शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या आगीत शेतपिके स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 00:42 IST

वनविभागाने जंगल परिसरातील शेतझाडे जाळण्यासाठी आग लावली. या आगीच्या ज्वाळा शेतात पोहचल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील पिके

५० लाखांचे नुकसान : शेतकऱ्याने केली नुकसानभरपाईची मागणीभंडारा : वनविभागाने जंगल परिसरातील शेतझाडे जाळण्यासाठी आग लावली. या आगीच्या ज्वाळा शेतात पोहचल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील पिके व फळझाडे जळाल्याचा प्रकार माडगी शेतशिवारात घडला. यात शेतकऱ्याचे ५० लाख रुपयाचे नुकसान झाले. माडगी येथील शेतकरी कवडू शांतलवार यांचे माडगी शेतशिवारात शेत आहे. गट क्रमांक ३४९/१ हा त्यांचा मुलगा पराग यांच्या नावाने तर गट क्रमांक ४१९/२ हे प्रज्वल या मुलांच्या नावाने आहेत. दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याने या शेतीची देखभाल व उत्पादन घेण्याची जबाबदारी वडील कवडू शांतलवार यांच्यावर आहे. या शेतीमध्ये पराग व प्रज्वल हे शेती उत्पादनासोबतच फळबागाचे उत्पादन घेतात. मंगळवारला नित्याप्रमाणे कवडू घरी असताना दुपारच्या सुमारास त्यांची शेती जळत असल्याची माहिती लगतच्या शेतकऱ्याने त्यांना दिली. या माहितीवरून ते शेतमजुरासह शेतात आग विझविण्यासाठी गेले. महत्प्रयासाने आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान या आगीत गटक्रमांक ३४९/१ मधील २० वर्षाची आठ चिकूची झाडे पूर्णपणे जळाली. तर पाच ते सहा झाडे आगीच्या ज्वाळात सापडल्याने ते पूर्णपणे जळाले. तर गट क्रमांक ४१९/२ मधील तीन वर्षांची पाच सीताफळाचे झाडे पूर्णपणे जळून खाक झाले.वनविभागाने पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीमुळे शेतातील झाडे जळाल्याचा आरोप कवडू शांतलवार यांनी केला आहे. या आगीत त्यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाई देऊन बेकायदेशीरपणे आग लावणाऱ्या वनविभागावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी शांतलवार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)