शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकऱ्यांना मिळणार बोनस

By admin | Updated: March 10, 2016 00:52 IST

अवकाळी पाऊस व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याची बाब घेऊन धान ..

बोनसमुळे धान खरेदी वाढली : प्रती क्विंटल २०० रुपये बोनसभंडारा : अवकाळी पाऊस व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याची बाब घेऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत दराव्यतिरिक्त २०० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहनपर बोनस देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या प्रोत्साहनपर राशीमुळे ६० कोटी इतका अतिरिक्त खर्च होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या १६ हजार ७८० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादनात घट आली आहे. दिवसेंदिवस वाढणार उत्पादन खर्च आणि रासायनिक खते, किटकनाशके तसेच मजुरीमध्े झालेली वाढ यामुळे धान शेती अडचणीत आली आहे. दरवर्षी केंद्र शासनातर्फे शेतमालाचे भाव निश्चित करण्यात येतात. यावर्षी अ - श्रेणी धानाला १४५० रुपये तर साधारण धानासाठी १४१० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यास मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.आधारभूत धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी २०१५-१६ खरीप व रब्बी हंगामातील धानाची विक्री केली अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून जिल्ह्यात ५ लाख ९९ हजार ११९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. (नगर प्रतिनिधी)