शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

कृषी विभागाच्या कारवाईची कृषी केंद्र चालकात धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:12 IST

कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या केंद्र चालकांना सूचना : केंद्रांसह गोदामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी, त्रृटी आढळल्यास कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खरीप हंगामात जादा दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांना लुटण्याऱ्या कृषी केंद्र चालकांना निलंबित केल्याने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांत धास्ती पसरली आहे. जादा दराने खत बियाण्यांच्या विक्रीसह पॉस मशीन व खतसाठा रजिस्टरवरील हिशोब जुळत नसल्याने कृषी विभागाकडून गत महिभरात अनेक कृषी केंद्रांवर करकारवाई करुन अनेक दुकानांचा विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.कृषी केंद्र चालकांविरुद्ध कारवाईची जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम उघडली आहे. यासाठी जिल्ह्यात आठ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. स्वत: जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलींद लाड या पथकांवर लक्ष ठेवून दररोज दैनंदिन आढावा घेत आहेत.गत आठवड्यात जिल्ह्यात १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने एकाच वेळी रद्द करण्यात आले आहेत. पॉस मशीन व खत साठ्यात तफावत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने एकत्रित कारवाई केली.यामध्ये मोहाडी तालुक्यातील दहा कृषी केंद्रांवर तर तुमसर तालुक्यातील दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत करडी परिसरातील सर्वाधिक कृषी केंद्रांचा समावेश आहे.कृषी विभागाने अचानक धाड मारली असता या कृषी केंद्रांत शासनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दुकानदार बिलावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या न घेता त्यांना तसेच बिल दिल्याचेही दिसून आले. या सर्व कृषी केंद्र चालकांवर रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मोहीम अधिकारी विकास चौधरी, मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, तुमसर तालुका कृषी अधिकारी विलास काळे, मोहाडी पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र वंजारी, तुमसरचे संजय न्यायमूर्ती हे सहभागी झाले होते. खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक कृषी केंद्र चालकांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. याबाबत तक्रारी वाढताच कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई सुरु राहिल्यास शेतकºयांना लुबाडण्याची दुकानदारांची हिंमत होणार नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र