शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

वनविभागाच्या आगीत शेतपिके स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 00:42 IST

वनविभागाने जंगल परिसरातील शेतझाडे जाळण्यासाठी आग लावली. या आगीच्या ज्वाळा शेतात पोहचल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील पिके

५० लाखांचे नुकसान : शेतकऱ्याने केली नुकसानभरपाईची मागणीभंडारा : वनविभागाने जंगल परिसरातील शेतझाडे जाळण्यासाठी आग लावली. या आगीच्या ज्वाळा शेतात पोहचल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील पिके व फळझाडे जळाल्याचा प्रकार माडगी शेतशिवारात घडला. यात शेतकऱ्याचे ५० लाख रुपयाचे नुकसान झाले. माडगी येथील शेतकरी कवडू शांतलवार यांचे माडगी शेतशिवारात शेत आहे. गट क्रमांक ३४९/१ हा त्यांचा मुलगा पराग यांच्या नावाने तर गट क्रमांक ४१९/२ हे प्रज्वल या मुलांच्या नावाने आहेत. दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याने या शेतीची देखभाल व उत्पादन घेण्याची जबाबदारी वडील कवडू शांतलवार यांच्यावर आहे. या शेतीमध्ये पराग व प्रज्वल हे शेती उत्पादनासोबतच फळबागाचे उत्पादन घेतात. मंगळवारला नित्याप्रमाणे कवडू घरी असताना दुपारच्या सुमारास त्यांची शेती जळत असल्याची माहिती लगतच्या शेतकऱ्याने त्यांना दिली. या माहितीवरून ते शेतमजुरासह शेतात आग विझविण्यासाठी गेले. महत्प्रयासाने आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान या आगीत गटक्रमांक ३४९/१ मधील २० वर्षाची आठ चिकूची झाडे पूर्णपणे जळाली. तर पाच ते सहा झाडे आगीच्या ज्वाळात सापडल्याने ते पूर्णपणे जळाले. तर गट क्रमांक ४१९/२ मधील तीन वर्षांची पाच सीताफळाचे झाडे पूर्णपणे जळून खाक झाले.वनविभागाने पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीमुळे शेतातील झाडे जळाल्याचा आरोप कवडू शांतलवार यांनी केला आहे. या आगीत त्यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाई देऊन बेकायदेशीरपणे आग लावणाऱ्या वनविभागावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी शांतलवार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)