शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

परतीचा पाऊस लांबण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST

पालांदूर : परतीचा पाऊस लांबण्याच्या शक्यतेने धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. चुलबंद खोऱ्यात हंगाम अंतिम टप्प्यात आला असून ...

पालांदूर : परतीचा पाऊस लांबण्याच्या शक्यतेने धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. चुलबंद खोऱ्यात हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पाऊस लांबल्यास हलक्या धानाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे धान पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या हंगामावर उठलेला आहे. हप्ताभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. धान पिकाचा हंगाम जोमात असला तरी नियमित पाऊस चिंतेचा झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली तर निश्चितच अपेक्षित हंगाम हाती लागणार आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतात हलका धान आठवडाभरात काढणीला येणार आहे. मात्र निसर्गाची टांगती तलवार शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे. जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्येसुद्धा पाऊस कोसळत आहे. जलसाठे पूर्णत्वाकडे जात असून काही ठिकाणी ओव्हर फ्लोचे चित्र अनुभवायला येत आहे. कापणी योग्य धान पावसाच्या दणक्यात मातीमोल होत आहे. लोंबी जड होत असल्याने संकट उभे आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही हंगाम हातचा जाण्याची शक्यता आहे.

हलका ते मध्यम कालावधीचे धान कापणी योग्य झालेले आहेत. नियमित पाऊस व ढगाळ हवामानाने भारी धानसुद्धा लवकरच फुलोऱ्यावर येत आहेत. अशा संकटसमयी शेतकरी चिंतातुर असून करावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा मान्सून राजस्थानमधून माघार घेतो. गत पाच वर्षांचा अभ्यास घेतला असता १५ सप्टेंबरनंतरच मान्सूनने माघार घेतलेली आहे. राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर यापूर्वी ठरविण्यात आली होती. परंतु हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊस लांबत असल्याचे दिसत आहे.

धान पिकावर रोगराईचे संकट!

नियमित ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर रोगराईचे संकट आहे. करपा, कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी, रसशोषक कीडी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. पावसामुळे फवारणीचे नियोजन फसत आहे. फवारणी न केल्यास अपेक्षित धान पीक हाती येण्याची शक्यता अत्यल्प आहे. लोंबी न भरणे, मानमोडी, हळद्या रोग, तुडतुडा यासारख्या रोगांची लागण दिसत आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढत आहे. परतीचा पाऊस अधिकच लांबल्यास हंगाम ओल्या दुष्काळाच्या छायेत जाण्याची दाट शक्यता आहे.

कोट

धान परिपक्व होऊन कापणी योग्य आहे. नियमित पाऊस व वाऱ्याने धान झोपलेला आहे. हंगाम हाती घेऊन डोळ्यांच्या समोर मातीमोल होत असल्याने हृदयाचे ठोके वाढलेले आहेत.

गजानन शिवणकर

शेतकरी ढिवरखेडा