शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

लाखांदुरातील ‘आनंद मेळावा’ हा राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 00:19 IST

जनतेची कामे, विकास कामांची माहिती, शासकिय योजनांचा लाभ हा ठरलेल्या दिवशी किवा तारखेलाच होणे गरजेचे नाही ...

बाळा काशीवार यांचे प्रतिपादन: लाभार्थ्यांना वस्तूंचे वितरण लाखांदूर : जनतेची कामे, विकास कामांची माहिती, शासकिय योजनांचा लाभ हा ठरलेल्या दिवशी किवा तारखेलाच होणे गरजेचे नाही तर तालुक्याच्या ठिकाणी ‘आनंद मेळावा’ सारखे विशेष कार्यक्रमाची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी केले. लाखांदूर येथे आयोजित आनंद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे, मनोहर राऊत, माधुरी हुकरे, नगराध्यक्ष निलीमा हुमणे, पंचायत समिती सभापती मंगला बागमारे, ताहसीलदार विजय पवार, नगरपंचायत सदस्य विनोद ठाकरे, नरेश खरकाटे, प्रल्हाद देशमुख, हरीश बागमारे, वासुदेव तोंडरे, शिवाजी देशकर, खंडविकास अधिकारी देवरे उपस्थित होते. यावेळी आ.काशिवार म्हणाले, जनतेच्या लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आनंद मेळाव्यासारख्या कार्यक्रमातून शासकीय योजनांतून मिळणाऱ्या साहित्यांचे वाटप, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. नृत्य, गीत, पथनाट्य सादर करून कार्यक्रमाप्रसंगी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या वतीने रोगनिदान शिबिर, महिला बचत गटातील महिलांनी स्टाल लावले, सायकलचे वाटप, सिंचन विहिरींना मंजुरी प्रदान करण्यात आली. खंडाविकास अधिकारी देवरे यांनी आनंद मेळावा हा तालुक्यात दरवर्षी घेणार आहे. जिल्हास्तरावर हा मेळावा घेण्यात यावा, जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ घेता येईल. आभार विस्तार अधिकारी मेळे यानी मानले. (तालुका प्रतिनिधी)