शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कृषी विभागाच्या कारवाईची कृषी केंद्र चालकात धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:12 IST

कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या केंद्र चालकांना सूचना : केंद्रांसह गोदामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी, त्रृटी आढळल्यास कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खरीप हंगामात जादा दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांना लुटण्याऱ्या कृषी केंद्र चालकांना निलंबित केल्याने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांत धास्ती पसरली आहे. जादा दराने खत बियाण्यांच्या विक्रीसह पॉस मशीन व खतसाठा रजिस्टरवरील हिशोब जुळत नसल्याने कृषी विभागाकडून गत महिभरात अनेक कृषी केंद्रांवर करकारवाई करुन अनेक दुकानांचा विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.कृषी केंद्र चालकांविरुद्ध कारवाईची जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम उघडली आहे. यासाठी जिल्ह्यात आठ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. स्वत: जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड या पथकांवर लक्ष ठेवून दररोज दैनंदिन आढावा घेत आहेत.गत आठवड्यात जिल्ह्यात १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने एकाच वेळी रद्द करण्यात आले आहेत. पॉस मशीन व खत साठ्यात तफावत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली.यामध्ये मोहाडी तालुक्यातील दहा कृषी केंद्रांवर तर तुमसर तालुक्यातील दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत करडी परिसरातील सर्वाधिक कृषी केंद्रांचा समावेश आहे.कृषी विभागाने अचानक धाड मारली असता या कृषी केंद्रांत शासनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुकानदार बिलावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या न घेता त्यांना तसेच बिल दिल्याचेही दिसून आले. या सर्व कृषी केंद्र चालकांवर रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मोहीम अधिकारी विकास चौधरी, मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, तुमसर तालुका कृषी अधिकारी विलास काळे, मोहाडी पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र वंजारी, तुमसरचे संजय न्यायमूर्ती हे सहभागी झाले होते. खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. याबाबत तक्रारी वाढताच कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई सुरु राहिल्यास शेतकºयांना लुबाडण्याची दुकानदारांची हिंमत होणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र