शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:15 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.

ठळक मुद्देतीन लाखांचे कर्ज : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील घटना

चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली.अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाºया चिचाळ येथील भारत तलमले या शेतकऱ्याकडे चिचाळ व पाथरी शेतशिवारात असे एकूण तीन एकर शेती आहे. दरवर्षी निसर्गाची अवकृपा परिणामी उत्पादन कमी आले. लागवडीचा खर्च व मिळणारे उत्पादन यात प्रचंड तफावत असल्याने कुटुंबाचा प्रपंच कसा चालवावा, कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तलमले राहायचे.त्यांच्यावर बँक आॅफ इंडिया कोंढा विविध कार्यकारी सोसायटी, पवनी तालुका सहकारी पत संस्था, गावातील महिला बचत गटाचे कर्ज यासह गावातील अन्य लोकांचे हात उसणवारीचे असे जवळपास तीन लक्ष रूपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे.सततच्या नापिकीमुळे ते नेहमी विवंचनेत असायचे. यामुळेच त्यांनी मृत्युला कवटाळले असावे, अशी माहिती मृतक भारत तलमले यांच्या पत्नीने लोकमतशी बोलताना दिली.भारतने जनावरांच्या गोठ्यात ठेवलेले किटकनाशक प्राशन केले. त्यांना प्रथम अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथील पडोळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. तलमले यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडिल असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.घराचा कर्ता पुरूष गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मृतकाची पत्नी मनिषा तलमले यांच्या खांद्यावर आली आहे. शासनाने तलमले यांचे कर्ज माफ करून सदर कुटुंबाला दोन लक्ष रूपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही चिचाळ ग्रामवासियांनी केली आहे.