शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्च एंडिंग’चा शेतकऱ्यांना धसका

By admin | Updated: March 22, 2015 01:37 IST

जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी, वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करुन, रक्ताच पाणी करुन,

जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी, वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करुन, रक्ताच पाणी करुन, कर्ज काढून जमीन कसतो व सर्वतोपरी प्रयत्न करुन पिके घेण्याचा प्रयत्न. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या जाते. शेतमालाला योग्य भाव न मिळणे, व्यापाऱ्यांकडून दलालांकडून होणारी लूट, फसवणूक, शेती विरोधी धोरण, पिक विम्याचा खेळखंडोबा यामुळे तर शेतकरी नेस्तनाभूत झाला आहे व चिंतेच्या सावटातच जगत आहे. खरिपाचे पिक हे मुख्य पिक आहे त्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची रोजीरोटी सुरु असते व वर्षभऱ्याची लेनदेन चालते. मागील वर्षी व त्याआधी सुध्दा तुटपुंज्या पावसामुळे दुबार पेरणीच्या समस्येला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागले. त्यानंतर कशीबशी रोवणी उरकवून शेतकरी चांगल्यापिकाची आस करत राहिला. परंतु अपुऱ्या पावसामुळे व रोगराईमुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात फारच कमी उत्पन्न मिळाले. दुष्काळ पडला. शेतकरी, हितचिंतक व इतर शासनाकडे मदतीसाठी ओरडतच राहिले. पण लालफीतशाही व बेरोजगार, उदासीन, शासनपध्दतीमुळे शेतकऱ्यांना कसलीही सवलत किंवा मदत मिळाली नाही. तरीही शेतकऱ्याना पोटाला चिमटा देत कसेतरी खते, किटकनाशके व बियाणे यांचा खर्च भरुन काढला., बँका, शहरी संस्था व सावकारी कर्ज मात्र तसाच राहिला.खरिपाची भरपाई रब्बीमध्ये होईल या आशेने शेतकरी पुन्हा कामाला लागला. मात्र याहीवेळी निसर्गाचा लहरीपणा, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट याने होती नव्हती शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली व कर्जाच्या परतफेडीला कात्री बसली. उचललेला कर्ज ३१ मार्च पूर्वी भरला नाही तर पुन्हा त्यावर बसणारा व्याज यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याशिवाय गंत्यतर नाही, ही भीती शेतकऱ्यांमध्ये संचारली आहे. भीतीने काहींनी तर होते नव्हते गोंधण व स्थावर मालमत्ता विक्रीला काढले. काही जण तर स्वत:च्या सधन नातेवाईकाकडे कर्जाच्या परतफेडीसाठी हात पसरत आहेत, पंरतु आल्यापाऊलीच वापस यावे लागले. शेतमालाला तर मातीमोल भावात मागणी असल्यामुळे, कर्जाचा भरणा करायचा कसा असा सक्ष प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे उभा आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी नानातऱ्हेचे, कधी नव्हे असे गणिते करण्यात शेतकरी व्यस्त आहे, संभाव्य बँकाचे, सहकारी संस्थाचे नोटीस, पुढील दिवसात येणारे अपरिहार्य लग्नसमारंभातील खर्च, उपवर मुलामुलींसाठी करावयाचा लग्नाचा खर्च, धर दुरुस्ती व इतर किरकोळ खर्चाचा विचार करता तुर्तास तरी शेतकऱ्यांची झोपच उडाली असे ग्रामीण परिसरात अनुभवास येत आहे.