शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

धानशेतीत भेगा पडल्याने शेतकऱ्यांचे फाटले काळीज

By admin | Updated: August 28, 2016 00:09 IST

धान पिकाचे मोठ्या प्रमाणात घेवून कर्जाचा बोझा कमी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाला यावर्षी निसर्गाने रडकूंडीस आणले आहे.

तलावाच्या जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा : शेतकऱ्यांच्या डोळ्यात स्वप्नाऐवजी दिसू लागली अश्रूभंडारा : धान पिकाचे मोठ्या प्रमाणात घेवून कर्जाचा बोझा कमी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाला यावर्षी निसर्गाने रडकूंडीस आणले आहे. कशीबशी रोवण आटोपली मात्र आता धानपिकाला वाचविण्याचा शेतकऱ्यांना शर्तीचा प्रयत्न करावा लागत आहे. जिल्ह्यात पावसाने मोठी उसंत घेतल्याने शेत जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे काळीज फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्याला हवालदिल केले आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या चक्रात अडकलेला शेतकरी यातून बाहेर येण्याचे केवळ स्वप्न बघत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस राहील असे भाकित वेधशाळेने वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी स्वप्न रंगवून शेतीच्या हंगामात स्वत:ला झोकून घेतले होते. कर्जबाजारी होवून शेतकऱ्यांनी शेतात बी-बियाणे पेरले. सुरुवातीला हलका पाऊस पडला त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकली. त्यानंतर मध्यम पावसाने हजेरी लावली. अश्यात त्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था होती त्यांनी रोवणी आटोपली. मात्र त्यांच्याकडे सिंचनाची सुविधा नव्हती ते चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. आज येईल उद्या येईल असा स्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरुन काळेभोर ढग धावत होते. मात्र पाऊस पडला नाही. यास्थितीत शेतकऱ्यांच्या हातातील धानाचे उत्पादन जाण्याची स्थिती निर्माण झाली. अनेकांच्या शेतात पावसाअभावी रोवणी लांबली तर अनेकांच्या अद्यापही खोळंबलेल्या आहेत. अश्या विदारक स्थितीत ज्यांची रोवणी आटोपली त्या धानाला शेवटच्या पाण्याची गरज असतांना निसर्गाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतात धान रोवलेले असतांनाही पाणी नसल्याने शेतजमिनीला तडे गेलेले दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी रोवणीसाठी लावलेला खर्चही आता निघण्याची आशा धुसर झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात भविष्याचे स्वप्न नसून केवळ अश्रू दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दयावा अशी अपेक्षा बळीराजाने वर्तविली आहे. मात्र जिथे निसर्गानेच दगा दिला तिथे सरकार साथ देईल काय? अशी ही भीती त्यांच्या मनात घर करुन बसली आहे. शेतकऱ्यांना आता खरोखरच मदतीची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)