शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांनो, फवारणी करताना काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:30 IST

जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

ठळक मुद्देविषबाधेच्या घटनात वाढ : कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागते. अनेक शेतकरी कीड लवकर नियंत्रणात यावी यासाठी अतिजहाल किटकनाशके फवारतात. त्यातून विषबाधेचे प्रमाण गत काही वर्षापासून वाढल्या आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये विषबाधेचे रुग्ण आढळून आले. गतवर्षी अनेक शेतकºयांना आपला जीव गमवावा लागला.यानंतर वरिष्ठ पातळीवर खळबळ उडाली. शेतकºयांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यता आले. मात्र त्यानंतरही विषबाधेच्या घटना भंडारासह विदर्भात घडत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढून फवारणीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे.फवारणीसाठी स्वतंत्र पंप वापरावा. साधनातील औषधी पुर्णपणे निघून गेली आहे याची खात्री करावी. किटकनाशकाचे रिकामे डब्बे नष्ट करावे, वाºयाचा वेग कमी असताना फवारणी करावी, फवारणीसाठी स्वतंत्र पोषाख व बुट वापरावा, फवारणी करताना समानवेगाने चालावे.शक्यतो हातमोचे, चष्मा व मास्क वापरावा. इतर कामासाठी वापरताना साबनाने दोन-तीन वेळा हात धुवावे आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशके फवारण्यापुर्वी दिलेल्या माहिती पत्रकाचे वाचन करून त्यानुसार त्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.किटकनाशकात विषाचे प्रमाण किती आहे हे किटकनाशकाच्या डब्यावर नोंदविले असते. त्याचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य काळजी घेतल्यास विषबाधेच्या घटनेला आळा बसू शकतो. शेतकऱ्यांनी या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले आहे. शेतकºयात जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही स्वत: काळजी घेतल्यास असे प्रकार टाळले जाऊ शकतात.फवारणी करताना दक्षता महत्वाचीफवारणी करताना शेतकरी आणि शेतमजुरांनी दक्षता घेण्याची गरज आहे. खाद्य पदार्थ व इतर औषधी लहान मुलांच्या संपर्कात येवू देवू नये, फवारणी करताना बिडी, सिगारेट, तंबाखूपान करू नये. हाता-पायावर जखम असलेल्या व्यक्तीची फवारणीसाठी निवड करू नये, मुदत संपलेली किटकनाशके वापरू नये, फवारणीच्या गळक्या साधनांचा वापर करू नये आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशक खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नये या दक्षता घेतल्यास विषबाधेला पायबंद बसू शकते.