शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कर्जमुक्तीपासून शेतकरी वंचित राहणार

By admin | Updated: July 2, 2017 00:20 IST

शेतीविषयक कर्ज भरण्याची ३० मार्च ही शेवटची तारीख असते. यानंतर राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली आहे.

त्रुटीचा फटका बसणार : पश्चिम महाराष्ट्राला अधिक फायदामोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतीविषयक कर्ज भरण्याची ३० मार्च ही शेवटची तारीख असते. यानंतर राज्य शासनाने कर्ज माफी जाहीर केली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नसल्याची माहिती आहे. उलट पश्चिम महाराष्ट्रात ३० जून ही कर्ज परतफेड करण्याची तारीख असल्याने त्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार आहे.भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था व व्यापारी बँकेकडून कर्ज घेतो. सन २०१६ मध्ये एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी कर्ज काढले होते. ३० मार्च २०१७ मध्ये ते भरण्याची मुदत होती. मुदतीनंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यासह गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून नगदी पीक म्हणून ऊस लागवड करण्यात येते. वित्तीय वर्ष मार्चनंतर एप्रिल महिन्यात येथील शेतकरी कर्ज काढतो. विशेषत: भंडारा जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तथा सोसायटी, पतसंस्था कडून कर्ज काढतो. राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. एप्रिल २०१६ मध्ये काढलेला पीक कर्ज मार्च २०१७ मध्ये भरावयाचा होता. मार्च महिन्यानंतर राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे मार्चनंतर कर्ज माफी मिळणार नाही असा फतवा सहकार विभागाने काढला आहे. या बँकानी व सोसायट्यांनी कर्जमाफी करण्यात नकार दिला आहे. जिल्ह्यातील शेतकरी यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. उत्तर पश्चिम महाराष्ट्रात ३० जून कर्ज परतफेड करण्याची तारीख आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तारीख ३० जून आहे. कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नसल्याने त्यांच्यात असंतोष व्याप्त आहे. कर्जमाफीनंतरही कर्जाची परतफेड येथे शेतकऱ्यांना करावी लागणार काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शेतकरी कर्जमाफीची माहिती जाणून घेतली. अभ्यासाअंती भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही अटींमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडे आपण यासंदर्भात पाठपुरावा करून पावसाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरणार आहे.- चरण वाघमारे, आमदार तुमसरसहकार विभागाने जिल्हा बँका व सोसायट्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आदेश देण्याची मागणी आ. चरण वाघमारे यांचेकडे केली आहे. भंडारा जिल्हा धान व ऊस उत्पादक जिल्हा असून येथील शेतकरी जिल्हा बँकाकडूनच कर्ज घेतात. कर्जमाफीचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळावा. - हिरालाल नागपूरे, गटनेते पं.स. तुमसर.