शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ते थेट ग्राहक योजनेतून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा अनेक शेतकºयांना फटका बसला होता. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण व उपविभागीय अधिकारी, मिलिंड लाड यांनी बैठक घेवून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था उभारण्याचे ठरविले. यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत बाजारपेठेची प्रमुख केंद्रे व जिल्हातील नियोजित क्षेत्रातील भाजीपाला यांचे नियोजन केले गेले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा पुढाकार : कोरोना लढ्यासाठी शेतकरी गट सरसावले

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य कृषी विभाग व जिल्हा आत्मा यंत्रणेच्या विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री योजना सुरू करण्यात आली आहे. कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांचा भाजीपाला खराब होवू नये व सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळण्यासाठी थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहचविण्यासाठी सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे.लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा अनेक शेतकºयांना फटका बसला होता. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण व उपविभागीय अधिकारी, मिलिंड लाड यांनी बैठक घेवून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था उभारण्याचे ठरविले. यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत बाजारपेठेची प्रमुख केंद्रे व जिल्हातील नियोजित क्षेत्रातील भाजीपाला यांचे नियोजन केले गेले.संचारबंदीत शेतकऱ्यांची पोलिसांकडून कुठेही अडवणूक होवू नये यासाठी भंडारा उपविभागांतर्गत २५८ वाहन धारकांना भाजीपाला वाहतुकीसाठी वाहनांचे परवाने देण्यात आले. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी तालुक्यातील एक हजार ११४ शेतकºयांनी यामध्ये विक्री केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांकडून सहा हजार १२७ क्विंटल भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री केला आहे. लॉकडाऊन काळात गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी शेतकऱ्यांसोबतच १७२ शेतकरी गटांनीही यामध्ये पुढाकार घेतला. शेतकरी गटांमार्फत एक हजार २५८ क्विंटल भाजीपाल्याची स्वत: शेतकरी गटांनी विक्री केली. जिल्हा प्रशासनाने परजिल्ह्यातील निराश्रीतांची सोय केलेल्या निराधारांना देखील भोजनासाठी अनेक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात देवून सामाजिक बांधीलकी जपली. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ५४ शेतकºयांनी मदतीचा हात देत तीन हजार ९३० गरजू व्यक्तींना मोफत भाजीपाला, फळे दिली.कृषी विभागाने राबवलेल्या उपक्रमाचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी कौतुक केले आहे. उपक्रमासाठी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आदित्य घोगरे, विकास कावळे, विजय रामटेके,तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, सतिष कुचरे, वासनिक, श्यामराव उईके, जे.व्ही. सरोदे, कृषी पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, सतिश वैरागडे, पंकज जिभकाटे, काटेखाये, भट, धांडे, रेशिम रामटेके, विजय हुमणे, एच.एम. मेश्राम, ढबाले यांनी परिश्रम घेतले.जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत लॉकडाऊन कालखंडात जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी, शेतकरी कंपन्यांमार्फत योग्य नियोजन केल्याने सर्वसामान्य नागरिकांना कुठेही भाजीपाल्याची गैरसोय जाणवली नाही यासाठी अनेकाची मदत मिळाली.-हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा.तालुकानिहाय शेतकऱ्यांची माहिती घेवून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढल्याने सर्वत्र भाजीपाला पोहचवता आला. याचा शेतकऱ्यांनाही फायदा झाला.-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी