शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
5
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
6
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
7
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
8
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
9
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
10
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
11
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
12
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
13
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
14
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
15
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
16
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
17
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
18
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
19
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
20
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!

शेतजमिनीच्या न्यायासाठी शेतकऱ्याची धडपड

By admin | Updated: May 18, 2016 00:33 IST

तालुक्यातील पालांदूर चौ. जवळ असलेल्या किटाडी येथील चंद्रभान मारोती हेडाऊ यांना भूमीधारी हक्काने ...

तहसीलदाराकडून कारवाईस टाळाटाळ : जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपलीलाखनी : तालुक्यातील पालांदूर चौ. जवळ असलेल्या किटाडी येथील चंद्रभान मारोती हेडाऊ यांना भूमीधारी हक्काने वहिवाटीकरिता गट नं. ३२४, १०.११ हे. आर. पैकी १.०० हे.आर. शेतजमीन इ.स. १९७५ - ७६ मध्ये सरकारी पट्यासहीत मिळाली असताना गावातीलच एका गर्भश्रीमंत पाटलाने, गरीबी व अडाणीपचाचा फायदा घेवून फर्जी कागदपत्राच्या आधारावर शेतजमिनीवर कब्जा केल्याचे जिल्हाधिकारी भंडारा व उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांचे प्राप्त पत्रानुसार स्पष्ट झाले असताना सुद्धा तहसीलदार लाखनी यांचे कार्यवाहीच्या प्रतिक्षेत न्यायाची मागणी पीडित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.शासनाकडून सरकारी पट्ट्यासहीत चंद्रभान मारोती हेडाऊ किटाडी यांना मिळालेल्या शेतजमिनीची १७ वर्षे मशागत करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असताना, निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थिती ओढावून वारंवार नापिकी यातच पीडित शेतकरी हेडावू यांनी प्रकृती खालावल्यामुळे जमिनीतून पिक घेणे अशक्य होवून परिस्थिती गरीब व हालाखीची असल्यामुळे पैशाची अडचण भासून कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविण्याकरिता व स्वत:चे उपचाराकरिता पैशाची अडचण असल्यामुळे गावातील व पाटील (मयत) प्रभाकर घाटबांधे यांचेकडून काही उसनवारी रक्कम घेतली. पीडित शेतकऱ्याच्या अडचणीचा व अडाणीपणाचा फायदा घेत त्याचे मालकी शेतजमिनीवर कायम स्वरुपी कब्जा करून घेण्याचा कट कारस्थान रचून तसे कागदपत्र तयार करून शेतजमिनीची मशागत करणे सुरु केले. अनेक वेळा शेतजमिनीवरील कब्जा सोडण्याबाबत पीडित शेतकरी चंद्रभान हेडावू यांनी विनंती केली असता अरेरावी करून जिवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे हेडावू यांनी तंटामुक्त गाव समितीकडे अर्ज केला असता त्यांनी सुद्धा शेतजमिनी मालक चंद्रभान हेडावू यांना जमीन परत देण्याचा निर्णय दिला. परंतु घाटबांधे यांनी कुठल्याही निर्णयाला न जुमानता सर्व अधिकारी माझ्या खिशात आहेत या वृत्तीला चालना देवून जमीन परत करण्यास नकार दिला. प्रकरण पो.स्टे. पालांदूर चौ. येथे दाखल केले असता कलम १४५ जा.फौ. नुसार दाखल करून सन २००९ मध्ये उपविभागीय दंडाधिकारी साकोली यांचे न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले असता घाटबांधे यांनी पीडित शेतकरी हेडावू यांची कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करून बनावट व बेकायदेशिर दस्ताऐवज असल्याचे निर्णय देवून प्रकरण सन २०१४ ला निकाली काढून पुढील कारवाईकरिता तहसीलदार लाखनी यांना आदेश जारी केले. परंतु तहसीलदार यांनी टाळाटाळ करून प्रकरण दाबून ठेवले.पीडित शेतकरी यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना प्रत्यक्ष भेटून आपबिती समस्या विशद करून सांगितली असता जिल्हाधिकारी यांनी दि. ६.१०.२०१५ ला तहसीलदार लाखनी यांना कारवाई पूर्ण करण्यासंबंधीचे पत्र दिले असताना सुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई न करता न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून जिल्हाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखविल्यामुळे दोन वर्षापासून आजपर्यंत भूमीधारी हक्काने मिळालेल्या शेतजमिनीच्या न्यायासाठी पीडित शेतकरी चंद्रभान हेडावू किटाडी हा प्रतिक्षेतच आहे. या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालविण्याकरिता पूर्ववत शेतजमिनीचा कब्जा मालकी हक्क असलेल्या हेडावू यांना देण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)