शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

पाच महिन्यांत १४८ अर्भक मृत्यू

By admin | Updated: September 27, 2014 23:08 IST

गर्भवती मातांची अंगणवाडी केंद्रात नोंद करून जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातांना सकस आहार दिला जातो. गर्भवती मातांना गर्भावस्थेत घ्यावयाच्या काळजी याबाबत माहिती दिली जाते.

आरोग्य यंत्रणा खिळखिळी : २५ बालकांसह सहा मातांचा मृत्यू प्रशांत देसाई - भंडारागर्भवती मातांची अंगणवाडी केंद्रात नोंद करून जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातांना सकस आहार दिला जातो. गर्भवती मातांना गर्भावस्थेत घ्यावयाच्या काळजी याबाबत माहिती दिली जाते. यावर शासनाच्या वतीने लाखोंचा खर्च करण्यात येत असला तरी भंडारा जिल्ह्यात पाच महिन्यात १४८ अर्भक मृत्यू झाले आहे. तर २५ बालमृत्यू असून ६ मातामृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.शासनाकडून गर्भवती महिला व बालकांवर लाखोंचा खर्च करण्यात येत असला तरी भंडारा जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येत आहे. १ एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात १४८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. तर १ ते ५ वयोगटातील २५ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असून याच कालावधीत सहा मातांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.आरोग्य विभागाच्या वतीने गर्भवती माता व बालकांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत. मात्र आरोग्य विभागाची यंत्रणा योजना चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्या आहेत. गर्भवती मातांना गर्भावस्थेत शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या योजना व सकस आहार अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाते. याचा लाभ घेण्याकरिता गर्भवती महिलेची अंगणवाडी केंद्रात नोंद करणे गरजेचे आहे. त्यांनतर गर्भवती महिलेला माता व बाल संगोपन करण्यासंबधीत माहिती अंगणवाडी केंद्रातील सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून दिली जाते. अंगणवाडीतून गर्भवती महिलेला जीवनसत्वयुक्त सकस आहार मोफत दिल्या जाते. तिचे दर महिन्याला अंगणवाडी केंद्रात वजन केल्या जाते. मानव विकास योजनेंतर्गत गर्भवती महिलेला आठव्या महिन्यात दोन हजार रूपये दिल्या जाते. प्रसुतीनंतर दोन हजार असे चार हजार रूपये शासनाकडून दिल्या जाते. यासोबतच जननी सुरक्षा योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व बीपीएल प्रवर्गातील महिलांना प्रसूतीनंतर सातशे रूपये देण्यात येते. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांना घरून दवाखान्यापर्यंत व प्रसुतीनंतर दवाखान्यातून घरी पोहचविण्याची मोफत सुविधा आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. ग्रामीण जनतेची नाळ जुडून असलेल्या शासकीय रूग्णालयात सुविधा नसल्या तरी अनेकांची प्रथम पसंती याच रूग्णालयाला आहे. सात तालुक्याच्या भंडारा जिल्हा मुख्यालयी जिल्हा सामान्य रूग्णालयाची निर्मिती केली आहे. पाच महिन्यात जिल्ह्यात मृत्यूने तांडव घातल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.