शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

शेतकरी कुटुंबातील जयंतची आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 17:17 IST

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य आयोगाच्या परीक्षेत त्याने राज्यातून २४ वी रँक मिळवत ओबीसी प्रवर्गातून तिसरा क्रमांक मिळवला आहे.

ठळक मुद्देराज्यातून २४ वी रँक तर ओबीसी प्रवर्गातून तिसरा

तथागत मेश्राम

वरठी (भंडारा) : जिद्दीला प्रयत्नांची साथ मिळाली की यश सोपं होतं हे सिद्ध करून दाखविले आहे नेरी येथील जयंत कारेमोरे यांनी. शिक्षणासाठी शेत व घर विकावे लागले तरी चालेल पण प्रयत्न सोडायचे नाहीत, असा वडिलांनी धीर दिला. आईने शिक्षणासाठी गटातून पैसे उभे केले. एवढेच नाही तर स्पर्धा परीक्षा शिकवणीकरिता मोठ्या बहिणीने लाख रूपये दिले. तरीही पैसे अपुरे पडत असल्याने जयंतने घरीच अभ्यास केला. यूपीएससी परीक्षेत थोडक्यात हुकलेली संधी त्याने राज्य आयोगाच्या परीक्षेत मिळवली.

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य आयोगाच्या परीक्षेत त्याने राज्यातून २४ वी रँक मिळवत ओबीसी प्रवर्गातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. स्वप्नांच्या मागे धावताना मिळालेली संधी सोडायची नाही, असा संदेश त्यांनी युवकांना दिला. शेतकरी कुटुंबातील नेरीसारख्या लहानशा गावातून दैदिप्यमान यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोहाडी तालुक्यातील वरठीनजीकच्या नेरी येथील प्रल्हाद कारेमोरे या शेतकऱ्याचा जयंत हा मुलगा आहे. त्याला १ भाऊ ४ बहिणी असून, त्यांच्या वडिलांनी मुलांना शिक्षणाची समान संधी दिली. चारही मुली उच्चशिक्षित असून, जयंतने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी घरीच केली. ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वाचनालयातून पुस्तके आणून त्याने ही तयारी केली. दरम्यान, यूपीएससी परीक्षेत यश काही गुणांनी निसटले. पण त्याने धीर सोडला नाही.

राज्य आयोगाच्या जागा निघताच त्याने अर्ज भरला व परीक्षा दिली. राज्य आयोगाच्या असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर पदाकरिता राज्यातील दीड लाख युवकांनी प्रीलिम परीक्षा दिली. त्यातून फक्त पाच हजार युवकांची निवड मुख्य परीक्षेकरिता निवड झाली. आमदार राजू कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य व सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाडे, विक्रम मेश्राम, गंगाधर वैद्य, देवचंद वैद्य यांच्यासह गावकऱ्यांनी जयंतचे जंगी स्वागत केले.

सरपंच ठरले देवदूत

जयंत जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवायचा. यामुळे ऐन परीक्षेच्या काळात त्याची तब्येत बिघडायची. अशा कठीण प्रसंगी सरपंच आनंद मलेवार नेहमी मदतीला धावून जात व आर्थिक मदतीसह त्याच्या उपचारासाठी मदत करायचे, अशी माहिती जयंतच्या वडिलांनी दिली. जयंतची जिद्द पाहून ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची सुरूवात केल्याने त्याला फार मदत झाली.

टॅग्स :SocialसामाजिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र