लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बँकेचे अतीआवश्यक गरजू खातेदारांना पुढील चार महिन्याच्या आत रोख रक्कम परत देण्यात येणार असल्याचे लिखित स्वरूपात हमीपत्र दिल्याने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.येथील सहारा इंडिया बँकमध्ये अनेक ग्राहकांचे खाते असून त्यामध्ये अनेक खातेदारांनी गुंतवणूक केली होती. परंतु ग्राहकांची मॅच्युरिटी पूर्ण होऊनही त्यांना अजूनपर्यंत रोख रक्कम परत बँकेने दिली नाही. बँक पुन्हा रि- इन्व्हेस्टमेंट करा असे सांगून वेळ काळू पणा करत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर बँकेकडून ग्राहकांची होत असलेली फसवणूक थांबवावी, यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने १९ आॅगस्ट २०१९ मध्ये सहारा इंडिया बँकेचे प्रबंधक निरज डाबरा यांच्यासोबत चर्चा देखील केली होती. त्यावर बँक प्रबंधकांनी सर्व ग्राहकांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन हवेत विरले असल्याचे दिसून आल्यामुळे शिवसेनेच्या वतीने ८ जानेवारी २०२० रोजी ग्राहकांसोबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिस निरीक्षक मनोज सिडाम यांचा मध्यस्थीमुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहारा इंडिया बँकेच्या दालनात बसून खातेदारांचे पैसे परत करावे, यासाठी सहारा इंडिया बँकेच्या वरिष्ठांशी शिष्टमंडळाने चर्चा केली.सहारा इंडिया बँकेचे रिजनल मॅनजर प्रशांत आंबडकर, सेक्टर मॅनजर प्रशांत पांडे, झोनल कॉडीनेशन वर्कर नितीन मेहता यांनी चार महिन्याच्या आत रोख रक्कम परत देण्यात येणार असल्याचे लिखित स्वरूपात हमीपत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, शहर प्रमुख नितीन सेलोकर, बेरोजगार कृती समितीचे संयोजक तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख मोहनिष साठवणे, युवासेना तालुका प्रमुख संजू डहाके, युवासेना शहर प्रमुख प्रविण गुप्ता, नितेश वाडीभस्मे, निखिलेश गजभिये, शाखा प्रमुख राहूल बानासुरे, वामनराव पडोळे सह सहारा इंडिया बँकेचे खातेदार दिनेश पसिने, सविता गभणे, संदेश तिवारी, शारदा बोन्द्रे, आनंद जैस्वाल, वैभव साठवणे, यशोदा वलथरे सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखेर बँकेच्या खातेदारांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST
सहारा इंडिया बँकमध्ये अनेक ग्राहकांचे खाते असून त्यामध्ये अनेक खातेदारांनी गुंतवणूक केली होती. परंतु ग्राहकांची मॅच्युरिटी पूर्ण होऊनही त्यांना अजूनपर्यंत रोख रक्कम परत बँकेने दिली नाही. बँक पुन्हा रि- इन्व्हेस्टमेंट करा असे सांगून वेळ काळू पणा करत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर बँकेकडून ग्राहकांची होत असलेली फसवणूक थांबवावी, यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने १९ आॅगस्ट २०१९ मध्ये सहारा इंडिया बँकेचे प्रबंधक निरज डाबरा यांच्यासोबत चर्चा देखील केली होती. त्यावर बँक प्रबंधकांनी सर्व ग्राहकांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते.
अखेर बँकेच्या खातेदारांना मिळाला दिलासा
ठळक मुद्देशिवसेनेच्या आंदोलनाला यश : चार महिन्यांत मिळणार रक्कम