शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

वनविभागाच्या आगीत शेतपिके स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 00:42 IST

वनविभागाने जंगल परिसरातील शेतझाडे जाळण्यासाठी आग लावली. या आगीच्या ज्वाळा शेतात पोहचल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील पिके

५० लाखांचे नुकसान : शेतकऱ्याने केली नुकसानभरपाईची मागणीभंडारा : वनविभागाने जंगल परिसरातील शेतझाडे जाळण्यासाठी आग लावली. या आगीच्या ज्वाळा शेतात पोहचल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील पिके व फळझाडे जळाल्याचा प्रकार माडगी शेतशिवारात घडला. यात शेतकऱ्याचे ५० लाख रुपयाचे नुकसान झाले. माडगी येथील शेतकरी कवडू शांतलवार यांचे माडगी शेतशिवारात शेत आहे. गट क्रमांक ३४९/१ हा त्यांचा मुलगा पराग यांच्या नावाने तर गट क्रमांक ४१९/२ हे प्रज्वल या मुलांच्या नावाने आहेत. दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याने या शेतीची देखभाल व उत्पादन घेण्याची जबाबदारी वडील कवडू शांतलवार यांच्यावर आहे. या शेतीमध्ये पराग व प्रज्वल हे शेती उत्पादनासोबतच फळबागाचे उत्पादन घेतात. मंगळवारला नित्याप्रमाणे कवडू घरी असताना दुपारच्या सुमारास त्यांची शेती जळत असल्याची माहिती लगतच्या शेतकऱ्याने त्यांना दिली. या माहितीवरून ते शेतमजुरासह शेतात आग विझविण्यासाठी गेले. महत्प्रयासाने आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान या आगीत गटक्रमांक ३४९/१ मधील २० वर्षाची आठ चिकूची झाडे पूर्णपणे जळाली. तर पाच ते सहा झाडे आगीच्या ज्वाळात सापडल्याने ते पूर्णपणे जळाले. तर गट क्रमांक ४१९/२ मधील तीन वर्षांची पाच सीताफळाचे झाडे पूर्णपणे जळून खाक झाले.वनविभागाने पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीमुळे शेतातील झाडे जळाल्याचा आरोप कवडू शांतलवार यांनी केला आहे. या आगीत त्यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाई देऊन बेकायदेशीरपणे आग लावणाऱ्या वनविभागावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी शांतलवार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)