शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

‘मार्च एंडिंग’चा शेतकऱ्यांना धसका

By admin | Updated: March 22, 2015 01:37 IST

जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी, वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करुन, रक्ताच पाणी करुन,

जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी, वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करुन, रक्ताच पाणी करुन, कर्ज काढून जमीन कसतो व सर्वतोपरी प्रयत्न करुन पिके घेण्याचा प्रयत्न. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या जाते. शेतमालाला योग्य भाव न मिळणे, व्यापाऱ्यांकडून दलालांकडून होणारी लूट, फसवणूक, शेती विरोधी धोरण, पिक विम्याचा खेळखंडोबा यामुळे तर शेतकरी नेस्तनाभूत झाला आहे व चिंतेच्या सावटातच जगत आहे. खरिपाचे पिक हे मुख्य पिक आहे त्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची रोजीरोटी सुरु असते व वर्षभऱ्याची लेनदेन चालते. मागील वर्षी व त्याआधी सुध्दा तुटपुंज्या पावसामुळे दुबार पेरणीच्या समस्येला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागले. त्यानंतर कशीबशी रोवणी उरकवून शेतकरी चांगल्यापिकाची आस करत राहिला. परंतु अपुऱ्या पावसामुळे व रोगराईमुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात फारच कमी उत्पन्न मिळाले. दुष्काळ पडला. शेतकरी, हितचिंतक व इतर शासनाकडे मदतीसाठी ओरडतच राहिले. पण लालफीतशाही व बेरोजगार, उदासीन, शासनपध्दतीमुळे शेतकऱ्यांना कसलीही सवलत किंवा मदत मिळाली नाही. तरीही शेतकऱ्याना पोटाला चिमटा देत कसेतरी खते, किटकनाशके व बियाणे यांचा खर्च भरुन काढला., बँका, शहरी संस्था व सावकारी कर्ज मात्र तसाच राहिला.खरिपाची भरपाई रब्बीमध्ये होईल या आशेने शेतकरी पुन्हा कामाला लागला. मात्र याहीवेळी निसर्गाचा लहरीपणा, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट याने होती नव्हती शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली व कर्जाच्या परतफेडीला कात्री बसली. उचललेला कर्ज ३१ मार्च पूर्वी भरला नाही तर पुन्हा त्यावर बसणारा व्याज यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याशिवाय गंत्यतर नाही, ही भीती शेतकऱ्यांमध्ये संचारली आहे. भीतीने काहींनी तर होते नव्हते गोंधण व स्थावर मालमत्ता विक्रीला काढले. काही जण तर स्वत:च्या सधन नातेवाईकाकडे कर्जाच्या परतफेडीसाठी हात पसरत आहेत, पंरतु आल्यापाऊलीच वापस यावे लागले. शेतमालाला तर मातीमोल भावात मागणी असल्यामुळे, कर्जाचा भरणा करायचा कसा असा सक्ष प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे उभा आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी नानातऱ्हेचे, कधी नव्हे असे गणिते करण्यात शेतकरी व्यस्त आहे, संभाव्य बँकाचे, सहकारी संस्थाचे नोटीस, पुढील दिवसात येणारे अपरिहार्य लग्नसमारंभातील खर्च, उपवर मुलामुलींसाठी करावयाचा लग्नाचा खर्च, धर दुरुस्ती व इतर किरकोळ खर्चाचा विचार करता तुर्तास तरी शेतकऱ्यांची झोपच उडाली असे ग्रामीण परिसरात अनुभवास येत आहे.