शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, घरतोडा, ढोलसर आदी गावातील शेतकरी धान विक्रीकरिता आणतात.

ठळक मुद्देमासळ येथील प्रकार । धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची उडाली झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ : येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी एकाचवेळी सुमारे दहा गावातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली असून, शेतकरी धानाच्या विक्रीसाठी पोहचले आहेत.दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, घरतोडा, ढोलसर आदी गावातील शेतकरी धान विक्रीकरिता आणतात. एकादिवशी ३०० ते ३५० पोती मोजमापाची क्षमता असलेल्या केंद्रावर सुमारे आठ हजार पोती धान एकाच वेळी आल्याने ट्रॅक्टर व शेतकऱ्यांची गर्दी झाली. त्यामुळे किटाळी ते विरली या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली. पर्याय म्हणून समोरच असलेल्या मैदानावरुन जडवाहतूक, बसेस व दुचाकीस्वारांनी आपआपली वाहने वळवली. या मार्गावरुन लाखांदूर, वडसा, गडचिरोली अशा लांब पल्याच्या बसेस धावतात. सुमारे २०० ट्रॅक्टर धानाची पोती भरुन रस्त्यावर उभी असून या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. शनिवारी केवळ पाच वाजेपर्यंतच खरेदी सुरु राहील असे संस्थेच्यावतीने नोटीस लावण्यात आला आहे.योग्य नियोजनाअभावी गरजू व गरीब शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकता येत नसल्याने अनेक शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ते शेतकरी वेळेपूर्वीच आपले धान केंद्रावर घेवून येतात. मात्र गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होताना सध्यातरी दिसत आहे.उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने हलके व भारी धान जवळपास एकाचवेळी कापणीला आले. शेतकºयांनी मळणी करुन धान शेतातच ठेवले होते. परंतु ते सुरक्षित नव्हते. शिवाय जीवनाचा रहाटगाडगा चालविण्याकरिता आर्थिक अडचणीत शेतकरी होता. धानाच्या विक्रीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहत नाही. सध्या मासळ केंद्रावर दहा हजार पोती धानाची विक्रीसाठी आवक असल्याचे दिसून येते. मासळ केंद्रावर योग्य त्या सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.शेतकऱ्यांवरील संकट संपता संपेनायावर्षी सुरूवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातीला पऱ्हे भरेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मात्र ऐन रोवणीच्यावेळी पाऊस बेपत्ता झाला. जवळपास एक महिना पावसाने दडी मारली. तरीही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. धान जगविले. त्यानंतरमात्र समाधानकारक पाऊस पडला. परंतु ऐन कापणीच्यावेळेस पुन्हा पावसाने कहर केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातूनही सावरत शेतकऱ्यांनी आपल्या धानाचा चुरना केला. धान वाळून विक्रीसाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर नेले आहे. परंतु त्याठिकाणीही मोठी गर्दी होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड