शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कृषी विभागाच्या कारवाईची कृषी केंद्र चालकात धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:12 IST

कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या केंद्र चालकांना सूचना : केंद्रांसह गोदामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी, त्रृटी आढळल्यास कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खरीप हंगामात जादा दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांना लुटण्याऱ्या कृषी केंद्र चालकांना निलंबित केल्याने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांत धास्ती पसरली आहे. जादा दराने खत बियाण्यांच्या विक्रीसह पॉस मशीन व खतसाठा रजिस्टरवरील हिशोब जुळत नसल्याने कृषी विभागाकडून गत महिभरात अनेक कृषी केंद्रांवर करकारवाई करुन अनेक दुकानांचा विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.कृषी केंद्र चालकांविरुद्ध कारवाईची जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम उघडली आहे. यासाठी जिल्ह्यात आठ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. स्वत: जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड या पथकांवर लक्ष ठेवून दररोज दैनंदिन आढावा घेत आहेत.गत आठवड्यात जिल्ह्यात १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने एकाच वेळी रद्द करण्यात आले आहेत. पॉस मशीन व खत साठ्यात तफावत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली.यामध्ये मोहाडी तालुक्यातील दहा कृषी केंद्रांवर तर तुमसर तालुक्यातील दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत करडी परिसरातील सर्वाधिक कृषी केंद्रांचा समावेश आहे.कृषी विभागाने अचानक धाड मारली असता या कृषी केंद्रांत शासनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुकानदार बिलावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या न घेता त्यांना तसेच बिल दिल्याचेही दिसून आले. या सर्व कृषी केंद्र चालकांवर रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मोहीम अधिकारी विकास चौधरी, मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, तुमसर तालुका कृषी अधिकारी विलास काळे, मोहाडी पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र वंजारी, तुमसरचे संजय न्यायमूर्ती हे सहभागी झाले होते. खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. याबाबत तक्रारी वाढताच कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई सुरु राहिल्यास शेतकºयांना लुबाडण्याची दुकानदारांची हिंमत होणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र