शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

भरधाव ट्रकने इसमाला चिरडले

By admin | Updated: October 27, 2015 00:35 IST

रात्रपाळीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या सहायक वीज कर्मचाऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले.

ट्रक चालकाला अटक : जिल्हा परिषद चौकातील घटना, चौक ठरतोय धोकादायकभंडारा : रात्रपाळीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या सहायक वीज कर्मचाऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले. यात त्याला ट्रकने सुमारे एक कि.मी. फरफटत नेल्याची हृदयद्रावक भीषण घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद घडली. प्रदीप रविभाऊ उमाठे (३१) रा.एम.एस.ई.बी. वसाहत भंडारा असे मृतकाचे नाव आहे. मृतक प्रदीप हा मुळचा कोराडी येथील रहिवासी असून दोन महिन्यापूर्वीच तो भंडारा महावितरण विभागात रूजू झाला होता. नित्याप्रमाणे त्याची रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत टाकळी सबस्टेशनमध्ये ड्युटी होती. त्यामुळे तो नागपूर मार्गावरील मुख्यालयातून कर्तव्यावर जाण्यासाठी आपल्या एका सहकाऱ्याच्या दुचाकी एम.एच. ३६-४५१३ ने रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एकटाच निघाला होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील जिल्हा परिषद चौकात असलेल्या एका बिअरबारमधून दारु पिऊन चारचाकीतील काही जण निघाले. यांनी प्रदीपच्या दुचाकीला धडक दिल्याने तो राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीसह कोसळला. दरम्यान नागपूरकडून भरधाव आलेला ट्रक सी.जी. ०४ - डीएम ७३५७ च्या पुढील चाकात तो चिरडल्या गेला. दुचाकीसह तो ट्रकमध्ये फसल्याने ट्रकचालकाने त्याला कारधा मार्गावरील बैलबाजार चौकापर्यंत सुमारे एक कि.मी. पर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात प्रदीपचा ठार झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी ट्रकचा पाठलाग केला. सदर ट्रक चालकाला बैलबाजार परिसरात अडवून त्याची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. या भीषण अपघातानंतर मृतकाचे शरीर छिन्नविछिन्न झाल्याने त्याची ओळख पटण्यात बराच विलंब लागला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. (शहर प्रतिनिधी)कुटुंबावर कोसळले दु:खाचे डोंगरनागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील मुळच्या प्रदीपच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. दोन महिन्यापूर्वीच तो भंडारा येथील महावितरणच्या दक्षिण क्षेत्रात रूजू झाला. त्याच्या मागे पत्नी, दीड वर्षाची मुलगी, भाऊ व आईवडील असा परिवार आहे. प्रदीपच्या नोकरीवर रूजू होण्याने त्याची परिस्थिती सुधारेल अशी आशा आईवडिलांना होती. मात्र नियतीला हे मान्य नसल्याने काळाने त्याच्यावर झेप घेऊन कुटुंबातून त्याला हिरावले. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने उमाठे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.