शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ट्रकबाहेर लोंबकळणाऱ्या सळाखी ठरताहेत जीवघेण्या

By admin | Updated: December 29, 2014 00:56 IST

राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक साहित्याची नियमबाह्यरीत्या वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाली आहे.

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक साहित्याची नियमबाह्यरीत्या वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. ट्रक किंवा अन्य वाहतुक करणाऱ्या वाहनांबाहेर सळाखी, लोखंडी कांबी, अँगल, आणि पत्रे घेऊन जाताना दिसत आहेत. याकडे पोलीस, महामार्ग पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या मुंबई- कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेले आहे. या महामार्गावर भंडारा, लाखनी व साकोली ही तीन शहरे वसली आहेत. जिल्ह्यात या महामार्गाची लांबी जवळपास ७२ किलोमीटर इतकी आहे. या महामार्गाहून दिवसाकाठी हजारो वाहनांची वाहतूक होत असते. यात बहुतांश वाहतुक नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे दिसुन येते. क्षमतेपेक्षा जास्त साहित्यांचे वहन, वाहनाबाहेर लोंबकळणारे साहित्य, किंवा वाहनात क्षमतेपेक्षा जास्त उंचीपर्यंत भरलेल्या साहित्याची वाहतुक होत असते. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काय म्हणतो नियम?सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात सआदेश दिले आहेत. नियमा%माणे ट्रकबाहेर कुठलीही वस्तु लोंबकळत ठेवू नये. मात्र वाहनाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार किंवा त्यांनी मागितल्यास विशेष परवानगी देण्यात येते. ही कारवाई ‘वाहन परवान्यापेक्षा जास्त वस्तुंची वाहतुक’ या सदरात मोडते. धोका दर्शविण्यासाठी वाहनाच्या मागील बाजुला लाल कापड किंवा लाल दिवा सुरू ठेवणे आवश्यक आहे. याकडे वाहन चालक दुर्लक्ष करतात. दंडात्मक कारवाईची गरज आहे.महामार्गावर नेहमी वर्दळभंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत बहुतांश शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका तर कुठेकुठे आठवडी बाजार भरत असतो. त्यामुळे अत्यंत रहदारी असणाऱ्या या मार्गावर अशा नियमबाह्य ‘लोडेड’ वाहतुकीचा फटका बसू शकतो. (प्रतिनिधी)