शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

कठोर मेहनतीने यशाचे शिखर गाठा

By admin | Updated: March 10, 2016 00:56 IST

युवकांनी जीवनात उच्च ध्येय ठेवून कठोर परिश्रम व सातत्य ठेवण्याची गरज आहे. यश निश्चित मिळू शकेल.

जिल्हास्तरीय युवा संमेलन : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादनभंडारा : युवकांनी जीवनात उच्च ध्येय ठेवून कठोर परिश्रम व सातत्य ठेवण्याची गरज आहे. यश निश्चित मिळू शकेल. आपण ध्येय निवडतांना त्यात प्रामाणिकपणा असावा. युवकांना स्वत:चे निर्णय स्वत: घेता आले पाहिजे. तुमच्या प्रत्येकात भरपूर उर्जा व बौध्दिक क्षमता आहे. त्याला कठोर मेहनतीची साथ दिल्यास जीवनात यशाचे शिखर गाठता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, जे. एम. पटेल महाविद्यालय यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा संमेलनात जिल्हाधिकारी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे तर अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक विनीता साहू, व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षक मिलींद पत्रे, युवा समन्वयक संजय माटे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र शाह उपस्थित होते. पोलिस अधीक्षक साहू म्हणाल्या, जिद्द व चिकाटीने आपले ध्येय प्राप्त होऊ शकते. त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. मी करु शकेल का ? हे म्हणण्यापेक्षा मी करु शकतो? हा दृष्टीकोण जीवनात सतत ठेवला पाहिजे. तुम्ही सुध्दा समाजात बदल घडवू शकता असा आत्मविश्वास युवकांनी जागृत ठेवला पाहिजे. असेही त्या म्हणाल्या. प्राचार्य डॉ. ढोमणे म्हणाले, युवकांनी उच्च ध्येय ठेवून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशिल असले पाहिजे. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घेऊन आपला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न मिलींद पत्रे यांनी व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंचा आराखडा विद्यार्थ्यांसमोर ठेवला. आपले ध्येय निश्चित ठेवण्यापासून तर ते प्राप्त करण्यापर्यंत असलेल्या आवश्यक गोष्टी युवकांसमोर मांडल्या. तसेच सकारात्मक मानसिकता कशी वृध्दींगत करावी याबद्दल सखोल विवेचन केले. १५ मिनीटे संगीतमय ध्यान घेऊन उपस्थितांना एक अनोखा शांतीपूर्ण अनुभव प्राप्त करुन दिला. प्रारंभी संजय माटे यांनी २०१४-१५ वषार्साठी उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार जाहिर केला. हा पुरस्कार साकोली तालुक्यातील नेहरु युवा मंडळ सोनपुरी यांना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ४२ हजार रुपयांचा धनादेश या स्वरुपात प्रदान करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते क्रिडा साहित्यांचे वाटप युवा मंडळांना करण्यात आले. प्रास्ताविक संजय माटे यांनी तर संचालन गणेश खडसे यांनी केले. आभार डॉ. राजेंद्र शाह यांनी मानले. कार्यक्रमासाठी रमेश अहिरकर, निकिता बोरकर, राहूल बांते, रक्षा सुखदेवे, ज्ञानेश बन्सोड, ऋषीकुमार सुपारे, मंगेश राऊत, मंजु भोयर, यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)