शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

कर्जमुक्तीपासून शेतकरी वंचित राहणार

By admin | Updated: July 2, 2017 00:20 IST

शेतीविषयक कर्ज भरण्याची ३० मार्च ही शेवटची तारीख असते. यानंतर राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली आहे.

त्रुटीचा फटका बसणार : पश्चिम महाराष्ट्राला अधिक फायदामोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतीविषयक कर्ज भरण्याची ३० मार्च ही शेवटची तारीख असते. यानंतर राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नसल्याची माहिती आहे. उलट पश्चिम महाराष्ट्रात ३० जून ही कर्ज परतफेड करण्याची तारीख असल्याने त्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार आहे.भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था व व्यापारी बँकेकडून कर्ज घेतो. सन २०१६ मध्ये एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी कर्ज काढले होते. ३० मार्च २०१७ मध्ये ते भरण्याची मुदत होती. मुदतीनंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यासह गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून नगदी पीक म्हणून ऊस लागवड करण्यात येते. वित्तीय वर्ष मार्चनंतर एप्रिल महिन्यात येथील शेतकरी कर्ज काढतो. विशेषत: भंडारा जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तथा सोसायटी, पतसंस्था कडून कर्ज काढतो. राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. एप्रिल २०१६ मध्ये काढलेला पीक कर्ज मार्च २०१७ मध्ये भरावयाचा होता. मार्च महिन्यानंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे मार्चनंतर कर्ज माफी मिळणार नाही असा फतवा सहकार विभागाने काढला आहे. या बँकानी व सोसायट्यांनी कर्जमाफी करण्यात नकार दिला आहे. जिल्ह्यातील शेतकरी यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. उत्तर पश्चिम महाराष्ट्रात ३० जून कर्ज परतफेड करण्याची तारीख आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तारीख ३० जून आहे. कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नसल्याने त्यांच्यात असंतोष व्याप्त आहे. कर्जमाफीनंतरही कर्जाची परतफेड येथे शेतकऱ्यांना करावी लागणार काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शेतकरी कर्जमाफीची माहिती जाणून घेतली. अभ्यासाअंती भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही अटींमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडे आपण यासंदर्भात पाठपुरावा करून पावसाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरणार आहे.- चरण वाघमारे, आमदार तुमसरसहकार विभागाने जिल्हा बँका व सोसायट्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आदेश देण्याची मागणी आ. चरण वाघमारे यांचेकडे केली आहे. भंडारा जिल्हा धान व ऊस उत्पादक जिल्हा असून येथील शेतकरी जिल्हा बँकाकडूनच कर्ज घेतात. कर्जमाफीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळावा. - हिरालाल नागपूरे, गटनेते पं.स. तुमसर.