शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

'तो' दोषपूर्ण रस्ता मृत्युमार्ग ठरणार !

By admin | Updated: May 14, 2015 00:25 IST

राज्य शासनाने देव्हाडी-माडगी मार्गावरील पूल बांधण्याकरिता मोजकाच निधी मंजूर केल्याने बायपास रस्त्याला कात्री लावण्यात ...

बायपासकरिता निधी नाही : देव्हाडी-माडगी मार्गावरील पुलाची उंची केव्हा वाढणार?मोहन भोयर तुमसरराज्य शासनाने देव्हाडी-माडगी मार्गावरील पूल बांधण्याकरिता मोजकाच निधी मंजूर केल्याने बायपास रस्त्याला कात्री लावण्यात आली. या मार्गावर सध्या जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार मार्गक्रमण करीत आहेत. केवळ ५० फुटावर बावनथडी प्रकल्प वितरिकेचे पुल उंच तयार केल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरला आहे. दोषपूर्ण बांधकामासंदर्भात तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग मृत्यूमार्ग ठरण्याची शक्यता आहे.पुलाच्या बांधकामाकरिता निधी मिळावा याकरिता विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडण्यात आला होता. जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे रस्ता वर्ग करण्यात आला. १९ लक्ष ७३ हजाराचा निधी मंजूर झाला. २५ टक्के बिलो मध्ये रस्ता बांधकामाचे काम कंत्राटदाराने घेतले. निधीच्या कमतरतेमुळे बायपास रस्त्याला कात्री लावण्यात आली. कच्चा रस्ता येथे तयार करण्यात आला. पायदळ व सायकलस्वाराकरिता हा रस्ता आहे. परंतु दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून येथून प्रवास करतात. ५० फुटावर बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेचे पुल येथे तयार करण्यात आले. हा पुल अतिशय उंच आहे. निर्माणाधिन पुल खाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची उंची वाढविली तर ३२ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने तक्रार केली. परंतु त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या उंचवट्यामुळे हा मार्ग अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. जिल्हा परिषदेकडून २०१३ मध्ये हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आला. २० वर्षानी प्रमुख जिल्हा मार्ग राज्याकडे वर्ग करण्यात येतो. या रस्त्याावरील हा पुल कारखान्याने ५० वर्षापूर्वी बांधला होता. प्रकल्पाचा पुल उंच बांधला तर सार्वजनिक बांधकाम खात्याने सुद्धा पुल उंच बांधण्याची गरज होती. निधी कमी आहे म्हणून दोषपूर्ण बांधकाम करण्याची गरज नाही. केवळ मागणी आहे म्हणून कामे पार पाडण्याची गरज नव्हती. तांत्रिक त्रुट्या संदर्भात प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे ही समस्या मांडण्याची गरज होती. तांत्रिक त्रुट्यांमुळे हा रस्ता अपघातग्रस्त ठरण्याची भीती आहे.बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांना उंच पुलाबद्दल तक्रार करण्यात आली. निधीअभावी बायपास रस्ता तयार करण्यात आला नाही. केवळ सायकल व पायदळ वाहतूक सुरु आहे. जबरदस्तीने दुचाकीस्वार प्रवास करतात. पुलाच्या बांधकामासंदर्भात वरिष्ठांकडून आदेश प्राप्त आहे.- बी.एम. परिहारकनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तुमसर.