शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हवालदिल शेतकºयांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:53 IST

जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे.

ठळक मुद्देशेतपिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. किडींनी शेतातील उभे पीक फस्त केल्याने व शासनाने आश्वासनापलिकडे मदत न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून त्यांनी त्यांनी ही मागणी केली आहे. निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने तलावाचा जिल्हा असला तरी यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरमधील शेतजमीन पडीत राहिल्या. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकºयांवर कर्जाचे डोंगर पुन्हा उभे झाले. ऐनकेन प्रकारे काही शेतकºयांनी पाण्याची तडजोड करून शेतात पीक घेतले. मात्र हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने पुन्हा एकदा हिरावून घेतला.शेतातील उभ्या धानपिकासह अन्य पिकांना मावा, करपा, तुडतुडा यासह अन्य प्रकारच्या किडींच्या प्रादुर्भावाचा फटका बसला. अगोदरच आर्थिक संकट असलेल्या शेतकºयांची या अस्मानी संकटाने पुन्हा कंबर मोडली. दरम्यान गटसचिवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांचा पीकविमा काढण्यात आला होता. यात शेतकºयांकडून पैसे घेऊन पीकविम्याची हमी देण्यात आली होती. अशा शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्याऐवजी प्रशासनाने पळवाट काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक करण्याऐवजी पीकविम्याचा लाभ द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतीतील झालेल्या नुकसानीचे सर्वे प्रशासनाने तातडीने करावे व शेतकºयांना नुकसान भरपाईचा मोबदला द्यावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरण व शेतकºयांच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी सुहास दिवसे व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, उत्तम कळपाते, पारबता डोंगरे, ज्योती खवास, प्रेरणा तुरकर, प्रतीक्षा कटरे, ठाकसेन मुंगुसमारे, संगीता सोनवाने, गीता माटे, मनोरथा जांभुळे, सुरेश रहांगडाले आदी उपस्थित होते.कर्जमाफीचे भिजत घोंगडेराज्य शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळालेला नाही. या कर्जमाफीच्या अपेक्षेत शेतकरी असले तरी प्रशासनाने कुठल्याही शेतकºयाला कर्जमाफीचा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे रखडलेली ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरणाची कारवाई चुकीचीडोंगरला ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांची अनियमितता केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सात जणांना दोषी पकडून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसुल करण्याचे आदेश बजावले होते.या अनुषंगाने सुमारे सव्वा वर्षापूर्वी सहा जणांनी पैसे शासकीय तिजोरीत जमा करून अनियमिततेची रक्कम परत केली होती. तर एका व्यक्तीने अनियमितता न केल्याचा मुद्दा पुढे करून न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाचा निवाडा होण्यापूर्वीच व सव्वा वर्षापूर्वीचे प्रकरण पुन्हा उरकुन काढून चुकीच्या पद्धतीने या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई दाखल करण्यात आली आहे. एकाच प्रकरणात दुसºयांदा कारवाई करता येत नसताना ती करून जिल्हा प्रशासनाने चुक केली आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी यातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.