शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

हवालदिल शेतकºयांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:53 IST

जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे.

ठळक मुद्देशेतपिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. किडींनी शेतातील उभे पीक फस्त केल्याने व शासनाने आश्वासनापलिकडे मदत न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून त्यांनी त्यांनी ही मागणी केली आहे. निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने तलावाचा जिल्हा असला तरी यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरमधील शेतजमीन पडीत राहिल्या. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकºयांवर कर्जाचे डोंगर पुन्हा उभे झाले. ऐनकेन प्रकारे काही शेतकºयांनी पाण्याची तडजोड करून शेतात पीक घेतले. मात्र हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने पुन्हा एकदा हिरावून घेतला.शेतातील उभ्या धानपिकासह अन्य पिकांना मावा, करपा, तुडतुडा यासह अन्य प्रकारच्या किडींच्या प्रादुर्भावाचा फटका बसला. अगोदरच आर्थिक संकट असलेल्या शेतकºयांची या अस्मानी संकटाने पुन्हा कंबर मोडली. दरम्यान गटसचिवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांचा पीकविमा काढण्यात आला होता. यात शेतकºयांकडून पैसे घेऊन पीकविम्याची हमी देण्यात आली होती. अशा शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्याऐवजी प्रशासनाने पळवाट काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक करण्याऐवजी पीकविम्याचा लाभ द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतीतील झालेल्या नुकसानीचे सर्वे प्रशासनाने तातडीने करावे व शेतकºयांना नुकसान भरपाईचा मोबदला द्यावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरण व शेतकºयांच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी सुहास दिवसे व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, उत्तम कळपाते, पारबता डोंगरे, ज्योती खवास, प्रेरणा तुरकर, प्रतीक्षा कटरे, ठाकसेन मुंगुसमारे, संगीता सोनवाने, गीता माटे, मनोरथा जांभुळे, सुरेश रहांगडाले आदी उपस्थित होते.कर्जमाफीचे भिजत घोंगडेराज्य शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळालेला नाही. या कर्जमाफीच्या अपेक्षेत शेतकरी असले तरी प्रशासनाने कुठल्याही शेतकºयाला कर्जमाफीचा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे रखडलेली ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरणाची कारवाई चुकीचीडोंगरला ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांची अनियमितता केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सात जणांना दोषी पकडून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसुल करण्याचे आदेश बजावले होते.या अनुषंगाने सुमारे सव्वा वर्षापूर्वी सहा जणांनी पैसे शासकीय तिजोरीत जमा करून अनियमिततेची रक्कम परत केली होती. तर एका व्यक्तीने अनियमितता न केल्याचा मुद्दा पुढे करून न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाचा निवाडा होण्यापूर्वीच व सव्वा वर्षापूर्वीचे प्रकरण पुन्हा उरकुन काढून चुकीच्या पद्धतीने या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई दाखल करण्यात आली आहे. एकाच प्रकरणात दुसºयांदा कारवाई करता येत नसताना ती करून जिल्हा प्रशासनाने चुक केली आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी यातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.