शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

पूर्व विदर्भातील ३१ हजार हेक्टरवरील रोवणी उलटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:38 IST

पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने पूर्व विदर्भातील सुमारे ३१ हजार हेक्टरवरील भात रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देभात उत्पादक दुष्काळाच्या उंबरठ्यावरपावसाचा दीर्घ खंड

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने पूर्व विदर्भातील सुमारे ३१ हजार हेक्टरवरील भात रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. पऱहे पिवळे पडत असून रोवणी झालेल्या शेताला तडे पडले आहेत. अपुऱ्या पावसाने भात उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार १८७ हेक्टरवर भात पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा अपुºया पावसामुळे १५ जुलैपर्यंत केवळ ३१ हजार ६९१ हेक्टरवर म्हणजे ४ टक्केच रोवणी आटोपली आहे. भाताचा पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. परंतु यंदा सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्यांना निराश केले. मध्यंतरी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी पऱहे टाकले. काही शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सुविधेवर रोवणी केली. मात्र गत १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. उन्हाळ्यात सारखी उन तापत आहे. त्यामुळे नर्सरीतील पऱहे पिवळे पडत आहे. पऱहे वाचविण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर व इतर साधनाने पाणी देत आहे. रोवणी झालेल्या शेतांना तडे पडले आहेत.भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार १२५ हेक्टर भाताचे क्षेत्र असून आतापर्यंत ७ हजार २७५ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. गोंदिया जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ८३२ हेक्टरपैकी ४ हजार ४४० हेक्टरवर रोवणी झाली तर चंद्रपूर जिल्ह्यात ५ हजार ८९८ हेक्टर, गडचिरोली १३ हजार ८५१ आणि नागपूर जिल्ह्यात २२७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. पर्वू विदर्भात केवळ ४ टक्के रोवणी झाली. मात्र अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी आपल्या शेतात टाकलेले पऱहे पिवळे पडत आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास संपूर्ण भात पट्टा दुष्काळाच्या छायेत येण्याची भीती आहे. हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खोटा ठरत असून दररोज उन्हाळ्यासारखी ऊन तापत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.बॉक्सनदी-नाले कोरडेचअपुºया पावसाने नदी-नाल्यांना अद्यापही पुर गेला नाही. भंडारा जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगेचे पात्र अद्यापही कोरडे आहे. इतर नद्यांचीही अशीच अवस्था आहे. सिंचन प्रकल्पही तळाला लागले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही कायम आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीटंचाई