शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

उसाच्या दरवाढीसाठी शेतकरी धडकले साखर कारखान्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:24 IST

देव्हाडा स्थित मानस अ‍ॅग्रो साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा हमी भाव वाढवून २,६०० रूपये देण्यात यावा,....

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये असंतोष : कारखाना प्रशासनाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : देव्हाडा स्थित मानस अ‍ॅग्रो साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा हमी भाव वाढवून २,६०० रूपये देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी १५ नोव्हेंबरला दुपारी भारतीय किसान संघ भंडाराच्यावतीने कारखान्यावर धडक दिली. यावेळी शेतकरी व कारखाना प्रशासनाच्या बैठकीत भाव वाढ प्रकरणी कोणताही तोडगा निघाला नाही. २,३०० रूपयांपेक्षा अधिकची भाव वाढ करण्यासाठी पूर्ती उद्योग समूहाचे महाव्यवस्थापकांनी नकार दिल्याने चर्चा निष्फळ ठरली.पूर्ती उद्योग समुहाद्वारे संचालित मानस अ‍ॅग्रो युनिट क्रमांक ४ देव्हाडा येथे आहे. यावर्षी कारखाना प्रशासनाने गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी उसाला हमी भाव २,३०० रूपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र ऊसाला येणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यात तफावत असल्याने ऊसाची शेती परवडणारी नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.सन २०१७-१८ वर्षाचा गाळप हंगाम सुरु करण्याच्या निमित्ताने कारखान्यात आयोजित गव्हाण पुजनासाठी कारखाना प्रशासनाचे पदाधिकारी व अधिकारी हजर होते. ते निमित्त साधून भारतीय किसान संघाने उसाचा हमी भाव वाढविण्याची मागणी करीत धडक दिली. यावेळी कारखाना प्रशासन व किसान संघाच्या पदाधिकाऱ्यात झालेल्या बैठकीत सध्या हमी भाव २,३०० रूपयांवरून वाढविला जाऊ शकत नाही. निदान एक वर्ष सहकार्य करावे, असे सांगण्यात आल्याचे किसान संघाचे जिल्हा महामंत्री यादोराव मुंगमोडे यांनी सांगितले. बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे शेतकºयांनी असंतोष व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व किसान संघाचे जिल्हा महामंत्री यादोराव मुंगमोडे, तुमसर तालुका अध्यक्ष पप्पू सेलोकर, मोहाडी तालुका अध्यक्ष सुधीर बांते, साकोली तालुका अध्यक्ष यादोराव कापगते, माजी पं.स. सदस्य कवळू मुंगमोडे, शेतकरी ताराचंद मुंगमोडे, भाऊराव बुद्धे, विश्वनाथ गोबाडे, हेमराज डोंगरवार, बाळकृष्ण डोंगरवार, रूपराम कापगते, हरिभाऊ कापगते यांनी केले.