लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकल्या नंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी हवालदिल दिसत होते. अशातच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत आठ दिवसात धानाचे चुकारे करण्याचे निर्देश दिले आणि शनिवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. विधानसभा अध्यक्षांचा शब्द प्रमाण ठरल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.भंडारा जिल्हा १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ६६ केंद्रावर तब्बल ५२ कोटी रुपयांचा धान खरेदी करण्यात आला. मात्र महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे मिळत नव्हते. शेतकरी हवालदिल झाले होते. बँकांमध्ये जाऊन चौकशी करीत होते. परंतु उपयोग होत नव्हता. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले प्रथमच भंडारा जिल्ह्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी आठ दिवसाच्या आत शेतकºयांचे धानाचे पैसे खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सर्व सूत्र हालली आणि शनिवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पैसे काढण्यासाठी शेतकºयांची बँकेत गर्दी उडाली आहे.
अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे पैसे जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST
भंडारा जिल्हा १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ६६ केंद्रावर तब्बल ५२ कोटी रुपयांचा धान खरेदी करण्यात आला. मात्र महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे मिळत नव्हते. शेतकरी हवालदिल झाले होते. बँकांमध्ये जाऊन चौकशी करीत होते. परंतु उपयोग होत नव्हता. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले प्रथमच भंडारा जिल्ह्यात आले.
अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे पैसे जमा
ठळक मुद्देशेतकरी सुखावला : विधानसभा अध्यक्षांचा शब्द ठरला प्रमाण