शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

हवालदिल शेतकºयांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:53 IST

जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे.

ठळक मुद्देशेतपिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. किडींनी शेतातील उभे पीक फस्त केल्याने व शासनाने आश्वासनापलिकडे मदत न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून त्यांनी त्यांनी ही मागणी केली आहे. निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने तलावाचा जिल्हा असला तरी यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरमधील शेतजमीन पडीत राहिल्या. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकºयांवर कर्जाचे डोंगर पुन्हा उभे झाले. ऐनकेन प्रकारे काही शेतकºयांनी पाण्याची तडजोड करून शेतात पीक घेतले. मात्र हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने पुन्हा एकदा हिरावून घेतला.शेतातील उभ्या धानपिकासह अन्य पिकांना मावा, करपा, तुडतुडा यासह अन्य प्रकारच्या किडींच्या प्रादुर्भावाचा फटका बसला. अगोदरच आर्थिक संकट असलेल्या शेतकºयांची या अस्मानी संकटाने पुन्हा कंबर मोडली. दरम्यान गटसचिवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांचा पीकविमा काढण्यात आला होता. यात शेतकºयांकडून पैसे घेऊन पीकविम्याची हमी देण्यात आली होती. अशा शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्याऐवजी प्रशासनाने पळवाट काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक करण्याऐवजी पीकविम्याचा लाभ द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतीतील झालेल्या नुकसानीचे सर्वे प्रशासनाने तातडीने करावे व शेतकºयांना नुकसान भरपाईचा मोबदला द्यावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरण व शेतकºयांच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी सुहास दिवसे व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, उत्तम कळपाते, पारबता डोंगरे, ज्योती खवास, प्रेरणा तुरकर, प्रतीक्षा कटरे, ठाकसेन मुंगुसमारे, संगीता सोनवाने, गीता माटे, मनोरथा जांभुळे, सुरेश रहांगडाले आदी उपस्थित होते.कर्जमाफीचे भिजत घोंगडेराज्य शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळालेला नाही. या कर्जमाफीच्या अपेक्षेत शेतकरी असले तरी प्रशासनाने कुठल्याही शेतकºयाला कर्जमाफीचा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे रखडलेली ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरणाची कारवाई चुकीचीडोंगरला ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांची अनियमितता केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सात जणांना दोषी पकडून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसुल करण्याचे आदेश बजावले होते.या अनुषंगाने सुमारे सव्वा वर्षापूर्वी सहा जणांनी पैसे शासकीय तिजोरीत जमा करून अनियमिततेची रक्कम परत केली होती. तर एका व्यक्तीने अनियमितता न केल्याचा मुद्दा पुढे करून न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाचा निवाडा होण्यापूर्वीच व सव्वा वर्षापूर्वीचे प्रकरण पुन्हा उरकुन काढून चुकीच्या पद्धतीने या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई दाखल करण्यात आली आहे. एकाच प्रकरणात दुसºयांदा कारवाई करता येत नसताना ती करून जिल्हा प्रशासनाने चुक केली आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी यातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.