शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी २ लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: July 2, 2017 00:22 IST

जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून त्याचाच एक भाग म्हणून चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ आज शनिवारला जिल्हाभरात करण्यात आला. भंडारा जिल्ह्याला ७ लाख ६८ हजार वृक्षांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वनविभागाने १ लाख ३६ हजार ८४८, ग्रामपंचायत विभागाने ६३ हजार १५० व अन्य विभागाने २६०० असे एकूण २ लाख २ हजार ५९८ वृक्ष लावण्यात आले. ही आकडेवारी वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व शुध्द आॅक्सीजन मिळण्यासाठी शासनाने चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक विद्यार्थ्यांला वृक्षसंवर्धनासाठी दोन झाडे देण्यात येणार आहेत. ही झाडे तीन वर्ष जोपासणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी एक हजार रूपये, जास्त वृक्ष जगविणाऱ्या शाळेला दहा हजार रूपये तर जिल्ह्यात पहिल्या येणाऱ्या शाळेला २५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शनिवारला केली.वनविभागाच्यावतीने १ जुलै ते ७ जुलै वृक्ष लागवड सप्ताह माटोरा गावातील रोपवनात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वृक्षलागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुहास दिवसे व आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक वनिकरण विभागीय अधिकारी योगेश वाघाये, सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भोगे उपस्थित होते.वृक्ष लागवड सप्ताहानिमित्त जिल्ह्याला सात लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हयातील प्रत्येक शाळा, शासकीय कार्यालयात ७ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करता येणार आहे. ज्या नागरिकांनी किंवा संस्थांनी वृक्षारोपण केले नसेल त्यांनी आपल्या अवतीभोवतीच्या मोकळया जागेत ७ जुलैपर्यंत वृक्षारोपण करून या लोकअभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.