शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘महाडीबीटी’मार्फत शेतकऱ्यांनी बियाणे अनुदानाचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत ...

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, आदी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहे. यासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंतच लाभ दिला जाणार आहे. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकासह स्वतःचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन आपली ‘आधार’ची नोंदणी करावी. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांनाही या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करूनच त्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय अनुदान वितरित होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी आल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्रअधिकारी योगेश मेहर, भंडारा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी काय करावे

शेतकऱ्यांनी अनुदानावर बियाणे खरेदी करण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करून लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर अधिकृत कृषी विक्रेत्याकडूनच बियाण्यांची खरेदी करावी. बियाणे खरेदी करताना सुधारित भात वाण हा दहा वर्षांच्या आतील वाण असल्यास किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २००० प्रतिक्विंटल याप्रमाणे लाभ मिळणार आहे. तसेच दहा वर्षांच्या वरील वाण असल्यास किमतीच्या ५० टक्के अथवा प्रतिक्‍विंटल १००० याप्रमाणे लाभ घेता येणार आहे. तसेच कडधान्य पिकांतील तूर, मूग, उडीद या पिकांसाठी दहा वर्षांच्या आतील वाणासाठी किमतीच्या ५० टक्के अथवा ५००० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे व दहा वर्षांच्या वरील वाण असल्यास किमतीच्या ५० टक्के अथवा २५०० प्रतिक्विंटलप्रमाणे लाभ दिला जाणार आहे. मात्र बिले घेताना त्यावर वाणाच्या कालमर्यादेचा उल्लेख करा. यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करीत असताना पक्के बिल घेऊन त्यावर वाण दहा वर्षांच्या आतील विकसित वाण आहे की दहा वर्षांवरील आहे, याचा कृषी विक्रेत्यांकडून पक्क्या बिलावर उल्लेख करून घ्यावा.