शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील ३१ हजार हेक्टरवरील रोवणी उलटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:38 IST

पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने पूर्व विदर्भातील सुमारे ३१ हजार हेक्टरवरील भात रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देभात उत्पादक दुष्काळाच्या उंबरठ्यावरपावसाचा दीर्घ खंड

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने पूर्व विदर्भातील सुमारे ३१ हजार हेक्टरवरील भात रोवणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. पऱहे पिवळे पडत असून रोवणी झालेल्या शेताला तडे पडले आहेत. अपुऱ्या पावसाने भात उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार १८७ हेक्टरवर भात पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा अपुºया पावसामुळे १५ जुलैपर्यंत केवळ ३१ हजार ६९१ हेक्टरवर म्हणजे ४ टक्केच रोवणी आटोपली आहे. भाताचा पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. परंतु यंदा सुरुवातीपासून पावसाने शेतकऱ्यांना निराश केले. मध्यंतरी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी पऱहे टाकले. काही शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सुविधेवर रोवणी केली. मात्र गत १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. उन्हाळ्यात सारखी उन तापत आहे. त्यामुळे नर्सरीतील पऱहे पिवळे पडत आहे. पऱहे वाचविण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर व इतर साधनाने पाणी देत आहे. रोवणी झालेल्या शेतांना तडे पडले आहेत.भंडारा जिल्ह्यात एक लाख ८० हजार १२५ हेक्टर भाताचे क्षेत्र असून आतापर्यंत ७ हजार २७५ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. गोंदिया जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ८३२ हेक्टरपैकी ४ हजार ४४० हेक्टरवर रोवणी झाली तर चंद्रपूर जिल्ह्यात ५ हजार ८९८ हेक्टर, गडचिरोली १३ हजार ८५१ आणि नागपूर जिल्ह्यात २२७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. पर्वू विदर्भात केवळ ४ टक्के रोवणी झाली. मात्र अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी आपल्या शेतात टाकलेले पऱहे पिवळे पडत आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास संपूर्ण भात पट्टा दुष्काळाच्या छायेत येण्याची भीती आहे. हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खोटा ठरत असून दररोज उन्हाळ्यासारखी ऊन तापत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.बॉक्सनदी-नाले कोरडेचअपुºया पावसाने नदी-नाल्यांना अद्यापही पुर गेला नाही. भंडारा जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगेचे पात्र अद्यापही कोरडे आहे. इतर नद्यांचीही अशीच अवस्था आहे. सिंचन प्रकल्पही तळाला लागले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही कायम आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater shortageपाणीटंचाई