे दाम्पत्याची मोठी मुलगी दुर्गा हिच्या स्वाक्षरीसोबतच उपविभागीय अधिकारी आणि भंडारा तहसीलदार यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. आता या घटनेला आठ महिने झाले आहेत. बँकेत जवळपास २३ हजार रुपये व्याजाचे जमा झाले आहेत. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दुर्गा भंडारा येथील तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी सोमवारी आली. मात्र, कोरोना संकटाचे कारण पुढे करीत त्यांना ३१ मेनंतर येण्याचा सल्ला दिला. हे चिमुकले भावंडं लहान तोंड करून गावी परतले.

एकीकडे प्रशासन कोरोनाबाधितांचे जीव वाचविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. दुसरीकडे आई-वडील गमावलेल्या पाच भावंडांचे हक्काचे पैसे देण्यासाठी मात्र कोरोना संकटाचे नाव पुढे करीत आहेत. आठ महिन्यांपासून दुसऱ्यांच्या दानावर ही चिमुकले आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, आपले हक्काचे पैसे मिळाले तर सन्मानाने जगता येईल, असे दुर्गा कांबळे डोळ्यात पाणी आणून सांगत होती. लाखनी तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष सुनील कहालकर म्हणाले, कोरोना संकटात तरी या भावंडांना मदत करण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ता दिनेश वासनिक आणि सुनील या भावंडांना वेळोवेळी मदत करीत असून त्यांच्यासोबत प्रशासनाचे उंबरठेही झिजवीत आहेत.

बाॅक्स

ना रेशन कार्ड ना निराधारची मदत

आई-वडील गमावलेले पाच भावंडे एका झोपडीवजा घरात सिपेवाडा येथे राहतात. दुर्गा ही सर्व भावंडांत मोठी असल्याने तिचा सर्वांना आधार आहे. गावकरी ही या भावंडांच्या मदतीसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करतात. या कुटुंबांना अंत्योदयचे रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु अद्यापही ना रेशन कार्ड, ना निराधारची मदत त्यांना मिळाली.