शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

पहिल्या दिवशी २ लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: July 2, 2017 00:22 IST

जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून त्याचाच एक भाग म्हणून चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ आज शनिवारला जिल्हाभरात करण्यात आला. भंडारा जिल्ह्याला ७ लाख ६८ हजार वृक्षांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वनविभागाने १ लाख ३६ हजार ८४८, ग्रामपंचायत विभागाने ६३ हजार १५० व अन्य विभागाने २६०० असे एकूण २ लाख २ हजार ५९८ वृक्ष लावण्यात आले. ही आकडेवारी वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व शुध्द आॅक्सीजन मिळण्यासाठी शासनाने चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक विद्यार्थ्यांला वृक्षसंवर्धनासाठी दोन झाडे देण्यात येणार आहेत. ही झाडे तीन वर्ष जोपासणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी एक हजार रूपये, जास्त वृक्ष जगविणाऱ्या शाळेला दहा हजार रूपये तर जिल्ह्यात पहिल्या येणाऱ्या शाळेला २५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शनिवारला केली.वनविभागाच्यावतीने १ जुलै ते ७ जुलै वृक्ष लागवड सप्ताह माटोरा गावातील रोपवनात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वृक्षलागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुहास दिवसे व आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक वनिकरण विभागीय अधिकारी योगेश वाघाये, सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भोगे उपस्थित होते.वृक्ष लागवड सप्ताहानिमित्त जिल्ह्याला सात लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हयातील प्रत्येक शाळा, शासकीय कार्यालयात ७ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करता येणार आहे. ज्या नागरिकांनी किंवा संस्थांनी वृक्षारोपण केले नसेल त्यांनी आपल्या अवतीभोवतीच्या मोकळया जागेत ७ जुलैपर्यंत वृक्षारोपण करून या लोकअभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.