शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पहिल्या दिवशी २ लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: July 2, 2017 00:22 IST

जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जल, जंगल आणि जमिन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून त्याचाच एक भाग म्हणून चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ आज शनिवारला जिल्हाभरात करण्यात आला. भंडारा जिल्ह्याला ७ लाख ६८ हजार वृक्षांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वनविभागाने १ लाख ३६ हजार ८४८, ग्रामपंचायत विभागाने ६३ हजार १५० व अन्य विभागाने २६०० असे एकूण २ लाख २ हजार ५९८ वृक्ष लावण्यात आले. ही आकडेवारी वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व शुध्द आॅक्सीजन मिळण्यासाठी शासनाने चार कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक विद्यार्थ्यांला वृक्षसंवर्धनासाठी दोन झाडे देण्यात येणार आहेत. ही झाडे तीन वर्ष जोपासणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी एक हजार रूपये, जास्त वृक्ष जगविणाऱ्या शाळेला दहा हजार रूपये तर जिल्ह्यात पहिल्या येणाऱ्या शाळेला २५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शनिवारला केली.वनविभागाच्यावतीने १ जुलै ते ७ जुलै वृक्ष लागवड सप्ताह माटोरा गावातील रोपवनात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वृक्षलागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुहास दिवसे व आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक वनिकरण विभागीय अधिकारी योगेश वाघाये, सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भोगे उपस्थित होते.वृक्ष लागवड सप्ताहानिमित्त जिल्ह्याला सात लाख ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हयातील प्रत्येक शाळा, शासकीय कार्यालयात ७ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करता येणार आहे. ज्या नागरिकांनी किंवा संस्थांनी वृक्षारोपण केले नसेल त्यांनी आपल्या अवतीभोवतीच्या मोकळया जागेत ७ जुलैपर्यंत वृक्षारोपण करून या लोकअभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.