शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शेतजमिनीच्या न्यायासाठी शेतकऱ्याची धडपड

By admin | Updated: May 18, 2016 00:33 IST

तालुक्यातील पालांदूर चौ. जवळ असलेल्या किटाडी येथील चंद्रभान मारोती हेडाऊ यांना भूमीधारी हक्काने ...

तहसीलदाराकडून कारवाईस टाळाटाळ : जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपलीलाखनी : तालुक्यातील पालांदूर चौ. जवळ असलेल्या किटाडी येथील चंद्रभान मारोती हेडाऊ यांना भूमीधारी हक्काने वहिवाटीकरिता गट नं. ३२४, १०.११ हे. आर. पैकी १.०० हे.आर. शेतजमीन इ.स. १९७५ - ७६ मध्ये सरकारी पट्यासहीत मिळाली असताना गावातीलच एका गर्भश्रीमंत पाटलाने, गरीबी व अडाणीपचाचा फायदा घेवून फर्जी कागदपत्राच्या आधारावर शेतजमिनीवर कब्जा केल्याचे जिल्हाधिकारी भंडारा व उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांचे प्राप्त पत्रानुसार स्पष्ट झाले असताना सुद्धा तहसीलदार लाखनी यांचे कार्यवाहीच्या प्रतिक्षेत न्यायाची मागणी पीडित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.शासनाकडून सरकारी पट्ट्यासहीत चंद्रभान मारोती हेडाऊ किटाडी यांना मिळालेल्या शेतजमिनीची १७ वर्षे मशागत करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असताना, निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थिती ओढावून वारंवार नापिकी यातच पीडित शेतकरी हेडावू यांनी प्रकृती खालावल्यामुळे जमिनीतून पिक घेणे अशक्य होवून परिस्थिती गरीब व हालाखीची असल्यामुळे पैशाची अडचण भासून कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविण्याकरिता व स्वत:चे उपचाराकरिता पैशाची अडचण असल्यामुळे गावातील व पाटील (मयत) प्रभाकर घाटबांधे यांचेकडून काही उसनवारी रक्कम घेतली. पीडित शेतकऱ्याच्या अडचणीचा व अडाणीपणाचा फायदा घेत त्याचे मालकी शेतजमिनीवर कायम स्वरुपी कब्जा करून घेण्याचा कट कारस्थान रचून तसे कागदपत्र तयार करून शेतजमिनीची मशागत करणे सुरु केले. अनेक वेळा शेतजमिनीवरील कब्जा सोडण्याबाबत पीडित शेतकरी चंद्रभान हेडावू यांनी विनंती केली असता अरेरावी करून जिवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे हेडावू यांनी तंटामुक्त गाव समितीकडे अर्ज केला असता त्यांनी सुद्धा शेतजमिनी मालक चंद्रभान हेडावू यांना जमीन परत देण्याचा निर्णय दिला. परंतु घाटबांधे यांनी कुठल्याही निर्णयाला न जुमानता सर्व अधिकारी माझ्या खिशात आहेत या वृत्तीला चालना देवून जमीन परत करण्यास नकार दिला. प्रकरण पो.स्टे. पालांदूर चौ. येथे दाखल केले असता कलम १४५ जा.फौ. नुसार दाखल करून सन २००९ मध्ये उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांचे न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले असता घाटबांधे यांनी पीडित शेतकरी हेडावू यांची कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करून बनावट व बेकायदेशिर दस्ताऐवज असल्याचे निर्णय देवून प्रकरण सन २०१४ ला निकाली काढून पुढील कारवाईकरिता तहसीलदार लाखनी यांना आदेश जारी केले. परंतु तहसीलदार यांनी टाळाटाळ करून प्रकरण दाबून ठेवले.पीडित शेतकरी यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना प्रत्यक्ष भेटून आपबिती समस्या विशद करून सांगितली असता जिल्हाधिकारी यांनी दि. ६.१०.२०१५ ला तहसीलदार लाखनी यांना कारवाई पूर्ण करण्यासंबंधीचे पत्र दिले असताना सुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई न करता न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून जिल्हाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्यामुळे दोन वर्षापासून आजपर्यंत भूमीधारी हक्काने मिळालेल्या शेतजमिनीच्या न्यायासाठी पीडित शेतकरी चंद्रभान हेडावू किटाडी हा प्रतिक्षेतच आहे. या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालविण्याकरिता पूर्ववत शेतजमिनीचा कब्जा मालकी हक्क असलेल्या हेडावू यांना देण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)