शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

‘त्या’ विद्यार्थ्यांना प्रवासाचा थकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:23 IST

नागपूर विभागांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना झालेला त्रास हा त्यांनी केलेला प्रवास व अन्य कारणांमुळे होऊ शकतो, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : प्रकरण सावरण्यासाठी प्रशासनाची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर विभागांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना झालेला त्रास हा त्यांनी केलेला प्रवास व अन्य कारणांमुळे होऊ शकतो, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली.रविवारी दुपारी २.३० वाजता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, उपजिल्हा आरोग्य अधिकारी निखील डोकरीमारे उपस्थित होते.पांचाळ म्हणाले की, नागपूर विभागातील आदिवासी विकास विभागाच्या आठ प्रकल्पातील जवळपास २७०० मुले व ४०० शिक्षकांचा स्टाफ भंडारा येथे डेरेदाखल झाला. या प्रकल्पातून आलेल्या विद्यार्थ्यांनी पहाटे चार वाजतापासून प्रवास सुरु केला होता. दुपारचे जेवण विद्यार्थी व शिक्षकांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे केले. नंतर मैदानावर सराव सुद्धा केला. सराव व उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, डोकेदुखी व अन्य त्रास उद्भवल्यामुळे प्रकल्प कार्यालयातील आरोग्य समितीतील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. एकुण १९३ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून १९ विद्यार्थी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी १५ विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. १२ पैकी दोन विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण तर सात विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्रवास आणि झोपेच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना पित्त आणि त्रास झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पांचाळ यांनी स्पष्ट केले. जिल्हा क्रीडा संकुलातून अन्न व पाण्याचे नमुने एफडीए आणि आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच नेमके काय घडले होते कळेल, असेही पांचाळ यांनी सांगितले.डॉ.प्रमोद खंडाते म्हणाले की, रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी २० डॉक्टरांची चमू जिल्हा क्रीडा संकुलात उपस्थित आहे. यापैकी काल घडलेल्या प्रकारामुळे डॉक्टरांची प्रत्येकी चमूने प्रकल्प निहाय विद्यार्थ्यांची तपासणी केली.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कुठलीही हयगय आम्ही सहन करणार नाही. अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाली असेल व यात जो कोणी दोषी असेल त्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे.- गीता सिडाम, सभापती, महिला व बालकल्याण समिती, न.प. भंडारा

टॅग्स :Studentविद्यार्थी