शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शेतकऱ्यांनो, फवारणी करताना काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:30 IST

जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

ठळक मुद्देविषबाधेच्या घटनात वाढ : कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागते. अनेक शेतकरी कीड लवकर नियंत्रणात यावी यासाठी अतिजहाल किटकनाशके फवारतात. त्यातून विषबाधेचे प्रमाण गत काही वर्षापासून वाढल्या आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये विषबाधेचे रुग्ण आढळून आले. गतवर्षी अनेक शेतकºयांना आपला जीव गमवावा लागला.यानंतर वरिष्ठ पातळीवर खळबळ उडाली. शेतकºयांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यता आले. मात्र त्यानंतरही विषबाधेच्या घटना भंडारासह विदर्भात घडत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढून फवारणीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे.फवारणीसाठी स्वतंत्र पंप वापरावा. साधनातील औषधी पुर्णपणे निघून गेली आहे याची खात्री करावी. किटकनाशकाचे रिकामे डब्बे नष्ट करावे, वाºयाचा वेग कमी असताना फवारणी करावी, फवारणीसाठी स्वतंत्र पोषाख व बुट वापरावा, फवारणी करताना समानवेगाने चालावे.शक्यतो हातमोचे, चष्मा व मास्क वापरावा. इतर कामासाठी वापरताना साबनाने दोन-तीन वेळा हात धुवावे आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशके फवारण्यापुर्वी दिलेल्या माहिती पत्रकाचे वाचन करून त्यानुसार त्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.किटकनाशकात विषाचे प्रमाण किती आहे हे किटकनाशकाच्या डब्यावर नोंदविले असते. त्याचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य काळजी घेतल्यास विषबाधेच्या घटनेला आळा बसू शकतो. शेतकऱ्यांनी या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले आहे. शेतकºयात जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही स्वत: काळजी घेतल्यास असे प्रकार टाळले जाऊ शकतात.फवारणी करताना दक्षता महत्वाचीफवारणी करताना शेतकरी आणि शेतमजुरांनी दक्षता घेण्याची गरज आहे. खाद्य पदार्थ व इतर औषधी लहान मुलांच्या संपर्कात येवू देवू नये, फवारणी करताना बिडी, सिगारेट, तंबाखूपान करू नये. हाता-पायावर जखम असलेल्या व्यक्तीची फवारणीसाठी निवड करू नये, मुदत संपलेली किटकनाशके वापरू नये, फवारणीच्या गळक्या साधनांचा वापर करू नये आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशक खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नये या दक्षता घेतल्यास विषबाधेला पायबंद बसू शकते.