शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

‘मार्च एंडिंग’चा शेतकऱ्यांना धसका

By admin | Updated: March 22, 2015 01:37 IST

जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी, वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करुन, रक्ताच पाणी करुन,

जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी, वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करुन, रक्ताच पाणी करुन, कर्ज काढून जमीन कसतो व सर्वतोपरी प्रयत्न करुन पिके घेण्याचा प्रयत्न. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या जाते. शेतमालाला योग्य भाव न मिळणे, व्यापाऱ्यांकडून दलालांकडून होणारी लूट, फसवणूक, शेती विरोधी धोरण, पिक विम्याचा खेळखंडोबा यामुळे तर शेतकरी नेस्तनाभूत झाला आहे व चिंतेच्या सावटातच जगत आहे. खरिपाचे पिक हे मुख्य पिक आहे त्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची रोजीरोटी सुरु असते व वर्षभऱ्याची लेनदेन चालते. मागील वर्षी व त्याआधी सुध्दा तुटपुंज्या पावसामुळे दुबार पेरणीच्या समस्येला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागले. त्यानंतर कशीबशी रोवणी उरकवून शेतकरी चांगल्यापिकाची आस करत राहिला. परंतु अपुऱ्या पावसामुळे व रोगराईमुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात फारच कमी उत्पन्न मिळाले. दुष्काळ पडला. शेतकरी, हितचिंतक व इतर शासनाकडे मदतीसाठी ओरडतच राहिले. पण लालफीतशाही व बेरोजगार, उदासीन, शासनपध्दतीमुळे शेतकऱ्यांना कसलीही सवलत किंवा मदत मिळाली नाही. तरीही शेतकऱ्याना पोटाला चिमटा देत कसेतरी खते, किटकनाशके व बियाणे यांचा खर्च भरुन काढला., बँका, शहरी संस्था व सावकारी कर्ज मात्र तसाच राहिला.खरिपाची भरपाई रब्बीमध्ये होईल या आशेने शेतकरी पुन्हा कामाला लागला. मात्र याहीवेळी निसर्गाचा लहरीपणा, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट याने होती नव्हती शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली व कर्जाच्या परतफेडीला कात्री बसली. उचललेला कर्ज ३१ मार्च पूर्वी भरला नाही तर पुन्हा त्यावर बसणारा व्याज यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याशिवाय गंत्यतर नाही, ही भीती शेतकऱ्यांमध्ये संचारली आहे. भीतीने काहींनी तर होते नव्हते गोंधण व स्थावर मालमत्ता विक्रीला काढले. काही जण तर स्वत:च्या सधन नातेवाईकाकडे कर्जाच्या परतफेडीसाठी हात पसरत आहेत, पंरतु आल्यापाऊलीच वापस यावे लागले. शेतमालाला तर मातीमोल भावात मागणी असल्यामुळे, कर्जाचा भरणा करायचा कसा असा सक्ष प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे उभा आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी नानातऱ्हेचे, कधी नव्हे असे गणिते करण्यात शेतकरी व्यस्त आहे, संभाव्य बँकाचे, सहकारी संस्थाचे नोटीस, पुढील दिवसात येणारे अपरिहार्य लग्नसमारंभातील खर्च, उपवर मुलामुलींसाठी करावयाचा लग्नाचा खर्च, धर दुरुस्ती व इतर किरकोळ खर्चाचा विचार करता तुर्तास तरी शेतकऱ्यांची झोपच उडाली असे ग्रामीण परिसरात अनुभवास येत आहे.