शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

हवालदिल शेतकºयांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:53 IST

जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे.

ठळक मुद्देशेतपिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांकडून पीकविम्याच्या दाव्यावर रक्कम घेण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. किडींनी शेतातील उभे पीक फस्त केल्याने व शासनाने आश्वासनापलिकडे मदत न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून त्यांनी त्यांनी ही मागणी केली आहे. निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने तलावाचा जिल्हा असला तरी यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरमधील शेतजमीन पडीत राहिल्या. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकºयांवर कर्जाचे डोंगर पुन्हा उभे झाले. ऐनकेन प्रकारे काही शेतकºयांनी पाण्याची तडजोड करून शेतात पीक घेतले. मात्र हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने पुन्हा एकदा हिरावून घेतला.शेतातील उभ्या धानपिकासह अन्य पिकांना मावा, करपा, तुडतुडा यासह अन्य प्रकारच्या किडींच्या प्रादुर्भावाचा फटका बसला. अगोदरच आर्थिक संकट असलेल्या शेतकºयांची या अस्मानी संकटाने पुन्हा कंबर मोडली. दरम्यान गटसचिवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांचा पीकविमा काढण्यात आला होता. यात शेतकºयांकडून पैसे घेऊन पीकविम्याची हमी देण्यात आली होती. अशा शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्याऐवजी प्रशासनाने पळवाट काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक करण्याऐवजी पीकविम्याचा लाभ द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतीतील झालेल्या नुकसानीचे सर्वे प्रशासनाने तातडीने करावे व शेतकºयांना नुकसान भरपाईचा मोबदला द्यावा अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरण व शेतकºयांच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी सुहास दिवसे व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, उत्तम कळपाते, पारबता डोंगरे, ज्योती खवास, प्रेरणा तुरकर, प्रतीक्षा कटरे, ठाकसेन मुंगुसमारे, संगीता सोनवाने, गीता माटे, मनोरथा जांभुळे, सुरेश रहांगडाले आदी उपस्थित होते.कर्जमाफीचे भिजत घोंगडेराज्य शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळालेला नाही. या कर्जमाफीच्या अपेक्षेत शेतकरी असले तरी प्रशासनाने कुठल्याही शेतकºयाला कर्जमाफीचा दिलासा दिलेला नाही. त्यामुळे रखडलेली ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.डोंगरला प्रकरणाची कारवाई चुकीचीडोंगरला ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांची अनियमितता केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सात जणांना दोषी पकडून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसुल करण्याचे आदेश बजावले होते.या अनुषंगाने सुमारे सव्वा वर्षापूर्वी सहा जणांनी पैसे शासकीय तिजोरीत जमा करून अनियमिततेची रक्कम परत केली होती. तर एका व्यक्तीने अनियमितता न केल्याचा मुद्दा पुढे करून न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाचा निवाडा होण्यापूर्वीच व सव्वा वर्षापूर्वीचे प्रकरण पुन्हा उरकुन काढून चुकीच्या पद्धतीने या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई दाखल करण्यात आली आहे. एकाच प्रकरणात दुसºयांदा कारवाई करता येत नसताना ती करून जिल्हा प्रशासनाने चुक केली आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी यातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.